शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

व्यापरी उद्योजकांच्या समस्य सोडविण्यासाठी टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:15 AM

नाशिक- कोरोना संसर्ग वाढ रोखण्यासाठी राज्य शासनापाठोपाठ जिल्हा प्रशासनाने देखील १२ दिवसांचे कडक निर्बंध लागू केले आहेत. पहिली लाट, ...

नाशिक- कोरोना संसर्ग वाढ रोखण्यासाठी राज्य शासनापाठोपाठ जिल्हा प्रशासनाने देखील १२ दिवसांचे कडक निर्बंध लागू केले आहेत. पहिली लाट, दुसरी लाट अशाप्रकारे एकेक लाटांसाठी निर्बंध ठेवले तर व्यापार उद्योग करायचे कधी असा प्रश्न नाशिक शहरातील व्यापारी आणि उद्योजकांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्यावतीने आयोजित बैठकीत गुरुवारी (दि. १४) केला. लॉकडाऊनमुळे कर भरणे तसेच बँकाचे हप्ते फेडणे इतकेच नव्हे तर कामगारांचे वेतन देणे शक्य होत नसल्याने राज्य सरकारने आर्थिक पॅकेज आणि कर सवलती द्याव्यात, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शासनाकडे समस्या मांडण्यासाठी सर्व संघटना प्रतिनिधींचा टास्क फोर्स स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला. महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स ॲंड इंडस्ट्रीजच्यावतीने निर्बंधांमुळे गुरुवारी (दि.१४) ऑनलाईन बैठक घेण्यात आली. तसेच विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री, मुख्य सचिव पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरवण्यात आले.

राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्याला व्यापारी आणि उद्योजकांनी समर्थन दिले आहे. मात्र त्यानंतर लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला. त्याच बरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १२ ते २२ असे दोन दिवस कडक लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. शासन आणि प्रशासन व्यापारी आणि उद्योजकांना विश्वासात न घेता निर्णय घेत असून त्यामुळेच या घटकांना येत असलेल्या अडचणींबाबत शासनाकडे दाद मागण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.

भाजप महाउद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन हे समर्थनीय नसल्याचे सांगितले. आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दोन दिवसात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केल्याची माहिती दिली. तसेच सर्वांनुमते जो निर्णय होईल त्यास पाठिंबा असेल असे सांगितले.

या बैठकीस सुरेश चावला, कैलास चावला, प्रफुल संचेती, एकनाथ अमृतकर, सुमित पटवा, गिरीश नवसे, हसमुख पटेल, मिलिंद कुलकर्णी, ललिता पाटोळे, राजेंद्र फड, मिलिंद जहागीरदार, रसिक बोथरा, प्रफुल्ल जैन, मनीष रावळ, भवन साखला, महेंद्र पटेल, शरद मिश्रा, संतोषकुमार लोढा, मुस्तानगीर मोगरावाला या व्यापारी प्रतिनिधींनी यावेळी अडचणी मांडल्या.

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष श्री. अनिलकुमार लोढा यांनी आभार मानले.

कोट...

निर्बंधामुळे व्यापार बंद आहे.कर्जाचे हप्ते, लाईट बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यावे याबाबत व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे.

- दिग्विजय कापडिया, व्यापारी

कोट...

सरकार दररोज नवनवीन पत्रके काढत आहे. त्यामुळे गोंधळ होत आहे. त्यातच शासन आणि प्रशासनात कोणताही समन्वय नाही. नाशिकमध्ये केवळ व्यापारावर एक लाख कुटुंब अवलंबून आहेत, त्याची अडचण होत आहे.

- हेमंत राठी, उद्योजक

कोट...

मार्चपासून आत्तापर्यंत केवळ २० टक्के माल विकला गेला आहे. उद्याेग आणि व्यापार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे कुठले तरी एक सुरू ठेवणे अयोग्य वाटते, मुंबईत दुकानांना परवानगी आहे, मग नाशिकला का नाही?

- खुशालभाई पोद्दार, व्यापारी