लग्नसराईमुळे फळभाज्यांचे बाजारभाव तेजित
By Admin | Updated: May 27, 2014 00:04 IST2014-05-26T18:34:10+5:302014-05-27T00:04:33+5:30
मागणी वाढली : वीस टक्के आवक घटली

लग्नसराईमुळे फळभाज्यांचे बाजारभाव तेजित
मागणी वाढली : वीस टक्के आवक घटली
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्रीसाठी येणार्या शेतमालाला लग्नसराईमुळे मागणी असल्याने बाजारभाव तेजित आले आहेत. सध्या उन्हाळा सुरू असल्याने शेतमालाची साधारणपणे वीस टक्कयांपर्यंत आवक घटलेली आहे. आणखी काही दिवस मागणी कायम राहिल्यास फळभाज्यांचे बाजारभाव टिकून राहतील अशी शक्यता बाजारसमितीच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
बाजारसमितीत सध्या कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, टमाटा, वांगी, तसेच कारले आदि फळभाज्या माल विक्रीसाठी दाखल होत असुन लग्नसराईमुळे फळभाज्यांना मागणी वाढली आहे. कोबी वगळता सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव टिकून आहेत. तर कारल्याच्या बाजारभावात वाढ झाल्याने १२ किलो ग्रॅम वजनाच्या जाळीला ६०० रुपये पर्यंत बाजारभाव मिळत आहे. कोबीच्या दरात घसरण झाली असुन २५ ते ५० रुपये प्रति जाळी या दराने कोबी माल विक्री होत आहे. या दराने फळभाज्यांची आवक घटली असुन मागणी वाढलेली असल्यामुळे बाजारभाव टिकून आहेत. तर टमाटयाला सात ते आठ रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळत आहे. (वार्ताहर)