शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

सुरगाणा धान्य घोटाळ्यातील सुत्रधार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:09 PM

विशेष म्हणजे अटक टाळण्यासाठी या तिघा आरोपींनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती व न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही गेल्या नऊ महिन्यांपासून ते राजरोस मोकळे फिरत होते, परंतु पोलिसांना त्याचा थांगपत्ताच नव्हता.

ठळक मुद्देआठ दिवस कोठडी : अपहारावर पडणार प्रकाशझोतसुमारे सात कोटी, सतरा लाख रूपयांचे धान्य काळ्याबाजारात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न

नाशिक : संपुर्ण राज्यात खळबळ उडवून देणा-या बहुचर्चीत कोट्यवधी रूपयांच्या सुरगाणा धान्य घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार व वाहतूक ठेकेदार मोरारजी भिकुलाल मंत्री यांच्यासह तिघांना अखेर सुरगाणा पोलिसांनी अटक केली असून, गुन्ह्याची व्याप्ती पाहता न्यायालयाने त्यांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अटक टाळण्यासाठी या तिघा आरोपींनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती व न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही गेल्या नऊ महिन्यांपासून ते राजरोस मोकळे फिरत होते, परंतु पोलिसांना त्याचा थांगपत्ताच नव्हता.नाशिकरोडचे मे. एस. एन. कंपनीचे भागीदार असलेले मोरारजी भिकुलाल मंत्री यांनी शासकीय धान्य वाहतुकीचा ठेका घेतला त्याकाळी साधारणत: ३० सप्टेंबर ते १९ डिसेंबर २०१४ या अडीच महिन्याच्या कालावधीत मनमाडच्या अन्न धान्य महामंडळातून सुरगाणा तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी मंजुर झालेले रेशनचे धान्य सुरगाणा येथे न पोहोचविता त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा गुन्हा २६ जानेवारी २०१५ रोजी सुरगाणा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. वाहतूक ठेकेदार मंत्री यांना त्याचा व्यवस्थापक संजय रामकृष्ण गडाख रा. नाशिकरोड व उगम पारसमल पगारिया रा. सुरगाणा यांनी या धान्य घोटाळ्यात मदत केली होती. या तिघांशिवाय या धान्य घोटाळ्यात एकूण २५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांनी संगमनत करून सुमारे सात कोटी, सतरा लाख रूपयांचे धान्य काळ्याबाजारात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या घटनेने संपुर्ण राज्यात खळबळ उडाली होती, राज्य सरकारने त्याची दखल घेत विधीमंडळ अधिवेशनातच दोषींवर कडक कारवाईचे तसेच हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून नाशिक जिल्ह्यातील सात तहसिलदारांना निलंबीतही केले होते. या गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक करून पोलिसांनी तपासही पुर्ण करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असताना मुख्य सुत्रधार मंत्री व त्यांचे दोघे साथीदार मात्र अटक टाळण्यासाठी न्यायालयात गेले होते. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयानेही अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी थेट सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली व तेथेही फेब्रुवारी २०१७ मध्ये अर्ज फेटाळण्यात आला. परंतु ते पोलिसांसमोर हजर झाले नाहीत, उलट समाजात राजरोस वावरतांना जिल्हा पुरवठा कार्यालयात धान्य वाहतुकीचा ठेका घेतांना अनामत भरलेली अडीच कोटी रूपयांची रक्कम परत मिळावी म्हणून त्यांनी तगादा लावला होता.

टॅग्स :Policeपोलिसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय