पोलिसांची धडपड : पालिकेची कामे, अतिक्रमण अडथळेडोकेदुखी द्वारका सर्कलची (मालिका)नाशिक : द्वारका सर्कलवर होणारी वाहतुकीची कोंडी सुटावी म्हणून शहर पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करून झाले; मात्र तेवढेच प्रयत्न करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरली. त्यामुळे द्वारका सर्कलची डोकेदुखी कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. यावर पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन चौकालगतची अतिक्रमणे, रिक्षा थांबे हटविल्यास रहदारीला रस्ता मिळेल आणि चौकाचाही श्वास सुटण्यास मदत होईल. पुण्या-मंुबईकडून नाशिकला येणार्या प्रवाशांसाठी द्वारका सर्कल हे नाशिकचे प्रवेशद्वार आहे. अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी टळावी म्हणून मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपूल आला; पण म्हणून वाहतुकीची कोंडी सुटली नाही. पुण्याकडून येणारी व जाणारी सर्वाधिक वाहतूक या मार्गावर सकाळ-सायंकाळच्या सुमारास असते. त्यामुळे चार मुख्य रस्त्यांबरोबरच समांतर रस्ते आणि उपनगरीय मार्ग यामुळे त्यात अधिकचीच भर पडते. सदरची कोंडी सुटावी या हेतूने वाहतूक पोलीस शाखेने आत्तापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले; परंतु ते सर्व अपयशी ठरले. सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरली, कारण चौकापेक्षा अधिक रस्ते येत असल्याने वेळेचे नियोजन करणे अशा ठिकाणी शक्य होत नाही. उड्डाणपुलापूर्वी याठिकाणी सर्कल होता जो मोठा होता. उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्कल त्याच आकारात ठेवले आहे, तर पादचार्यांसाठी भुयारी मार्ग तयार केला, ज्याचा पादचारी उपयोग करताना दिसत नाहीत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर आहेच; पण त्याचबरोबर वेगही मंदावला आहे. अतिक्रमणांची भरसर्कलला जोडणार्या सर्वच रस्त्यांलगत अवैध प्रवासी वाहतूक आणि विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे विक्रेत्यांचे आणि रिक्षा थांब्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा अडथळा येणार्या-जाणार्या वाहतुकीला होत असतो. * काय करता येऊ शकेल...- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या भुयारी मार्गाचा वापर पादचार्यांनी केला पाहिजे.- महापालिका जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खोदकाम केले आहे, जे अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो आहे, तो जलद गतीने होणे अपेक्षित आहे.- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या सर्कलचा आकार अजून कमी करणे गरजेचे आहे, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होणे सोपे होईल. - चौकातील सर्वच रस्त्यांलगत असलेले रिक्षा थांबे आणि फुल-फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणांकडे पालिकेने केलेले दुर्लक्षही वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरते आहे. कोट :वाहतूक पोलीस शाखेने महापालिका प्रशासनाला द्वारका सर्कललगतची अतिक्रमणे व रिक्षा थांबे हटविण्याबाबत वारंवार सांगितले आहे; परंतु कोणतीही कारवाई होत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाही दोन रस्ते वाहतुकीला खुले झाल्यास अधिक सुलभता येऊ शकेल, असे कळविले आहे. चारपेक्षा अधिक रस्ते येत असल्याने सिग्नल यंत्रणा सुरू करणे अशक्य आहे. पोलीस प्रशासनाबरोबरच महापालिका आणि प्राधिकरणानेही यात लक्ष देणे गरजेचे आहे, तेव्हाच ही समस्या सुटू शकेल. - एम. एम. बागवान, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
करून झाली सारी उठाठेव सुटता सुटेना कोंडी द्वारकेची
By admin | Updated: May 23, 2014 01:01 IST