शिक्षक पुरस्काराचे रखडले ‘वितरण’

By Admin | Updated: September 13, 2016 01:17 IST2016-09-13T01:17:22+5:302016-09-13T01:17:33+5:30

आठवडा उलटूनही कार्यवाही थंड बस्त्यात

Teacher's Award 'Distribution' | शिक्षक पुरस्काराचे रखडले ‘वितरण’

शिक्षक पुरस्काराचे रखडले ‘वितरण’

नाशिक : दरवर्षी ५ सप्टेंबरला जाहीर होणारा जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार यंदाही ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आला खरा, मात्र पुरस्कार जाहीर होऊन आठवडा उलटला तरी या पुरस्काराच्या वितरणाला मुहूर्त लागलेला नाही.
जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत पुरस्कारांची घोषणा मागील आठवड्यात अध्यक्ष विजयश्री चुंबळे व शिक्षण सभापती किरण पंढरीनाथ थोरे यांनी केली होती. त्यात गुणवंत शिक्षक पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यात बागलाण- दीप खैरनार, चांदवड- चंद्रभान पवार, देवळा- अनंत देवरे, दिंडोरी- रमेश मोरे, इगतपुरी- अविनाश घोलप, कळवण- जिभाऊ निकम, मालेगाव- राजेंद्र दिघे, नांदगाव- भाऊसाहेब निकम, नाशिक- चंद्रकांत लहांगे, निफाड- नवनाथ सुडके, पेठ- संजय बागुल, सिन्नर- संजय आव्हाड, सुरगाणा- राजाभाऊ राऊत, त्र्यंबकेश्वर- रवींद्र देवरे, येवला- राजेंद्र कुशारे अशी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे आहेत. ५ सप्टेंबरला शिक्षक पुरस्कार वितरण अपेक्षित होते. मात्र, त्यादिवशी गणेश चतुर्थीच्या सुटीमुळे हे पुरस्कार स्वतंत्रपणे एका सोहळ्यात वितरित करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी त्यावेळी जाहीर केले होते. पुरस्कारासाठी १५ तालुक्यांतून २८ शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते. आयुक्तांच्या मंजुरीनंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आता आठवडा उलटूनही जाहीर करण्यात आलेल्या आदर्श शिक्षकांना पुरस्काराचे वितरण करण्यात आलेले नसल्याने पुरस्कारप्राप्त जिल्हा आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरणाची प्रतीक्षा लागली आहे. प्रत्यक्षात प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने या पुरस्कार वितरणाची तयारी ५ सप्टेंबरलाच केली होती. मात्र पदाधिकाऱ्यांच्या सूचनेमुळे हे पुरस्कार वितरण पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Teacher's Award 'Distribution'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.