शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नगररचनामार्फत सर्वेक्षक नियुक्ती संशयाच्या घेºयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:12 IST

महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्यात येणाºया सर्वेक्षक नियुक्तीसंदर्भातील निविदाप्रक्रिया संशयाच्या घेºयात सापडली असून, अडीच कोटींचे काम पंचवीस कोटींना देण्याचा घाट घातला जात आहे. याचबरोबर गेल्या १८ वर्षांपासून निविदा न काढता एकाच संस्थेला मोजणीचे काम दिले गेल्याने त्याबाबतही आता चौकशीची मागणी होऊ लागली असून, विरोधकांकडून येत्या महासभेत जाब विचारला जाणार आहे.

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्यात येणाºया सर्वेक्षक नियुक्तीसंदर्भातील निविदाप्रक्रिया संशयाच्या घेºयात सापडली असून, अडीच कोटींचे काम पंचवीस कोटींना देण्याचा घाट घातला जात आहे. याचबरोबर गेल्या १८ वर्षांपासून निविदा न काढता एकाच संस्थेला मोजणीचे काम दिले गेल्याने त्याबाबतही आता चौकशीची मागणी होऊ लागली असून, विरोधकांकडून येत्या महासभेत जाब विचारला जाणार आहे.  महापालिकेने २९ सप्टेंबर २०१७ रोजी सर्वेक्षण सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केलेली आहे. सदर निविदेची किंमत प्रतिवर्षी पाच कोटी याप्रमाणे २५ कोटी रुपये दर्शविण्यात आलेली आहे. निविदेतील सर्वच्या सर्व दर हे शासनाच्या जिल्हा दर सूचीपेक्षा दुप्पट आहेत. निविदेत अपेक्षित दर शासनाच्या जिल्हा दर सूचीप्रमाणेच असले पाहिजे. त्यामुळे किमान २५ टक्के कमी दर प्राप्त होतात. प्रत्यक्षात जे काम वार्षिक तीन कोटींचे आहे ते फुगवून पाच कोटी रुपये करण्यात आले आहे. निविदेत स्पर्धा झाली तर सदरचे काम चक्क दोन ते अडीच कोटी रुपयांत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. मनपाने सर्वेक्षण कामाचे दर कशाप्रकारे ठरविले व ते जिल्हा दरसूचीपेक्षा जास्त आहेत, हा चौकशीचा व संशोधनाचा विषय आहे. याशिवाय, गेल्या १८ वर्षांपासून या कामाची निविदा न काढता एकाच संस्थेला काम दिले जात आहे. महापालिका आयुक्तांनी यंदा निविदाप्रक्रिया राबविण्यास सांगितल्याने नगररचना विभागाचा नाईलाज झाला असला तरी, नगररचना विभागाने निविदा अटी-शर्तींमध्ये काही मेख मारून ठेवल्या आहेत. निविदेत वार्षिक उलाढाल अडीच कोटींची असावी, अशी अट घातली आहे. परंतु, मनपाने १८ वर्षांपासून निविदाच काढली नाही तर एवढी प्रचंड उलाढाल इतर संस्था कशी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नगररचना विभागाने सदर निविदा काढलेली असली तरी त्यातील कामे नगररचना, भुयारी व पावसाळी गटार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, झोपडपट्टी विभाग यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे या सर्व विभागांनी वेगवेगळ्या निविदा काढल्या तर जास्त स्पर्धक मिळून दर कमी होऊ शकतात. निविदाप्रक्रियेत मनपाशी संबंधित कामाचा अनुभव असलेल्या संस्थांनाच भाग घेण्याची अट आहे. परंतु सदर अट ही अन्य संस्थांना बाद ठरविण्यासाठीच असल्याचा आरोप होत आहे. टेंडर शुक्लही मोठ्या प्रमाणावर ठेवले आहे. निवड झालेल्या संस्थेने चांगले काम केले तर मुदतवाढ देण्याचे निविदेत नमूद करण्यात आले आहे, याचा अर्थ संबंधित संस्थेला एकदा काम मिळाले की पुन्हा निविदा काढण्याचा प्रश्नच उपलब्ध होणार नाही. नगररचना विभागाने काढलेली ही निविदाप्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी विरोधकांकडून होऊ लागली असून येत्या महासभेत त्यावर प्रशासनाला जाब विचारण्याची तयारी केली आहे.हे मनपाला करता येईल?मनपाच्या आस्थापनेवर कंत्राटी किंवा कायमस्वरूपी सर्वेक्षक भरती करून काम करून घेता येऊ शकेल. भूमि अभिलेख विभागासोबत निधी सहाय्य करार करून मनपाच्या हिश्श्यापुरता निधी जमा करत सर्व्हे करता येईल. शहरातील विविध खासगी संस्थांचे पॅनल तयार करुन त्यांच्याकडून दर मागवून किमान प्राप्त दरात काम करता येईल. निविदाप्रक्रियेत जास्तीत जास्त स्पर्धा निर्माण करावी.