शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

शेती कर्जाचे लक्ष्य हजार कोटींनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:39 IST

नाशिक : दुष्काळ आणि नापिकीसारख्या दुष्टचक्रात सापडलेला शेतकरी सातत्याने घसरणाऱ्या बाजारभावामुळे जेरीला आलेला असताना, आता पुन्हा खरिपाची तयारी करू लागला आहे. परंतु ऐन खरिपाच्या  तोंडावर भांडवलाची गरज असताना, जिल्हा बँकेने कर्जपुरवठ्याच्या निर्धारित  लक्ष्यामध्ये सुमारे एक हजार कोटींची कपात केली आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा बँकेतून दीड हजार कोटींहून अधिक पीककर्जाची ...

नाशिक : दुष्काळ आणि नापिकीसारख्या दुष्टचक्रात सापडलेला शेतकरी सातत्याने घसरणाऱ्या बाजारभावामुळे जेरीला आलेला असताना, आता पुन्हा खरिपाची तयारी करू लागला आहे. परंतु ऐन खरिपाच्या  तोंडावर भांडवलाची गरज असताना, जिल्हा बँकेने कर्जपुरवठ्याच्या निर्धारित  लक्ष्यामध्ये सुमारे एक हजार कोटींची कपात केली आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा बँकेतून दीड हजार कोटींहून अधिक पीककर्जाची उचल झालेली असताना, जिल्हा बँकेने यावर्षी केवळ ५०० कोटींचे लक्ष्य ठेवून शेतकºयांच्या कर्जपुरवठ्यावर मर्यादा आणली असून, लक्ष्यच कमी ठेवल्याने कर्जाची परतफेड करूनही नव्याने कर्ज मिळेल की नाही, या साशंकतेने शेतकºयांकडून मागील थकीत कर्जाचा भरणा होण्याची शक्यताही कमी झाली आहे.  खरिपाच्या हंगामात अनेक शेतकरी जिल्हा बँकेचे तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून घेतलेले पीककर्ज जुने-नवे करून कर्ज खाते नियमित करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अनेकदा शेतकरी उसनवार अथवा नातेवाइकांकडून मदत मिळवून बँकेचे मुद्दल व व्याज भरून पुन्हा नव्याने कर्ज मिळाल्यानंतर त्याची परतफेड व वाढवून मिळालेल्या कर्जात खरिपाचा हंगाम कसाबसा भागविण्याचा प्रयत्न करतात. परंतु यावर्षी जिल्हा बँके ने कर्जपुरवठ्याचे निर्धारित लक्ष्यच अत्यल्प ठेवले आहे. त्यामुळे शेतकºयांनी कर्जाचा भरणा केल्यानंतरही त्यांना नव्याने कर्ज मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने शेतकरी थकीत कर्ज भरण्यास तयार होण्याची शक्यता घटली आहे. गेल्या वर्षीही अनेक शेतकºयांना कर्जाची परतफेड करूनही खरीप हंगामात शेतीसाठी पुरेसे कर्ज उपलब्ध होऊ शकले नव्हते. तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे जिल्हा बँकही अडचणीत सापडल्यामुळे अनेक शेतकºयांना त्यांच्या ठेवीही मिळू शकत नव्हत्या. त्यामुळे शेतकºयांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खरिपाच्या भांडवलासाठी वणवण करावी लागली होती. यावर्षी तर जिल्हा बँकेने कर्जपुरवठ्याच्या निर्धारित लक्ष्यातच एक हजार कोटी रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकºयांना खरिपाच्या हंगामात पुरेसा कर्जपुरवठा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरिपासाठी दोन हजार कोटींची गरजगेल्या काही वर्षांत शेतकºयांनी जिल्हा बँकेकडून खरिपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी उचललेल्या कर्जाची रक्कम पाहता यावर्षी शेतकºयांना किमान दोन हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे दिसून येते. २०१५-१६ या आर्थिक वर्षात शेतीसाठी खरीप रब्बी हंगामासाठी ११५० कोटींचे लक्ष्य असताना जिल्हाभरातील शेतकºयांकडून सुमारे १२९४ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल झाली होती, तर २०१६-१७ वर्षासाठी १५७४ कोटी क र्जपुरवठ्याचे लक्ष्य असताना जवळपास १७२० कोटींचे कर्ज उचलले गेले. अशाप्रकारे निर्धारित लक्ष्यापेक्षा कर्जाची मागणी दरवर्षी वाढतच असताना २०१७-१८ साठी निर्धारित लक्ष्य वाढण्याची अपेक्षा असतानाही त्यात कोणतीही वाढ झाली नाही. परंतु जिल्हा बँक नोटाबंदीमुळे अडचणीत आल्याने शेतकºयांना केवळ २१२ कोटी रुपयेच कर्जपुरवठा होऊ शकला होता. परंतु याच गोष्टीचा आधार घेऊन यावर्षी जिल्हा बँकेने पीक कर्जपुरवठ्याच्या लक्ष्यामध्ये तब्बल हजार कोटी रुपयांची कपात केली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी