शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सिन्नरच्या भाजीबाजारात चिखलामुळे दलदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 17:32 IST

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरु झाले तेव्हापासून शहरभर पसरलेला भाजीबाजार आडव्या फाट्यावरील वंजारी संमाजाच्या मैदानावर आणण्यात आला. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मैदानावरील काळ्या मातीमुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य वाढले असून बाजारात पायी चालणे देखील अवघड बनले आहे.

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरु झाले तेव्हापासून शहरभर पसरलेला भाजीबाजार आडव्या फाट्यावरील वंजारी संमाजाच्या मैदानावर आणण्यात आला. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मैदानावरील काळ्या मातीमुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य वाढले असून बाजारात पायी चालणे देखील अवघड बनले आहे.कोरोनाचे संकटाने डोके वर काढले तेव्हा शहराच्या विविध भागात भाजीबाजार भरत होता. नवापूल, खासदार पूल ते गंगावेस, वावीवेस, गंगावेस, बसस्थानक ते वाजे विद्यालय या भागात भाजी विक्रेते बसायचे. मात्र, खरेदीसाठी ग्राहकांची होणारी गर्दी करोनाला निमंत्रण देणारी ठरु शकते हे लक्षात आल्याने शहरात सर्वत्र बसणारा भाजीबाजार एकाच ठिकाणी भरवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सुरुवातीला गोंदेश्‍वर मंदीराच्या परिसरात भाजीबाजार भरवण्याचा विचार नगर परिषदेने केला होता. मात्र, पुरातत्व विभागाच्या तांत्रिक अडचणींमूळे हा विचार मागे पडला. त्यानंतर सर्वांना सोयीचे ठरेल व सोशल डिस्टंन्सिंग पाळणे सोयीचे होईल अशी आडव्या फाट्यावरील वंजारी समाजाची प्रशस्त जागा भाजीबाजारासाठी निश्‍चित करण्यात आली. नगरपरिषदेने दुकानांसाठी जागा आखून दिल्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यापासून संपूर्ण भाजीबाजार या जागेत भरत आहे.सध्या पावसाचे दिवस असून मैदानावरील काळ्या मातीमूळे संपूर्ण भाजीबाजारात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलामूळे पायी चालणे दखील अवघड झाले आहे. त्यातच भाजीपाला घेऊन येणारी वाहने थेट भाजीविक्रेते बसतात तेथे जात असल्याने चिखलाचे प्रमाण अजून वाढत आहे. अनेक ग्राहक स्वत:ची चारचाकी वाहने व दुचाकी घेऊन भाजी खरेदीसाठी जात असल्याने चिखल अजून वाढतो आहे. या चिखलातून रस्ता काढत भाजी विक्रेत्यापर्यंत पोहचणे ग्राहकांना अडचणीचे ठरत आहे. अनेकदा ही वाहने चिखल तुडवत जाताना ग्राहकांसह विक्रेत्यांवरही चिखल पाण्याचा मारा करत असतात. त्यामूळे अनेकदा ग्राहकांचे कपडे खराब होत आहेत. बाजारात दररोज शेकडो ग्राहक खरेदीसाठी येत असतात. त्यात महिलांची संख्या अधिक असते. त्याशिवाय तालुक्याच्या विविध भागातील शेतकरी, महिला भाजीपाला विकण्यासाठी दररोज बाजारात येत असतात. बाजारात असणारी चिखलाची ही परिस्थिती ग्राहक व विक्रेत्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची भिती व्यक्त होत आहे. चिखलामूळे डांसाचे प्रमाण वाढल्याचे तक्रार भाजी विक्रेत्यांकडून होत आहे. पाऊस आल्यास मैदानात पावसापासून बचाव व्हावा यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यात चिखलामूळे समस्यांमध्ये वाढ होत आहे. पावसामूळे थंडी वाढली असून बदललेल्या वातावरणाने सर्दीसारखे छोटे-मोठे आजार डोके वर काढू शकतात. त्यातून करोनाला आमंत्रण मिळू शकते.नगर परिषदेने पुढाकार घेऊन भाजी बाजारातील चिखल कमी करण्यासाठी मुरुम टाकावा अशी मागणी भाजी विक्रेते, शेतकरी व ग्राहकांकडून करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग