शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीनंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:53 IST

सरकारने शेतकºयांना वीज, पाणी, ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजपा सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्कार सोहळ्याच्या प्रारंभी प्रकट मुलाखतीमध्ये त्यांनी दिलखुलास उत्तरे देत भाष्य केले.

नाशिक : सरकारने शेतकºयांना वीज, पाणी, ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजपा सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्कार सोहळ्याच्या प्रारंभी प्रकट मुलाखतीमध्ये त्यांनी दिलखुलास उत्तरे देत भाष्य केले.  राज्यातील शेतकºयांच्या आत्महत्या या नैराश्यापोटी होत असून, निसर्गाचा लहरीपणा या नैराश्याला कारणीभूत जरी असला तरी तेच एकमेव कारण यामागील असू शकत नाही. भाजपा सरकारने ३२ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. तसेच यापूर्वीच्या सरकारने साडेपाच हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. तरी राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे. दरम्यान, महाजन यांनी स्वत:चा प्रवासही उलगडून दाखविला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जामनेरसारख्या गावाचा सरपंच होत पुढे सलग पाच वेळा विधानसभेसाठी जनतेनी मला निवडून दिले. जात, धर्म, पंथ या गोष्टींकडे मी कधीही लक्ष दिले नाही आणि त्याची मला गरज वाटली नाही व भविष्यातही वाटणार नाही. लोकाभिमुख कार्यासाठी मी वाहून घेतले व त्यासाठी मी पुढे असतो किंबहुना तो माझा मूळ स्वभावच आहे, असेही महाजन यांनी यावेळी नमूद केले. लोकांच्या आरोग्याची सेवा केली, राज्यात लाखो लोकांसाठी वैद्यकीय महाशिबिरे घेतली. नाशिकचा कुंभमेळा यशस्वीतेसाठी राज्य व केंद्र सरकारकडून भरघोस निधी मिळविला व कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, असे महाजन यावेळी म्हणाले. मुखत्यारसिंह पाटील व पत्रकार श्रीमंत माने यांनी महाजन यांची प्रकट मुलाखत घेतली.विवाहसमारंभ-आजारपणावर मोठा खर्चआजारपण व लग्नसोहळ्यांचा शेतकºयांना फटका बसत असून, विवाहाचा थाटबाट सांभाळताना शेतकºयाला प्रत्येकी पंधरा लाखांचा खर्च येतो, असे निरीक्षण महाजन यांनी यावेळी बोलताना नोंदविले. विवाहावरील खर्च कमी कसा करता येऊ शकेल त्यादृष्टीने विचार करण्याची गरज असल्याचे महाजन म्हणाले.व्यायामामुळेच सुदृढआपण शाकाहारी असून, मद्यपान-धूम्रपानासह चहाच्या चवीपासूनही मी कोसो दूर आहे. दररोज व्यायाम केला नाही तर आजारी असल्यासारखे वाटते. व्यायामाची सवय व निर्व्यसनी असल्यामुळे मी सुदृढ राहिलो, असेही गुपित महाजन यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनfarmer suicideशेतकरी आत्महत्या