टंचाईग्रस्त गावांची पाहणी
By Admin | Updated: February 13, 2016 23:39 IST2016-02-13T23:21:31+5:302016-02-13T23:39:45+5:30
टंचाईग्रस्त गावांची पाहणी

टंचाईग्रस्त गावांची पाहणी
पेठ : तालुक्यातील पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागलेल्या गावांना गटविकास अधिकारी बी़ बी़ बहिरम यांनी भेटी देऊन टंचाईची परिस्थिती जाणून घेतली़ पेठ तालुक्यात जवळपास दोनशे गाव व वाड्यांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने याहीवर्षी जानेवारीनंतर अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडून या गावांची पाहणी करून नागरिकांच्या मागणीनुसार गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून गटविकास अधिकारी बी़ बी़ बहिरम यांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या विभागप्रमुखांना बरोबर घेत टंचाईग्रस्त गावांची पाहणी केली़ नागरिकांशी चर्चा करून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतकडून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असेही सांगितले़ (वार्ताहर)