शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
2
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
3
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
4
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
5
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
6
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
7
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
8
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
9
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
10
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
11
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
12
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
13
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
14
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
15
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
16
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
17
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
18
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
19
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
20
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Daily Top 2Weekly Top 5

शेती कर्जाचे लक्ष्य हजार कोटींनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:39 IST

नाशिक : दुष्काळ आणि नापिकीसारख्या दुष्टचक्रात सापडलेला शेतकरी सातत्याने घसरणाऱ्या बाजारभावामुळे जेरीला आलेला असताना, आता पुन्हा खरिपाची तयारी करू लागला आहे. परंतु ऐन खरिपाच्या  तोंडावर भांडवलाची गरज असताना, जिल्हा बँकेने कर्जपुरवठ्याच्या निर्धारित  लक्ष्यामध्ये सुमारे एक हजार कोटींची कपात केली आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा बँकेतून दीड हजार कोटींहून अधिक पीककर्जाची ...

नाशिक : दुष्काळ आणि नापिकीसारख्या दुष्टचक्रात सापडलेला शेतकरी सातत्याने घसरणाऱ्या बाजारभावामुळे जेरीला आलेला असताना, आता पुन्हा खरिपाची तयारी करू लागला आहे. परंतु ऐन खरिपाच्या  तोंडावर भांडवलाची गरज असताना, जिल्हा बँकेने कर्जपुरवठ्याच्या निर्धारित  लक्ष्यामध्ये सुमारे एक हजार कोटींची कपात केली आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा बँकेतून दीड हजार कोटींहून अधिक पीककर्जाची उचल झालेली असताना, जिल्हा बँकेने यावर्षी केवळ ५०० कोटींचे लक्ष्य ठेवून शेतकºयांच्या कर्जपुरवठ्यावर मर्यादा आणली असून, लक्ष्यच कमी ठेवल्याने कर्जाची परतफेड करूनही नव्याने कर्ज मिळेल की नाही, या साशंकतेने शेतकºयांकडून मागील थकीत कर्जाचा भरणा होण्याची शक्यताही कमी झाली आहे.  खरिपाच्या हंगामात अनेक शेतकरी जिल्हा बँकेचे तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून घेतलेले पीककर्ज जुने-नवे करून कर्ज खाते नियमित करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अनेकदा शेतकरी उसनवार अथवा नातेवाइकांकडून मदत मिळवून बँकेचे मुद्दल व व्याज भरून पुन्हा नव्याने कर्ज मिळाल्यानंतर त्याची परतफेड व वाढवून मिळालेल्या कर्जात खरिपाचा हंगाम कसाबसा भागविण्याचा प्रयत्न करतात. परंतु यावर्षी जिल्हा बँके ने कर्जपुरवठ्याचे निर्धारित लक्ष्यच अत्यल्प ठेवले आहे. त्यामुळे शेतकºयांनी कर्जाचा भरणा केल्यानंतरही त्यांना नव्याने कर्ज मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने शेतकरी थकीत कर्ज भरण्यास तयार होण्याची शक्यता घटली आहे. गेल्या वर्षीही अनेक शेतकºयांना कर्जाची परतफेड करूनही खरीप हंगामात शेतीसाठी पुरेसे कर्ज उपलब्ध होऊ शकले नव्हते. तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे जिल्हा बँकही अडचणीत सापडल्यामुळे अनेक शेतकºयांना त्यांच्या ठेवीही मिळू शकत नव्हत्या. त्यामुळे शेतकºयांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खरिपाच्या भांडवलासाठी वणवण करावी लागली होती. यावर्षी तर जिल्हा बँकेने कर्जपुरवठ्याच्या निर्धारित लक्ष्यातच एक हजार कोटी रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकºयांना खरिपाच्या हंगामात पुरेसा कर्जपुरवठा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरिपासाठी दोन हजार कोटींची गरजगेल्या काही वर्षांत शेतकºयांनी जिल्हा बँकेकडून खरिपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी उचललेल्या कर्जाची रक्कम पाहता यावर्षी शेतकºयांना किमान दोन हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे दिसून येते. २०१५-१६ या आर्थिक वर्षात शेतीसाठी खरीप रब्बी हंगामासाठी ११५० कोटींचे लक्ष्य असताना जिल्हाभरातील शेतकºयांकडून सुमारे १२९४ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल झाली होती, तर २०१६-१७ वर्षासाठी १५७४ कोटी क र्जपुरवठ्याचे लक्ष्य असताना जवळपास १७२० कोटींचे कर्ज उचलले गेले. अशाप्रकारे निर्धारित लक्ष्यापेक्षा कर्जाची मागणी दरवर्षी वाढतच असताना २०१७-१८ साठी निर्धारित लक्ष्य वाढण्याची अपेक्षा असतानाही त्यात कोणतीही वाढ झाली नाही. परंतु जिल्हा बँक नोटाबंदीमुळे अडचणीत आल्याने शेतकºयांना केवळ २१२ कोटी रुपयेच कर्जपुरवठा होऊ शकला होता. परंतु याच गोष्टीचा आधार घेऊन यावर्षी जिल्हा बँकेने पीक कर्जपुरवठ्याच्या लक्ष्यामध्ये तब्बल हजार कोटी रुपयांची कपात केली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी