शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पूर्व भागातील गावांना विहिरींचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:30 IST

देवळा (संजय देवरे) तालुक्याची भौगोलिकस्थिती पाहता उत्तरेकडे गिरणा नदीचा काठ मध्ये गिरणा उजवा कालवा व दक्षिणेला चणकापूर उजवा कालवा असे पूर्व-पश्चिम तीन भाग पडतात. बहुतांश पाणी योजना गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. गिरणा नदीला व उजव्या कालव्याला येणाऱ्या आवर्तनावर तालुक्याचा बहुतांश भाग अवलंबून आहे.

देवळा (संजय देवरे) तालुक्याची भौगोलिकस्थिती पाहता उत्तरेकडे गिरणा नदीचा काठ मध्ये गिरणा उजवा कालवा व दक्षिणेला चणकापूर उजवा कालवा असे पूर्व-पश्चिम तीन भाग पडतात. बहुतांश पाणी योजना गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. गिरणा नदीला व उजव्या कालव्याला येणाऱ्या आवर्तनावर तालुक्याचा बहुतांश भाग अवलंबून आहे. दरम्यान, तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांना धरणे कोरडी पडल्यामुळे अधिग्रहित केलेल्या विहिरींनी आधार दिलेला आहे.तालुक्यात उमराणे येथील परसूल धरण तसेच रामेश्वर येथील किशोरसागर धरणात सध्या पाण्याचा साठा असल्याने या धरणातील नळ पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे सुरू आहेत. चणकापूर उजव्या कालव्याला व त्याच्या वितरिकांना नुकतेच चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाºया गावांतील पाणीटंचाई दूर झाली आहे. तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची धग जाणवत नाही.देवळा तालुक्याच्या पश्चिम भागातील खर्डा, कनकापूर, शेरी, वार्शी, मुलूकवाडी, कांचणे, हनुमंतपाडा आदी गावांना चणकापूर उजव्या कालव्याचा कोणताही लाभ होत नाही. त्या भागात असलेले वार्शी व कनकापूर धरण कोरडे पडले आहे.देवळा शहरासाठी गिरणा नदीपात्रातून सामुदायिक पाणीपुरवठा योजना सुरू आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या देवळा, सरस्वतीवाडी, माळवाडी, फुले माळवाडी, विजयनगर, खुंटेवाडी, श्रीरामपूर, खालप या गावांना गिरणा नदीला आवर्तन सोडले जाते, त्यावेळी पाणीपुरवठा सुरळीत असतो. गिरणे ला सोडण्यात येणाºया आवर्तनावर ही योजना अवलंबून आहे. आवर्तन बंद झाले की योजना ठप्प होते व शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गिरणा नदीला सोडण्यात येणाºया आवर्तनांच्या मधील काळात नदीपात्रातील उद्भव विहिरी आटल्यानंतर नगरपंचायतीला शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. त्या काळात लोहोणेर येथील बापू अहिरराव, देवीदास धामणे, अशोक धामणे, प्रल्हाद बागुल आदी शेतकरी त्यांच्या विहिरीतील व बोअरवेलचे पाणी देऊन सहकार्य करत असल्यामुळे टंचाई काळातही शहराला पाणीपुरवठा सुरू आहे.----------कोरोनामुळे योजना खोळंबलीरामेश्वर धरणातून महाराष्ट्र नगरोत्थान अभियानातून देवळा शहरासाठी साडेनऊ कोटी रुपयांच्या थेट पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना पूर्ण झाल्यास देवळा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी रामेश्वर धरणात पिण्यासाठी पाण्याचे आरक्षण होऊन वर्षभर वेळोवेळी पाण्याचे नियमित आवर्तन मिळेल. त्यामुळे धरण व कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना व वरवंडी, मटाणे, वाजगाव, रामेश्वर आदी गावांनादेखील याचा लाभ होऊन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही; परंतु कोरोना महामारीमुळे योजना खोळंबली असल्याची माहिती नगराध्यक्ष ज्योत्स्ना आहेर यांनी दिली.

 

 

टॅग्स :Nashikनाशिक