शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तोफखान्याचा शपथविधी : मैं भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहूंगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 17:25 IST

भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा व कोणत्याही युद्धाचा निर्णायक निकाल ठरविणाऱ्या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिक व हैदराबाद येथे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. दरवर्षी शेकडो सैनिकांच्या तुकड्या देशसेवेत योगदान देण्यासाठी सज्ज केल्या जातात.

ठळक मुद्देनातेवाईकांच्या भेटीगाठीचा भावनिक सोहळा रंगला.माता पित्यांना सन्मानपुर्वक ‘गौरव पदक’ प्रदाननवसैनिकांवर मला गर्व : मेजर जनरल असीम कोहली

नाशिक : नाशिकच्या भारतीय तोफखाना केंद्राच्या प्रत्येक नवसैनिकाने पहाटेपासून मैदानावर सातत्याने ४४ आठवडे घाम गाळत मैदानी खेळ ते कुशल शस्त्र हाताळणीपर्र्यंतचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कठोर पूर्ण केले. या प्रशिक्षणानंतर सैन्यात भरती झालेल्या सर्वसामान्य युवकाचा चेहरा, शरीरयष्टी तर बदललीच; मात्र प्रशिक्षणाने त्याला परिपूर्ण सैनिक बनविले. भारतीय तोफखाना नाशिकरोड रेजिमेंटच्या अशा एकूण २७२ कुशल नवसैनिकांची तुकडी देशसेवेत गुरूवारी (दि.१४) लष्करी दिमाखात दाखल झाली. भारतीय संविधानाचे पालन करत देशसेवेसाठी सदैव सज्ज असून वेळेप्रसंगी बलिदान करण्यासही तयार असल्याची शपथ यावेळी या नवसैनिकांनी तोफांच्या साक्षीने घेतली.भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा व कोणत्याही युद्धाचा निर्णायक निकाल ठरविणाऱ्या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिक व हैदराबाद येथे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. दरवर्षी शेकडो सैनिकांच्या तुकड्या देशसेवेत योगदान देण्यासाठी सज्ज केल्या जातात. नाशिकरोड तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून सेना पदक विजेते मेजर जनरल असीम कोहली हे उपस्थित होते. याप्रसंगी सलामी मंचावर ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांच्यासमवेत त्यांनी उपस्थित जवानांची मानवंदना लष्करी थाटात स्वीकारत त्यांना उज्ज्वल भवितव्य व देशसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्याप्रसंगी ते म्हणाले, तिरंगा आणि तोफांच्या समोर घेतलेली शपथ आपल्या पूर्ण कारकिर्दीत सदैव स्मरणात ठेवावी. तोफखाना केंद्राच्या सैन्यदलात भरती झालेल्या प्रशिक्षणार्थी जवानांनी आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे सहाय्याने १९ आठवड्यांचे खडतर सैन्य प्रशिक्षणासह शारीरिक क्षमता, शस्त्र हाताळणी अशा एकूण ४४ आठवड्यांचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली असून, भारतातील सैन्यदलाच्या सुमारे २९८ ‘युनिट’मध्ये हे नवसैनिक भविष्यात आपले योगदान देणार आहेत. या नवसैनिकांवर मला गर्व असून त्यांच्या संचलनाची समीक्षा करण्याची मिळालेल्या संधीचा अभिमान वाटतो. मला विश्वास आहे, भविष्यात या तुकडीचे सर्व ‘तोपची’ आपली जबाबदारी वेळोवेळी ओळखून कौशल्यपूर्ण कामगिरीने केंद्राचे नाव उज्ज्वल करतील असे ते म्हणाले. उपस्थित जवानांनी सशस्त्र लष्करी संचलन सादर क रत वरिष्ठ अधिका-यांना मानवंदना दिली.दरम्यान, २७२ नवसैनिकांचे नातेवाईकांच्या भेटीगाठीचा भावनिक सोहळा येथील हिरवळीवर रंगला. यावेळी माता-पित्यांसह आजी-आजोबांनी नवसैनिकांना जवळ घेत मायेचा हात फिरवून चांगल्या भविष्यासाठी शुभआशिर्वाद दिले. लष्करी अधिका-यांनी माता पित्यांना सन्मानपुर्वक ‘गौरव पदक’ प्रदान केले. यावेळी अनेकांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रशिक्षणार्थी जवान अमोल गामणे याने खास शैलीत केले.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करSoldierसैनिकNashikनाशिक