शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:39 IST

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात शेवटच्या टप्प्यातील सर्व उन्हाळ कांदा लागवड करपा रोगाच्या प्रादुर्भावाने पूर्णपणे बाधित झाली आहे. ...

ठळक मुद्देकरपा रोगाचा प्रादुर्भाव : बळीराजा हवालदिल

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात शेवटच्या टप्प्यातील सर्व उन्हाळ कांदा लागवड करपा रोगाच्या प्रादुर्भावाने पूर्णपणे बाधित झाली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ कांदा उत्पादनात मोठी घट दिसून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परिसरात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे शेती डिसेंबर अखेरपर्यंत ओलिताखाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीची तीन ते चार वेळेस आंतरमशागत करून अतिपाववसाने बाधित झालेली शेती लागवडीखाली आणली. त्यात उन्हाळ कांद्याची लागवड केली. यंदा परिसरात झालेली कांदा लागवड टप्प्याटप्प्यानेझाली असून, पहिल्या व दुसºया टप्प्यातील कांद्याची लागवड झाली ती आज काढणी सुरु आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी निघाले आहे. यात बहुतेक शेतकरी हा कांदा विक्री करत आहे तर काही शेतकरी कांदाचाळीत साठवत आहे. तिसºया टप्प्यातील कांदा लागवड ही करपा रोगाला बळी पडली असून तो कांदा परिपक्व नसल्याने तो चाळीत साठविता येणार नाही. त्यामुळे यंदा तरी परिसरात कांदा उत्पादन घटले असून चाळीत साठवणूकदेखील कमी प्रमाणात होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

खर्च गेला वायायंदा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेती उपळून निघाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाचे केलेले मका पीक वाया गेले. त्यानंतर शेतीत डिसेंबर अखेरपर्यंत पाणी होते. शेतकºयांनी शेतजमीन तीन ते चार वेळेस आंतरमशागत करून शेती उन्हाळ कांद्याच्या लागवडीयोग्य बनवली व त्यात उन्हाळ कांदा लागवड केली. ही लागवड शेवटच्या टप्प्यातील असून, लागवड केलेल्या कांद्याला शेतकरी बांधवांनी मोठे आर्थिक भाग भांडवल लावले. कांदा कुठल्याही रोगाला बळी पडू नये यासाठी रोगप्रतिबंधक फवारण्याही केल्या, परंतु गेल्या दहा दिवसांपासून परिसरात उन्हाचा तडाखा वाढल्याने ही तिसºया टप्प्यातील व उपळट झालेल्या शेतात केलेली सर्व कांदा लागवड करपा रोगाला बळी पडली असून, शेतकºयांचा सर्व खर्च वाया गेला असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.शेतकºयांचे अतोनात नुकसान झाल्याने कृषी विभागाकडून या सर्व शेताची पाहणी करून शासनाकडे याबाबत अहवाल पाठवावा. ज्या शेतकºयांचा खरीप व रब्बीही वाया गेला असा शेतकरी सावरावा यासाठी आर्थिक मदत मिळावी.- दादाजी रेवबा जाधव, शेतकरी, पिळकोसकांदा पीक वाचविण्यासाठी टॅँकरने पाणीसायगाव : गावासह परिसरात विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी या भागातील शेतकरी २५ हजार लिटर क्षमतेचे पाणी टँकर तीन हजार रुपये दराने विकत घेत आहेत. यंदा चांगला पाऊस पडला. येवला तालुक्यात किमान रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे पीक हमखास निघेल या आशेवर मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली. पण, फेब्रुवारी महिन्यातच नदी-नाले, छोटे-मोठे बंधारे कोरडेठाक झाले. मार्चच्या शेवटी तर गाव परिसरातील विहिरींनीही तळ गाठला. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. मशागत, महागड्या दराचे कांदा रोप, लागवड, रासायनिक खते यामुळे कांदा पीक उभे करण्यासाठी एकरी ४० हजार रुपये खर्च झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी या भागात शेतकरी टँकरने पाणी विकत घेऊन पिकांना देत आहे. एकरभर कांद्याला एक पाणी द्यायचे म्हटल्यावर चार टँकर लागतात. विकतच्या पाण्यामुळे कांदा उत्पादन खर्चात २० हजार रुपयांची वाढ होणार आहे. सध्या उन्हाळ कांद्याच्या बाजारभावाची घसरण बघता कांदा उत्पादकांच्या हाती शिल्लक नफा राहणार नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :onionकांदाMarketबाजार