शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

मालेगावला सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By श्याम बागुल | Published: November 02, 2018 3:51 PM

जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, दिंडोरी व निफाड हे दोन्ही तालुके मुबलक पाण्यामुळे सधन म्हणून गणले जातात. धरण व नदीच्या पाण्याची मुबलकता लक्षात घेता द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकविण्याकडे येथील शेतकºयांचा कल असला तरी, गेल्या वर्षापासून येथील सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलली आहे.

ठळक मुद्देबागलाण, दिंडोरी खालोखाल : आॅक्टोंबरमध्ये उच्चांक

नाशिक : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक असून गेल्या दहा महिन्यात ८५ शेतक-यांनी विविध माध्यमांचा वापर करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात करण्यात आल्या असून, त्या खालोखाल बागलाण व दिंडोरी या दोन तालुक्यातील शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारीपासून सुरू झालेल्या या सत्रात आॅगष्ट व आॅक्टोंबर महिन्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, दिंडोरी व निफाड हे दोन्ही तालुके मुबलक पाण्यामुळे सधन म्हणून गणले जातात. धरण व नदीच्या पाण्याची मुबलकता लक्षात घेता द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकविण्याकडे येथील शेतक-यांचा कल असला तरी, गेल्या वर्षापासून येथील सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलली आहे. या दोन्ही तालुक्यात अनुक्रमे १३ व १२ शेतक-यांनी चालू वर्षी आत्महत्या केली आहे. गेल्या वर्षी निफाडमध्ये दिंडोरीपेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. निफाडमध्ये १३ तर दिंडोरीत ११ शेतक-यांनी जीवन संपविले होते. यंदा मात्र उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. नेहमीच टंचाईचा सामना करणा-या बागलाण तालुक्यात गेल्या वर्षी व यंदाही १३ शेतक-यांनी आत्तापर्यंत आत्महत्येचा मार्ग धरला आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने शेतक-यांचे दिड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले होते. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या कमी होतील असा अंदाज बांधला जात असताना गेल्या वर्षी आॅक्टोंबर अखेर ९५ शेतक-यांनी आत्महत्या केली होती. यंदा हे प्रमाण १० ने घटले असले तरी, यंदा पावसाने फिरविलेली पाठ, खरीप व रब्बीचे झालेले नुकसान, भीषण पाणी टंचाई, जनावरांच्या चा-या, पाण्याचा प्रश्न पाहता शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची शक्यता शेतीतील जाणकार व्यक्त करीत आहेत.चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटना घडू लागल्या असून, दरमहिन्याला साधारणत: सात ते आठ शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करू लागले आहेत. आॅक्टोंबर अखेर ८५ शेतक-यांनी आत्महत्या केली असून, त्यातील शासकीय मदतीसाठी १७ शेतकरी पात्र ठरले तर ३० शेतक-यांच्या आत्महत्येचे कारणे वेगळी असल्याने त्यांना मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. ३८ शेतक-यांबाबत निर्णय प्रलंबीत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक