शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजे यांच्या संस्कृत भाषा अभ्यासाचा आदर्श घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 18:48 IST

सलग नऊ वर्षे औरंगजेबाच्या सेनासागराशी झुंज देणारे, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक अशा अनेक संस्कृत ग्रंथांची रचना केली. या साहित्यकार छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान गोदाकाठचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र आबा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देनरेंद्र पाटील : दोडी येथे जयकर व्याख्यानमाला

सिन्नर : सलग नऊ वर्षे औरंगजेबाच्या सेनासागराशी झुंज देणारे, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक अशा अनेक संस्कृत ग्रंथांची रचना केली. या साहित्यकार छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान गोदाकाठचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र आबा पाटील यांनी केले.सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग केदार, सरचिटणीस राजाराम आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, प्राचार्य टी. पी. सहाणे, उपप्राचार्य ए. जी. गिते, उपमुख्याध्याक डी. एम. ढगे, बहि:शाल केंद्राचे कार्यवाह प्राध्यापक के. डी. कुलकर्णी, के. डी. घुगे, आर. जी. कुळधरण आदी उपस्थित होते.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या अवघ्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर सलग ९ वर्षे हिंदवी स्वराज्याची भगवी पताका फडकत ठेवली. शेवटच्या क्षणात वतनाने लाचार झालेला संभाजी राजांचा सख्खा मेहुणा गणोजी शिर्के औरंगजेबाला फितूर झाला व छत्रपती संभाजी राजे हाती लागले. पुढे सतत ३९ दिवस हा धर्मयोद्धा मरणाला सामोर जात राहिला व अखेर ११ मार्च १६८९ रोजी या धर्मवीराने देव, देश, धर्म व स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.इतिहासात अजरामर झालेल्या वीर योद्ध्यांचे बलिदानातून प्रेरणा घेऊन आपणही राष्ट्ररक्षणासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत डॉ. आबा पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकhistoryइतिहास