शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नगररचनामार्फत सर्वेक्षक नियुक्ती संशयाच्या घेºयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:12 IST

महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्यात येणाºया सर्वेक्षक नियुक्तीसंदर्भातील निविदाप्रक्रिया संशयाच्या घेºयात सापडली असून, अडीच कोटींचे काम पंचवीस कोटींना देण्याचा घाट घातला जात आहे. याचबरोबर गेल्या १८ वर्षांपासून निविदा न काढता एकाच संस्थेला मोजणीचे काम दिले गेल्याने त्याबाबतही आता चौकशीची मागणी होऊ लागली असून, विरोधकांकडून येत्या महासभेत जाब विचारला जाणार आहे.

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्यात येणाºया सर्वेक्षक नियुक्तीसंदर्भातील निविदाप्रक्रिया संशयाच्या घेºयात सापडली असून, अडीच कोटींचे काम पंचवीस कोटींना देण्याचा घाट घातला जात आहे. याचबरोबर गेल्या १८ वर्षांपासून निविदा न काढता एकाच संस्थेला मोजणीचे काम दिले गेल्याने त्याबाबतही आता चौकशीची मागणी होऊ लागली असून, विरोधकांकडून येत्या महासभेत जाब विचारला जाणार आहे.  महापालिकेने २९ सप्टेंबर २०१७ रोजी सर्वेक्षण सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केलेली आहे. सदर निविदेची किंमत प्रतिवर्षी पाच कोटी याप्रमाणे २५ कोटी रुपये दर्शविण्यात आलेली आहे. निविदेतील सर्वच्या सर्व दर हे शासनाच्या जिल्हा दर सूचीपेक्षा दुप्पट आहेत. निविदेत अपेक्षित दर शासनाच्या जिल्हा दर सूचीप्रमाणेच असले पाहिजे. त्यामुळे किमान २५ टक्के कमी दर प्राप्त होतात. प्रत्यक्षात जे काम वार्षिक तीन कोटींचे आहे ते फुगवून पाच कोटी रुपये करण्यात आले आहे. निविदेत स्पर्धा झाली तर सदरचे काम चक्क दोन ते अडीच कोटी रुपयांत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. मनपाने सर्वेक्षण कामाचे दर कशाप्रकारे ठरविले व ते जिल्हा दरसूचीपेक्षा जास्त आहेत, हा चौकशीचा व संशोधनाचा विषय आहे. याशिवाय, गेल्या १८ वर्षांपासून या कामाची निविदा न काढता एकाच संस्थेला काम दिले जात आहे. महापालिका आयुक्तांनी यंदा निविदाप्रक्रिया राबविण्यास सांगितल्याने नगररचना विभागाचा नाईलाज झाला असला तरी, नगररचना विभागाने निविदा अटी-शर्तींमध्ये काही मेख मारून ठेवल्या आहेत. निविदेत वार्षिक उलाढाल अडीच कोटींची असावी, अशी अट घातली आहे. परंतु, मनपाने १८ वर्षांपासून निविदाच काढली नाही तर एवढी प्रचंड उलाढाल इतर संस्था कशी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नगररचना विभागाने सदर निविदा काढलेली असली तरी त्यातील कामे नगररचना, भुयारी व पावसाळी गटार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, झोपडपट्टी विभाग यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे या सर्व विभागांनी वेगवेगळ्या निविदा काढल्या तर जास्त स्पर्धक मिळून दर कमी होऊ शकतात. निविदाप्रक्रियेत मनपाशी संबंधित कामाचा अनुभव असलेल्या संस्थांनाच भाग घेण्याची अट आहे. परंतु सदर अट ही अन्य संस्थांना बाद ठरविण्यासाठीच असल्याचा आरोप होत आहे. टेंडर शुक्लही मोठ्या प्रमाणावर ठेवले आहे. निवड झालेल्या संस्थेने चांगले काम केले तर मुदतवाढ देण्याचे निविदेत नमूद करण्यात आले आहे, याचा अर्थ संबंधित संस्थेला एकदा काम मिळाले की पुन्हा निविदा काढण्याचा प्रश्नच उपलब्ध होणार नाही. नगररचना विभागाने काढलेली ही निविदाप्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी विरोधकांकडून होऊ लागली असून येत्या महासभेत त्यावर प्रशासनाला जाब विचारण्याची तयारी केली आहे.हे मनपाला करता येईल?मनपाच्या आस्थापनेवर कंत्राटी किंवा कायमस्वरूपी सर्वेक्षक भरती करून काम करून घेता येऊ शकेल. भूमि अभिलेख विभागासोबत निधी सहाय्य करार करून मनपाच्या हिश्श्यापुरता निधी जमा करत सर्व्हे करता येईल. शहरातील विविध खासगी संस्थांचे पॅनल तयार करुन त्यांच्याकडून दर मागवून किमान प्राप्त दरात काम करता येईल. निविदाप्रक्रियेत जास्तीत जास्त स्पर्धा निर्माण करावी.