शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन फिल्डमुळे सुरत-नाशिक अंतर दोन तासांत ! वेगवान : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार सुरत-हैदराबाद महामार्ग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 00:57 IST

नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार होणाऱ्या सुरत-हैदराबाद व्हाया नाशिक या महामार्गामुळे नाशिक ते सुरत अंतर केवळ २ तासात कापणे शक्य होणार आहे.

नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार होणाऱ्या सुरत-हैदराबाद व्हाया नाशिक या महामार्गामुळे नाशिक ते सुरत अंतर केवळ २ तासात कापणे शक्य होणार आहे. या महामार्गामुळे भविष्यात नाशिक - सुरत अंतर केवळ १७६ किलोमीटरवर येणार असल्याने दोन्ही शहरांची कनेक्टिव्हिटी प्रचंड वेगवान होऊ शकणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ तालुके आणि ६९ गावांमधून जाणाऱ्या या प्रस्तावित महामार्गामुळे या सहाही तालुक्यांच्या विकासाच्या प्रक्रियेला वेग येऊ शकणार असल्याचे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंंडियाचे (न्हाई) प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांनी सांगितले.नाशिक सिटिझन फोरमतर्फे उंटवाडी येथील द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स नाशिक शाखेच्या हॉलमध्ये ह्यसुरत-हैदराबादह्ण या महामार्गाबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (न्हाई) प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, प्रकल्प सल्लागार राजू, व्यवस्थापक दिलीप पाटील तसेच ज्येष्ठ उद्योजक हेमंत राठी आणि आशिष कटारिया मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रस्ताविक प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हा प्रस्तावित महामार्ग सहापदरी असणार आहे. या महामार्गामुळे जिल्ह्यातील दोनशे हेक्टर क्षेत्रातून हा महामार्ग ह्यग्रीन फिल्ड महामार्गह्ण संकल्पनेनुसार तयार होणार असल्याने पर्यावरणाची फारशी हानी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील ६९ गावांमधून हा महामार्ग जाणार असून, फुड क्लब, लॉजेस्टिकसह इतर सुविधांमुळे रोजगारवृद्धीसही मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प नाशिकच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचेही साळुंखे यांनी नमूद केले.सध्या सुरत ते चेन्नईसाठी देशात तीन महामार्ग आहेत. ते महामार्ग सुमारे १६०४, १६१४ आणि १५६७ किलोमीटर या महामार्गांची लांबी आहे. मात्र, सुरत ते हैदराबाद या महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे अंतर सुमारे १२५० किलोमीटरपर्यंत येणार आहे. या संपूर्ण अंतरासाठी त्यासाठी दहा तासांचा अवधी लागेल, तर नाशिकहून चेन्नईपर्यंत आठ तासांत पोहोचणे शक्य होईल. ग्रीन फिल्ड अंतर्गत सुरत-नाशिक-अहमदनगर-करमाळा-सोलापूर-कर्नल-हैदराबाद- कडप्पा-चेन्नई असा मार्ग तयार करण्यात येणार असल्याचेही साळुंखे यांनी नमूद केले.इन्फोजिल्ह्यातील ६ तालुके कक्षेतजिल्ह्यातील सहा तालुके या महामार्गाच्या कक्षेत आहेत. त्यात सुरगाण्यातील १२ गावे (१७ किमी), पेठमधील ५ गावे (६ किमी), दिंडोरीतील २३ गावे ( ४३किमी), नाशिक ४ गावे (१२ किमी), निफाडच्या ९ गावांचा (१३ किमी), तसेच सिन्नरच्या १६ गावांचा (३२ किमी) त्यात समावेश आहे. नाशिकमधून हा महामार्ग आडगाव, ओढा, विंचूर गवळी, लाखलगाव या भागातून जाणार आहे.

टॅग्स :highwayमहामार्गNashikनाशिक