शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नोटा मोजण्याचे मशीन नंतर घ्या, आधी जनतेला कोव्हीड पासून वाचवा ; किरीट सोमैय्यांची घनाघाती टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 16:04 IST

नाशिक दौऱ्यावर असताना जिल्हा शासकीय रुग्णालय व मनपा रुग्णालयांसह लसीकरण केंद्रांची पाहणी केल्यानंतर भाजपच्या मध्यवर्ती शहर कार्यालया वसंतस्मृती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसरकारवर टिकेची झोड उठवितानाच शरद पवारांनाही टिकेचे लक्ष केले. गृहमंत्री अनील देशमुख यांच्याकडून पोलीस खात्यामार्फत होणाऱ्या शंभर कोटींच्या वसुलीचा काही भाग राष्ट्रवादी पक्षालाही मिळत असण्याची शक्यता व्यक्त केली.

नाशिक : नोटा मोजण्याचे मशीन नंतर घ्या, आधी महाराष्ट्राच्या जनतेला कोव्हीड पासून वाचवा असे खोचक टोला लगावत भाजापा नेते किरीट सोमैय्या यांनी राज्यातील सरकारवर राज्यातील वाढतील कोरोना परिस्थिती आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनील देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२२) घनाघाती टिका केली. 

किरिट सोमय्या सोमवारी नाशिक दौऱ्यावर असताना जिल्हा शासकीय रुग्णालय व मनपा रुग्णालयांसह लसीकरण केंद्रांची पाहणी केल्यानंतर भाजपच्या मध्यवर्ती शहर कार्यालया वसंतस्मृती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसरकारवर टिकेची झोड उठवितानाच राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेलाही टिकेचे लक्ष केले. गृहमंत्री अनील देशमुख यांच्याकडून पोलीस खात्यामार्फत होणाऱ्या शंभर कोटींच्या वसुलीचा काही भाग राष्ट्रवादी पक्षालाही मिळत असण्याची शक्यता व्यक्त केली. त्याचप्रमाणे गृहमंत्री अनील देशमुख परमवीर सिंग यांच्यावर आरोप करीत असताना दुसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून त्यांची स्तूती करतानाच ते प्रमाणिक अधिकारी असल्याचे म्हटले जात असल्याचे नमूद करतानाच परमवीर सिंग काय आहे आधी हे ठरवा, परमवीर सिंग जर चांगले आहे तर गृहमंत्री का हटवत नाहीत, जर गृहमंत्री योग्य तर परमवीर ला का हटवत नाहीत अशा सवालही किरीट सोम्मया यांनी केला. दरम्यान, भाजपाच्या सत्ताकाळआत असतानाही सचीन वाझे याला पुन्हा कार्यरत करण्यासाठी प्रयत्न झाले. दोन मंत्री नेहमी फॉलोअप घेत होते असा आरोप करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले गृहखाते व गृहनिर्माण खाते दोन्ही शिवसेनेचे नेतेच चालवतात. त्यामुळे वाझे यांनी वसुलीच्या पैशातून घेतलेल्या महागड्या गाड्या कोणी वापरल्या याविषयी त्यांचीही चौकशी करण्याची मागणी किरिट सोमय्यांनी केली. सचिन वाजेचा १२ महिन्याचे वसुली कारभाराची चौकशी एनआयएसोबतच अंमलवजावणी संचानालय (ईडी), आयकर विभाग व कंपनी मंत्रालयानेही करावी अशी मागणी किरिट सोमय्या यांनी केली. दरम्यान, सरकारमधील मंत्र्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसेल तर परमवीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची हिम्मत सरकार का दाखवत नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

कोविड नियंत्रणात सरकारला अपयश 

राज्यात गेल्या दहा दिवसात राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना राज्य सरकारला कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश येत असल्याची टिका किरीट सोमय्या यांनी केली. राज्यातील १५ जिल्हा रुग्णालयांसाठी प्रत्येकी शंभर कोटी रुपये खर्चून ऑक्सिजन प्रकल्प निर्मीतीसाठी निविदा काढून त्यांचे कार्यादेश झाल्यानंतरही जवळपास चार ते सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी हे प्रकल्प कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे कोरोना रुग्णाची गैरसोय होत असून राज्यार कोरोनाचा फैलाव होत असून राज्य सरकारने वसुली विभागावर लक्ष केंद्रीत केल्याचा आरोप केला. त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता आगामी काही दिवसात पुन्हा ऑक्सिजनची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करतानाच राज्य सरकारने लसीकरणावर भर देण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली, मात्र राज्य सरकार लसीकरणाविषयी उदासीन असल्याचे सांगतानाच केद्र सरकारने राज्याला १५ लाख लस पुरवठा केला असून अद्याप राज्यात केवळ ७ लाख लसीकरण झाले असल्याचे सांगतानाच राज्य सरकार लसीकरणावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी लसनिर्मितीची परवानगी मागत असल्याकड़ेही किरीट सोमय्या यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस