शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

तोफखान्याचा शपथविधी : मैं भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहूंगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 17:25 IST

भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा व कोणत्याही युद्धाचा निर्णायक निकाल ठरविणाऱ्या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिक व हैदराबाद येथे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. दरवर्षी शेकडो सैनिकांच्या तुकड्या देशसेवेत योगदान देण्यासाठी सज्ज केल्या जातात.

ठळक मुद्देनातेवाईकांच्या भेटीगाठीचा भावनिक सोहळा रंगला.माता पित्यांना सन्मानपुर्वक ‘गौरव पदक’ प्रदाननवसैनिकांवर मला गर्व : मेजर जनरल असीम कोहली

नाशिक : नाशिकच्या भारतीय तोफखाना केंद्राच्या प्रत्येक नवसैनिकाने पहाटेपासून मैदानावर सातत्याने ४४ आठवडे घाम गाळत मैदानी खेळ ते कुशल शस्त्र हाताळणीपर्र्यंतचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कठोर पूर्ण केले. या प्रशिक्षणानंतर सैन्यात भरती झालेल्या सर्वसामान्य युवकाचा चेहरा, शरीरयष्टी तर बदललीच; मात्र प्रशिक्षणाने त्याला परिपूर्ण सैनिक बनविले. भारतीय तोफखाना नाशिकरोड रेजिमेंटच्या अशा एकूण २७२ कुशल नवसैनिकांची तुकडी देशसेवेत गुरूवारी (दि.१४) लष्करी दिमाखात दाखल झाली. भारतीय संविधानाचे पालन करत देशसेवेसाठी सदैव सज्ज असून वेळेप्रसंगी बलिदान करण्यासही तयार असल्याची शपथ यावेळी या नवसैनिकांनी तोफांच्या साक्षीने घेतली.भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा व कोणत्याही युद्धाचा निर्णायक निकाल ठरविणाऱ्या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिक व हैदराबाद येथे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. दरवर्षी शेकडो सैनिकांच्या तुकड्या देशसेवेत योगदान देण्यासाठी सज्ज केल्या जातात. नाशिकरोड तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून सेना पदक विजेते मेजर जनरल असीम कोहली हे उपस्थित होते. याप्रसंगी सलामी मंचावर ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांच्यासमवेत त्यांनी उपस्थित जवानांची मानवंदना लष्करी थाटात स्वीकारत त्यांना उज्ज्वल भवितव्य व देशसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्याप्रसंगी ते म्हणाले, तिरंगा आणि तोफांच्या समोर घेतलेली शपथ आपल्या पूर्ण कारकिर्दीत सदैव स्मरणात ठेवावी. तोफखाना केंद्राच्या सैन्यदलात भरती झालेल्या प्रशिक्षणार्थी जवानांनी आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे सहाय्याने १९ आठवड्यांचे खडतर सैन्य प्रशिक्षणासह शारीरिक क्षमता, शस्त्र हाताळणी अशा एकूण ४४ आठवड्यांचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली असून, भारतातील सैन्यदलाच्या सुमारे २९८ ‘युनिट’मध्ये हे नवसैनिक भविष्यात आपले योगदान देणार आहेत. या नवसैनिकांवर मला गर्व असून त्यांच्या संचलनाची समीक्षा करण्याची मिळालेल्या संधीचा अभिमान वाटतो. मला विश्वास आहे, भविष्यात या तुकडीचे सर्व ‘तोपची’ आपली जबाबदारी वेळोवेळी ओळखून कौशल्यपूर्ण कामगिरीने केंद्राचे नाव उज्ज्वल करतील असे ते म्हणाले. उपस्थित जवानांनी सशस्त्र लष्करी संचलन सादर क रत वरिष्ठ अधिका-यांना मानवंदना दिली.दरम्यान, २७२ नवसैनिकांचे नातेवाईकांच्या भेटीगाठीचा भावनिक सोहळा येथील हिरवळीवर रंगला. यावेळी माता-पित्यांसह आजी-आजोबांनी नवसैनिकांना जवळ घेत मायेचा हात फिरवून चांगल्या भविष्यासाठी शुभआशिर्वाद दिले. लष्करी अधिका-यांनी माता पित्यांना सन्मानपुर्वक ‘गौरव पदक’ प्रदान केले. यावेळी अनेकांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रशिक्षणार्थी जवान अमोल गामणे याने खास शैलीत केले.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करSoldierसैनिकNashikनाशिक