शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

ग्रीन फिल्डमुळे सुरत-नाशिक अंतर दोन तासांत ! वेगवान : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार सुरत-हैदराबाद महामार्ग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 00:57 IST

नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार होणाऱ्या सुरत-हैदराबाद व्हाया नाशिक या महामार्गामुळे नाशिक ते सुरत अंतर केवळ २ तासात कापणे शक्य होणार आहे.

नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार होणाऱ्या सुरत-हैदराबाद व्हाया नाशिक या महामार्गामुळे नाशिक ते सुरत अंतर केवळ २ तासात कापणे शक्य होणार आहे. या महामार्गामुळे भविष्यात नाशिक - सुरत अंतर केवळ १७६ किलोमीटरवर येणार असल्याने दोन्ही शहरांची कनेक्टिव्हिटी प्रचंड वेगवान होऊ शकणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ तालुके आणि ६९ गावांमधून जाणाऱ्या या प्रस्तावित महामार्गामुळे या सहाही तालुक्यांच्या विकासाच्या प्रक्रियेला वेग येऊ शकणार असल्याचे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंंडियाचे (न्हाई) प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांनी सांगितले.नाशिक सिटिझन फोरमतर्फे उंटवाडी येथील द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स नाशिक शाखेच्या हॉलमध्ये ह्यसुरत-हैदराबादह्ण या महामार्गाबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (न्हाई) प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, प्रकल्प सल्लागार राजू, व्यवस्थापक दिलीप पाटील तसेच ज्येष्ठ उद्योजक हेमंत राठी आणि आशिष कटारिया मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रस्ताविक प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हा प्रस्तावित महामार्ग सहापदरी असणार आहे. या महामार्गामुळे जिल्ह्यातील दोनशे हेक्टर क्षेत्रातून हा महामार्ग ह्यग्रीन फिल्ड महामार्गह्ण संकल्पनेनुसार तयार होणार असल्याने पर्यावरणाची फारशी हानी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील ६९ गावांमधून हा महामार्ग जाणार असून, फुड क्लब, लॉजेस्टिकसह इतर सुविधांमुळे रोजगारवृद्धीसही मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प नाशिकच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचेही साळुंखे यांनी नमूद केले.सध्या सुरत ते चेन्नईसाठी देशात तीन महामार्ग आहेत. ते महामार्ग सुमारे १६०४, १६१४ आणि १५६७ किलोमीटर या महामार्गांची लांबी आहे. मात्र, सुरत ते हैदराबाद या महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे अंतर सुमारे १२५० किलोमीटरपर्यंत येणार आहे. या संपूर्ण अंतरासाठी त्यासाठी दहा तासांचा अवधी लागेल, तर नाशिकहून चेन्नईपर्यंत आठ तासांत पोहोचणे शक्य होईल. ग्रीन फिल्ड अंतर्गत सुरत-नाशिक-अहमदनगर-करमाळा-सोलापूर-कर्नल-हैदराबाद- कडप्पा-चेन्नई असा मार्ग तयार करण्यात येणार असल्याचेही साळुंखे यांनी नमूद केले.इन्फोजिल्ह्यातील ६ तालुके कक्षेतजिल्ह्यातील सहा तालुके या महामार्गाच्या कक्षेत आहेत. त्यात सुरगाण्यातील १२ गावे (१७ किमी), पेठमधील ५ गावे (६ किमी), दिंडोरीतील २३ गावे ( ४३किमी), नाशिक ४ गावे (१२ किमी), निफाडच्या ९ गावांचा (१३ किमी), तसेच सिन्नरच्या १६ गावांचा (३२ किमी) त्यात समावेश आहे. नाशिकमधून हा महामार्ग आडगाव, ओढा, विंचूर गवळी, लाखलगाव या भागातून जाणार आहे.

टॅग्स :highwayमहामार्गNashikनाशिक