शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मुलांना मूल्याधिष्ठित शिक्षण द्या -  तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:08 IST

बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देणे अपेक्षित आहे. केवळ विद्यार्थ्यांना साक्षर बनवून पाट्या टाकण्याचे आणि घोकंपट्टी करण्याची कामे बंद करा, असा स्पष्ट सल्ला देतानाच वर्गात शिक्षकांना आता मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

सातपूर : बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देणे अपेक्षित आहे. केवळ विद्यार्थ्यांना साक्षर बनवून पाट्या टाकण्याचे आणि घोकंपट्टी करण्याची कामे बंद करा, असा स्पष्ट सल्ला देतानाच वर्गात शिक्षकांना आता मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. सातपूर कॉलनीतील महापालिकेच्या जिजामाता शाळेत नवागतांच्या स्वागत आणि पाठ्यपुस्तक वाटपाप्रसंगी ते बोलत होते. मुंढे यांनी शिक्षकांना शिस्तीचा पाठ पढविताना सांगितले की, शिक्षकांनी पारंपरिक अभ्यासक्रम शिकविताना मुलांच्या क्षमता, त्यांचे कलागुण, त्यांच्यातील अवगुण ओळखून त्यांना शिक्षण दिले पाहिजे. केवळ साक्षर बनवू नये. शिक्षकांनी अगोदर अभ्यास करावा. शिकविताना शिक्षकांनी नव्हे तर विद्यार्थ्यांनी पुस्तक उघडले पाहिजे. आजपासून शिक्षकांनी शाळेत अर्धा तास अगोदर येऊन स्वच्छता पाहावी. खासगी शाळांपेक्षा मनपा शाळांचा दर्जा उंचावलाच पाहिजे, असेही स्पष्ट केले. मुंढे यांनी सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. प्रत्येकाला नाव विचारून त्यांच्या हातात वही, गुलाबपुष्प आणि चॉकलेट दिले. त्यानंतर प्रत्येकाला फुगा दिला. या चिमुकल्यांसोबत हवेत फुगा उडविण्याची मजा घेतली. एरवी मुंढे यांच्या जवळपासही न फिरकणाऱ्या अधिकाºयांनीही आयुक्तांच्या मजेत आपलीही मजा करून घेतली. यावेळी व्यासपीठावर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, फरीदा शेख, मुख्याध्यापक रोहिदास गोसावी उपस्थित होते. प्रास्ताविक सूर्यवंशी यांनी, तर सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक नितीन देशमुख यांनी केले. मुख्याध्यापक सुनेत्रा तांबट यांनी आभार मानले.पालकांशी साधला संवादजिजामाता शाळेतील पाल्यांना घेण्यासाठी अनेक पालक आलेले होते. यावेळी मुंढे यांनी पालकांना धडे दिले. पाल्यांना शाळेत पाठविताना घ्यावयाची काळजी, स्वच्छता, अभ्यास याविषयी बोलताना पाल्यांचे गणवेश स्वच्छ असावेत, गणवेशाची बटणे तुटलेली नसावीत, शिक्षकांनी काय शिकविले याची विचारणा करावी, वेळोवेळी शिक्षकांची भेट घ्यावी, पालकांनी आपल्या पाल्यासमोर व्यवस्थित राहावे कारण तुम्ही घरात जसे राहाल, वागाल तसेच तुमचा पाल्य तुमचे अनुकरण करीत असतो असे सांगत पालकांची विचारपूस केली.शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कलागुण आणि क्षमता ओळखून त्यांच्या पालकांशी संवाद साधावा. काही उणिवा असतील तर त्याही पालकांना सांगाव्यात आणि आजपासूनच मुख्याध्यापक वगळता शिक्षकांना वर्गात दिवसभर मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्याचे आदेश आयुक्त मुंढे यांनी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांना दिले. तसे परिपत्रक काढण्यासही त्यांनी सांगितले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे