शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज -धनराज माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:38 IST

शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरु वातीपासून चालत आलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य साधन असून व्यावसाय उद्योजकतेचे कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून असे परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी केल आहे.

ठळक मुद्देपारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी व्यावसायिक शिक्षणाला महत्व उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांचे प्रतिपादन केटीएचएम महाविद्यालयात समाज दिन उत्साहात

नाशिक :शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरु वातीपासून चालत आलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य साधन असून व्यावसाय उद्योजकतेचे कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून असे परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी केल आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित समाजदिन सोहळ््यात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे चिटणीस डॉ.सुनिल ढिकले, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, व्यवस्थापन समितीचे अ‍ॅड.एकनाथ पगार शिक्षणाधिकारी डॉ.डी.काजळे, डॉ.आर.डी.दरेकर आदि उपस्थित होते.डॉ. धनंजय माने म्हणाले, डॉ.माने पुढे म्हणाले, आजचा विद्यार्थी हा मोबाईल आणि इंटरनेट यामधुन बाहेर येण्यास तयार नाही त्याला मिळणाऱ्या विविध संधीचा त्याने लाभ करून घेतल्यास त्याचा बौद्धिक विकास होईल. अन्न,वस्र,निवारा यासोबतच शिक्षणही आजच्या काळातील मुलभूत गरज असुन त्यामुळे भावी आयुष्य सुखकर होईल. यासाठी शिक्षकांनी देखील आपली शिकविण्याची भुमिका ही प्रामाणिकपणे व सैनिकांसारखी लढाऊ वृतीने निभावली पाहीजे. सर्व कर्मवीरांनी तुम्हाला दिलेल्या संधीचे तुम्ही सोने केले पाहीजे असे सांगुन त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. चिटणीस डॉ.सुनिल ढिकले यांनी अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या वाटचालीचा प्रवास उलगडून सांगितला. ' कर्मवीरांनी १९१४ साली मविप्र शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले केले. त्यामुळे पाच ते सहा विद्यार्थ्यांवर सुरु झालेली संस्था आज दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरक ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी