शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारीत ज्ञान प्राप्त करावे : व्ही. बी. गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:44 IST

शिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आत चालणारी प्रक्रिया नसून ती पुस्तकी ज्ञानाबारोबरच कौशल्यावर आधारित ज्ञानाची सध्याच्या स्थितीत गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांनी केले आहे.

ठळक मुद्देशिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आत चालणारी प्रक्रिया नाही पुस्तकांबारोबरच प्रात्यक्षिक कौशल्य आधारीत ज्ञानाची गरजप्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांचे मोबाईल कार्यशाळेत प्रतिपादन

नाशिक : शिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आत चालणारी प्रक्रिया नसून ती पुस्तकी ज्ञानाबारोबरच कौशल्यावर आधारित ज्ञानाची सध्याच्या स्थितीत गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांनी केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग के. टी. एच. एम. महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय मोबाईल रिपेअरिंग कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रा. डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलतांना त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक ज्ञानाचा विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोग होईल. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच प्रात्यक्षिक कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्वांगीन ज्ञान कौशल्य आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम.बी. मत्सागर यांनी मोबाईल ही अत्यंत गरजेची वस्तू असून मोबाईल दुरुस्ती ज्ञानामुळे या विद्यार्थ्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल असे प्रतिपादन केले. लेक्ट्रॉनिक सायन्स विभाग प्रमुख डॉ.व्ही.बी. काळे यांनी कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. प्रा. डी. एच. शिंदे यांनी विद्यार्थी विकास मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षक सुनील धांडे यांनी मोबाईल रिपेअरिंग बाबत सविस्तर मार्गदर्शन केले, मोबाईल दुरुस्तीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी तसेच इतर आवश्यक साधनांची ओळख यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना करून देतांना प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी डी. जी. पाटील, डॉ. पी.डी. हिरे, श्रीमती एस. के. जाधव, डी.एन. कडलग, वाय.आर. भामरे, एन.जी. खैरनार, सागर वाटपाडे, यु. एस. डेर्ले, माळेकर, मावळे व राठोड आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन कु. कोमल मलिक हिने केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयNashikनाशिकeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी