शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनांची शिखर परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 01:28 IST

शेतकरी संघटनेची शिखर परिषद नुकतीच आडगाव येथे राज्यभरातून आलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या परिषदेत समन्वयक समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ प्रवक्ते भगवान बोराडे यांनी दिली.

ठळक मुद्देसमन्वय समिती स्थापन : विविध विषयांवर चर्चा

कसबे सुकेणे : शेतकरी संघटनेची शिखर परिषद नुकतीच आडगाव येथे राज्यभरातून आलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या परिषदेत समन्वयक समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ प्रवक्ते भगवान बोराडे यांनी दिली.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांचे वीजबिल मुक्ती करून शेतीला पूर्ण दाबाची वीज उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करणे, तात्कालिक व महत्त्वाची शेती प्रश्नावर एकसमान भूमिका घेणे आदी विषयावर परिषदेत चर्चा झाली. १० नोव्हेंबर १९८० सालातील शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये अटक झालेले प्रथम सत्याग्रही कसबे सुकेणेचे अशोक जाधव, आण्णा भाऊ गोसावी, बाजीराव भंडारे, ॲड. उत्तम चिखले या प्रथम सत्याग्रहींचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शिखर परिषदेला १९८० सालापासून कार्यरत असलेले लक्ष्मीकांत देशमुख, शिवाजी नांदखिले, विदर्भ समिती प्रमुख धनंजय काकडे, शेतकरी संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते, अशोकराव हेमके (जालना), डॉ. पृथ्वीराज पाटील (जळगाव), अनंत सादडे पाटील, गोकुळ पाटील , कैलास पाटील, संजय पाटील (वाडा), वाल्मीक सांगळे , सुनील पवार, नारायण गुरगुडे, एकनाथ धनवटे, प्रदीप पवार, दत्तू पाटील साडदे, आदींसह महाराष्ट्रातील विविध संघटनांचे प्रतिनिधी हजर होते

इन्फो

समिती प्रमुखपदी भगवान बोराडे

शिखर परिषदेत शेतकरी संघटनांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. समितीमध्ये लक्ष्मीकांत देशमुख (यवतमाळ), शिवाजीराव नांदखिले (पुणे), डॉ.पृथ्वीराज पाटील (जळगाव), धनंजय पाटील काकडे (अमरावती), गोकुळ पाटील (नाशिक), अशोकराव हेमके (जालना), सुनील पवार (नाशिक), पांडुरंग रायते (पुणे), वाल्मीकराव सांगळे (नाशिक), कैलास पाटील (वाडा, जिल्हा ठाणे) यांचा समावेश करण्यात आला तर भगवान बोराडे यांची महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने समन्वय समिती प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी