शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

शिक्षकांनी तंत्रस्नेही बनणे गरजेचे : वायुनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:51 IST

शिक्षकांनी बदलत्या काळाप्रमाणे अद्ययावत राहणे, ज्ञानामध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांची पिढी ही डिजिटल तंत्रज्ञानाचा लवकर स्वीकार करते. त्यामुळे शिक्षकांनीदेखील तंत्रस्नेही बनणे अत्यंत गरजेचे आहे,

नाशिक : शिक्षकांनी बदलत्या काळाप्रमाणे अद्ययावत राहणे, ज्ञानामध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांची पिढी ही डिजिटल तंत्रज्ञानाचा लवकर स्वीकार करते. त्यामुळे शिक्षकांनीदेखील तंत्रस्नेही बनणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक संस्थेच्या विविध शाळांतील शालांत परीक्षेतील व विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या प. सा. नाट्यगृहात संपन्न झालेल्या गुणगौरव समारंभाप्रसंगी डॉ. वायुनंदन बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. सूर्यकांत रहाळकर होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मुंडे, कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उपाध्यक्ष दिलीप अहिरे, उत्सव समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, कार्यकारी मंडळ सदस्य भास्करराव कोठावदे, विश्वास बोडके, वि. भा. देशपांडे, सरोजिनी तारापूरकर, श्रीकृष्ण शिरोडे, संस्था शिक्षणाधिकारी शैलेश पाटोळे, सहकार्यवाह सरिता देशपांडे, एकनाथ कडाळे, लक्ष्मण गंगाधर बदादे आदी उपस्थित होते .यावेळी प्रा सूर्यकांत रहाळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षकांनी नवीन शिक्षण व्यवस्थेतील बदल लक्षात घेऊन प्रशिक्षण घेऊन स्वत:मध्ये बदल करणे काळाची गरज आहे. शिक्षकांनी व पालकांनी डिजिटल बनने गरजेचे आहे.प्रास्ताविक राजेंद्र निकम यांनी केले. निवेदन उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रशांत केंदळे यांनी केले. यावेळी शैलेश पाटोळे, मधुवंती देशपांडे, सुनंदा कुलकर्णी, यशश्री रत्नपारखी व शालेय पदाधिकारी, शिक्षक कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षक