‘त्या’ कर्मचाऱ्यांचे निलंबन
By Admin | Updated: July 31, 2014 00:52 IST2014-07-30T23:41:58+5:302014-07-31T00:52:37+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण कक्षाला भेट

‘त्या’ कर्मचाऱ्यांचे निलंबन
नाशिक : मुसळधार पाऊस व नैसर्गिक आपत्ती संभाव्य असताना, मदतीसाठी कार्यान्वित करण्यात आलेला नियंत्रण कक्ष वाऱ्यावर सोडून पोबारा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी सकाळी स्वत: जिल्हाधिकारी पाटील यांनी नियंत्रण कक्षाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
मंगळवारी रमजान ईदची सुटी असल्याने शासकीय कार्यालयांना सुटी असली, तरी नियंत्रण कक्षात नेमणूक दिलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत अपवाद करण्यात आला होता. प्रत्यक्षात सकाळी अकरा वाजेनंतर नियंत्रण कक्षात नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. परिणामी नियंत्रण कक्ष असून नसल्यासारखा झाला. विशेष म्हणजे, मंगळवारी दिवसभर पावसाची सर्वत्र हजेरी असताना, त्याबाबतचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे यातून दिसून आले.
विंचू चावल्याने
विद्यार्थ्याचा मृत्यू
सायगाव : येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याचा विंचू चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. या घटेनतील मृताचे नाव प्रथमेश रमेश कोथमिरे (१०) असे आहे.
तो इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. तो आज शाळेत जाण्याची तयारी करत असतानाच ही घटना घडली. त्याला तत्काळ अंदरसूल रुग्णालयात दाखल केले असता येथील डॉ. गोसावी यांनी त्यास मृत घोषित केले.