शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

सिन्नरच्या भाजीबाजारात चिखलामुळे दलदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:31 PM

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरु झाले तेव्हापासून शहरभर पसरलेला भाजीबाजार आडव्या फाट्यावरील वंजारी संमाजाच्या मैदानावर आणण्यात आला. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मैदानावरील काळ्या मातीमुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य वाढले असून बाजारात पायी चालणे देखील अवघड बनले आहे.

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरु झाले तेव्हापासून शहरभर पसरलेला भाजीबाजार आडव्या फाट्यावरील वंजारी संमाजाच्या मैदानावर आणण्यात आला. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मैदानावरील काळ्या मातीमुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य वाढले असून बाजारात पायी चालणे देखील अवघड बनले आहे.कोरोनाचे संकटाने डोके वर काढले तेव्हा शहराच्या विविध भागात भाजीबाजार भरत होता. नवापूल, खासदार पूल ते गंगावेस, वावीवेस, गंगावेस, बसस्थानक ते वाजे विद्यालय या भागात भाजी विक्रेते बसायचे. मात्र, खरेदीसाठी ग्राहकांची होणारी गर्दी करोनाला निमंत्रण देणारी ठरु शकते हे लक्षात आल्याने शहरात सर्वत्र बसणारा भाजीबाजार एकाच ठिकाणी भरवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सुरुवातीला गोंदेश्‍वर मंदीराच्या परिसरात भाजीबाजार भरवण्याचा विचार नगर परिषदेने केला होता. मात्र, पुरातत्व विभागाच्या तांत्रिक अडचणींमूळे हा विचार मागे पडला. त्यानंतर सर्वांना सोयीचे ठरेल व सोशल डिस्टंन्सिंग पाळणे सोयीचे होईल अशी आडव्या फाट्यावरील वंजारी समाजाची प्रशस्त जागा भाजीबाजारासाठी निश्‍चित करण्यात आली. नगरपरिषदेने दुकानांसाठी जागा आखून दिल्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यापासून संपूर्ण भाजीबाजार या जागेत भरत आहे.सध्या पावसाचे दिवस असून मैदानावरील काळ्या मातीमूळे संपूर्ण भाजीबाजारात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलामूळे पायी चालणे दखील अवघड झाले आहे. त्यातच भाजीपाला घेऊन येणारी वाहने थेट भाजीविक्रेते बसतात तेथे जात असल्याने चिखलाचे प्रमाण अजून वाढत आहे. अनेक ग्राहक स्वत:ची चारचाकी वाहने व दुचाकी घेऊन भाजी खरेदीसाठी जात असल्याने चिखल अजून वाढतो आहे. या चिखलातून रस्ता काढत भाजी विक्रेत्यापर्यंत पोहचणे ग्राहकांना अडचणीचे ठरत आहे. अनेकदा ही वाहने चिखल तुडवत जाताना ग्राहकांसह विक्रेत्यांवरही चिखल पाण्याचा मारा करत असतात. त्यामूळे अनेकदा ग्राहकांचे कपडे खराब होत आहेत. बाजारात दररोज शेकडो ग्राहक खरेदीसाठी येत असतात. त्यात महिलांची संख्या अधिक असते. त्याशिवाय तालुक्याच्या विविध भागातील शेतकरी, महिला भाजीपाला विकण्यासाठी दररोज बाजारात येत असतात. बाजारात असणारी चिखलाची ही परिस्थिती ग्राहक व विक्रेत्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची भिती व्यक्त होत आहे. चिखलामूळे डांसाचे प्रमाण वाढल्याचे तक्रार भाजी विक्रेत्यांकडून होत आहे. पाऊस आल्यास मैदानात पावसापासून बचाव व्हावा यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यात चिखलामूळे समस्यांमध्ये वाढ होत आहे. पावसामूळे थंडी वाढली असून बदललेल्या वातावरणाने सर्दीसारखे छोटे-मोठे आजार डोके वर काढू शकतात. त्यातून करोनाला आमंत्रण मिळू शकते.नगर परिषदेने पुढाकार घेऊन भाजी बाजारातील चिखल कमी करण्यासाठी मुरुम टाकावा अशी मागणी भाजी विक्रेते, शेतकरी व ग्राहकांकडून करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग