शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज -धनराज माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:38 IST

शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरु वातीपासून चालत आलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य साधन असून व्यावसाय उद्योजकतेचे कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून असे परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी केल आहे.

ठळक मुद्देपारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी व्यावसायिक शिक्षणाला महत्व उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांचे प्रतिपादन केटीएचएम महाविद्यालयात समाज दिन उत्साहात

नाशिक :शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरु वातीपासून चालत आलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य साधन असून व्यावसाय उद्योजकतेचे कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून असे परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी केल आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित समाजदिन सोहळ््यात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे चिटणीस डॉ.सुनिल ढिकले, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, व्यवस्थापन समितीचे अ‍ॅड.एकनाथ पगार शिक्षणाधिकारी डॉ.डी.काजळे, डॉ.आर.डी.दरेकर आदि उपस्थित होते.डॉ. धनंजय माने म्हणाले, डॉ.माने पुढे म्हणाले, आजचा विद्यार्थी हा मोबाईल आणि इंटरनेट यामधुन बाहेर येण्यास तयार नाही त्याला मिळणाऱ्या विविध संधीचा त्याने लाभ करून घेतल्यास त्याचा बौद्धिक विकास होईल. अन्न,वस्र,निवारा यासोबतच शिक्षणही आजच्या काळातील मुलभूत गरज असुन त्यामुळे भावी आयुष्य सुखकर होईल. यासाठी शिक्षकांनी देखील आपली शिकविण्याची भुमिका ही प्रामाणिकपणे व सैनिकांसारखी लढाऊ वृतीने निभावली पाहीजे. सर्व कर्मवीरांनी तुम्हाला दिलेल्या संधीचे तुम्ही सोने केले पाहीजे असे सांगुन त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. चिटणीस डॉ.सुनिल ढिकले यांनी अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या वाटचालीचा प्रवास उलगडून सांगितला. ' कर्मवीरांनी १९१४ साली मविप्र शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले केले. त्यामुळे पाच ते सहा विद्यार्थ्यांवर सुरु झालेली संस्था आज दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरक ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी