शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

आजपासून दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:09 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरु वारपासून (दि. १) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेस सुरु वात होत असून, बारावीच्या परीक्षेनंतर आता शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून यंदा दोन लाख दहा हजार ७८२ विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्णातील ९६ हजार १९२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरु वारपासून (दि. १) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेस सुरु वात होत असून, बारावीच्या परीक्षेनंतर आता शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून यंदा दोन लाख दहा हजार ७८२ विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्णातील ९६ हजार १९२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दहावीची परीक्षा सुरळीत पार पडावी तसेच परीक्षा कालावधीत संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळाने विभागात २७ भरारी पथकांची नियुक्ती केली असून, त्यांची विभागातील ४३२ परीक्षा केंद्रांवर करडी नजर राहणार आहे. दहावी परीक्षेचा गुरुवारी पहिलाच दिवस असून, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराथी आणि सिंधी या भाषा विषयांची परीक्षा असून, यात मराठी भाषा विषयाचा पेपर एक लाख ७६ हजार विद्यार्थी देणार आहेत. यावर्षी नाशिक विभागात ४३२ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात येत असून, नाशिक जिल्ह्णात १९५ केंद्रांवर ९६ हजार १९२ विद्यार्थी, धुळे जिल्ह्णात ६३ परीक्षा केंद्रांवर ३० हजार २४९, जळगाव जिल्ह्णात १३१ केंद्रांवर ६३ हजार १५९ व नंदुरबार जिल्ह्णातील २१ हजार १८२ विद्यार्थ्यांची ४३ केंद्रांवर आसनव्यवस्था करण्यात आली आहे.२७ पथकांची करडी नजरनाशिक विभागात ४३२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणाºया दहावीच्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने जिल्हानिहाय भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णात ८, धुळे जिल्ह्णात ६, जळगावमध्ये ५ व नंदुरबारमध्ये ४ अशा २३ पथकांसह पाच विशेष पथकांची विभागातील सर्व परीक्षा केंद्रांवर करडी नजर राहणार आहे. यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे विशेष भरारी पथक अचानक परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी करेल, तर काही बैठे पथक परीक्षांवर नजर ठेवून असणार आहेत.संवेदनशील केंद्रांवर अधिक लक्षदहावी व बारावीच्या परीक्षांतील गैरप्रकारांची दखल घेत शिक्षण मंडळाने यावर्षी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्णांतील २० संवेदनशील केंद्रांची यादी तयार केली असून, भरारी पथकांसोबतच काही केंद्रांवर पूर्णवेळ बैठे पथक परीक्षेवर नियंत्रण ठेवणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा