शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कर्जमाफीनंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:53 IST

सरकारने शेतकºयांना वीज, पाणी, ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजपा सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्कार सोहळ्याच्या प्रारंभी प्रकट मुलाखतीमध्ये त्यांनी दिलखुलास उत्तरे देत भाष्य केले.

नाशिक : सरकारने शेतकºयांना वीज, पाणी, ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजपा सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्कार सोहळ्याच्या प्रारंभी प्रकट मुलाखतीमध्ये त्यांनी दिलखुलास उत्तरे देत भाष्य केले.  राज्यातील शेतकºयांच्या आत्महत्या या नैराश्यापोटी होत असून, निसर्गाचा लहरीपणा या नैराश्याला कारणीभूत जरी असला तरी तेच एकमेव कारण यामागील असू शकत नाही. भाजपा सरकारने ३२ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. तसेच यापूर्वीच्या सरकारने साडेपाच हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. तरी राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे. दरम्यान, महाजन यांनी स्वत:चा प्रवासही उलगडून दाखविला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जामनेरसारख्या गावाचा सरपंच होत पुढे सलग पाच वेळा विधानसभेसाठी जनतेनी मला निवडून दिले. जात, धर्म, पंथ या गोष्टींकडे मी कधीही लक्ष दिले नाही आणि त्याची मला गरज वाटली नाही व भविष्यातही वाटणार नाही. लोकाभिमुख कार्यासाठी मी वाहून घेतले व त्यासाठी मी पुढे असतो किंबहुना तो माझा मूळ स्वभावच आहे, असेही महाजन यांनी यावेळी नमूद केले. लोकांच्या आरोग्याची सेवा केली, राज्यात लाखो लोकांसाठी वैद्यकीय महाशिबिरे घेतली. नाशिकचा कुंभमेळा यशस्वीतेसाठी राज्य व केंद्र सरकारकडून भरघोस निधी मिळविला व कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, असे महाजन यावेळी म्हणाले. मुखत्यारसिंह पाटील व पत्रकार श्रीमंत माने यांनी महाजन यांची प्रकट मुलाखत घेतली.विवाहसमारंभ-आजारपणावर मोठा खर्चआजारपण व लग्नसोहळ्यांचा शेतकºयांना फटका बसत असून, विवाहाचा थाटबाट सांभाळताना शेतकºयाला प्रत्येकी पंधरा लाखांचा खर्च येतो, असे निरीक्षण महाजन यांनी यावेळी बोलताना नोंदविले. विवाहावरील खर्च कमी कसा करता येऊ शकेल त्यादृष्टीने विचार करण्याची गरज असल्याचे महाजन म्हणाले.व्यायामामुळेच सुदृढआपण शाकाहारी असून, मद्यपान-धूम्रपानासह चहाच्या चवीपासूनही मी कोसो दूर आहे. दररोज व्यायाम केला नाही तर आजारी असल्यासारखे वाटते. व्यायामाची सवय व निर्व्यसनी असल्यामुळे मी सुदृढ राहिलो, असेही गुपित महाजन यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनfarmer suicideशेतकरी आत्महत्या