शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

पावसापासून वह्यापुस्तके वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत ; दफ्तर सांभाळताना धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 19:58 IST

जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लास्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लास्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्र व दफ्तर सांभाळताना धांदल उडताना दिसत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची कागदपत्र व दफ्तर सांभाळताना धांदल अतिमहत्वाचे कागदपत्र भिजून खराब होण्याची भितीप्रवेशासाठी कागदपत्रांसह बाहेर कसे पडावे? विद्यार्थ्यांसमोर प्रश्न

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लास्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लास्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्र व दफ्तर सांभाळताना धांदल उडताना दिसत आहे. सध्या अकरावी प्रवेशासह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्र सोबत घेऊन सायबर कॅफेसह मार्गदर्शन केंद्र, सुविधा केंद्र, रिपोर्टींग सेंटर आणि शाळा महाविद्यालयांमध्ये फिरावे लागत आहे. त्याचप्रमाणे प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले आदि विविध कागदपत्र जमविण्यासाठी आणि ते प्रवेशप्रक्रीयेत सादर करण्यासाठी पावसात फिरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यासाठी अतिमहत्वाचे असे हे कागदपत्र भिजून खराब होण्याची भिती आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्र अथवा दफ्तरातील वह्या पुस्तकांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापर येत नसल्याने पावसात महत्वाचे कागद आणि वह्या पुस्तके कशी जपावीत असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. शहरात प्लास्टिकबंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये प्लास्टिकची पिशवी वापरण्याविषयी भिती आहे.त्यामुळे विद्यार्थी जाड फाईल व बॅगमधून कागदपत्र घेऊन जात असले तरी अधून मधून पावसाचा जोर वाढत असल्याने कागदपत्र वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या इमारती,रस्त्यांच्या कडेची वृक्ष, बस स्थानके , चहाच्या टपऱ्या व रस्त्यालगतच्या दुकानांच्या आश्रयाला उभे राहावे लागत असल्याने शैक्षणिक प्रवेशासाठी व शाळा महाविद्यालयांमध्ये जाताना पाण्यापासून धोका असलेले कागदपत्र आणि वह्या पुसके सांभाळायच्या कशा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय