शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

पाण्याअभावी चारा सुकला

By admin | Updated: April 30, 2017 23:14 IST

बेलगाव कुऱ्हे : भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत जात आहे. सलगच्या दुष्काळी स्थितीमुळे शेती वाचविणे शेतकऱ्यांपुढे मोठे अवघड होऊन बसले आहे.

 बेलगाव कुऱ्हे : सूर्य आग ओकत असून, भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात खालावत जात आहे. सलगच्या दुष्काळी स्थितीमुळे शेती वाचविणे शेतकऱ्यांपुढे मोठे अवघड होऊन बसले आहे. उन्हाच्या कडाक्यापासून शेतातील उभे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे; मात्र त्यातही त्यांना अपयश येत आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांनी यावर्षी बागायती शेती केली; मात्र पाण्याची कमतरता असल्याने फळे सुकून गेली आहेत. पाणी न मिळाल्याने डाळिंब फळाची फुगवन झाली नाही. यातही आर्थिक फटका बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पारंपरिक शेतकरी व व्यवसायिक दुष्काळाच्या गर्तेत सापडले आहेत. दोन-तीन वर्षांपासून पावसाने शेतकऱ्यांना हवी तशी साथ दिली नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. डोक्यावरील कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांचा स्वस्तही बसू देत नाही अशा स्थितीत जगावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनतीने उभी केलेली पिके डोळ्यांदेखत पाण्याअभावी नष्ट होताना पाहावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन शेती वाचविण्याचा प्रयत्न केला आहे; निसर्गाने यातही त्यांची थटा केली. उन्हाचा तडाका वाढण्याने सर्वत्र पिण्याच्या पाण्याची दाहकता निर्माण झाली आहे. सकाळी १० वाजेनंतरच परिसरातील रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहे. यामुळे छोट्या- मोठ्या व्यवसायांवरदेखील उन्हाच्या दाहकतेचा परिणाम झाला आहे. तालुक्याच्या पूर्वभागात शेतीला पूरक असा दुग्धव्यवसाय केला जातो. मात्र चारा-पाण्याच्या टंचाईमुळे तोही संकटात आला आहे. परिसरातून हजारो लिटर दुधाचे संकलन केले जाते. मात्र सद्यस्थितीत दुधामध्ये मोठी घट निर्माण झाली आहे. उन्हाचा दाहकतेमुळे जनतेची लाही लाही होते. तसा मुक्या जनावरांनादेखील उन्हाचा त्रास होत आहे. पाणी व चारा नसल्याने दुधाळ जनावरे दूध देत नाहीत. यामुळे दुग्धव्यवसाय करणारेही संकटात सापडले आहेत. इगतपुरी तालुक्याची दुष्काळाची दाहकता दिवसागणिक वाढतच आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटी-मोठी धरणे, नदीपात्र कोरडी पडली आहेत. धरणांच्या तालुक्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील गावांची पाण्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अशा स्थितीत गोधन वाचविणे कठीण होऊन बसले आहेत. जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांपुढे पशुधन वाचविणे मोठे आव्हान आहे. इगतपुरी तालुक्याची निसर्गसौंदर्याने परिपूर्णतेची ओळख इतर जिल्ह्यात असल्याने परजिल्ह्यांतून मेंढपाळांचे येथे स्थलांतर झाले आहे. मात्र त्यांनाही यावर्षी पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. (वार्ताहर)