शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली सेंद्रिय फुलशेतीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:57 IST

सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय फुलशेतीला भेट देऊन माहिती जाणून घेतली.

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय फुलशेतीला भेट देऊन माहिती जाणून घेतली.पाडळी परिसरात आशापूर येथील प्रगतिशील शेतकरी विक्रम पाटोळे हे आधुनिक पद्धतीने सेंद्रिय फुलशेती करून विक्रमी उत्पन्न काढतात. या सेंद्रिय शेतीची माहिती विद्यार्थ्यांना एस.एम. कोटकर, सविता देशमुख यांनी दिली. या शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खत तयार करताना पालापाचोळा शेतीतील टाकाऊ पदार्थ व जनावरांचे शेण एकत्र करून कम्पोष्ट खत तयार करून शेतीला दिले जाते. तसेच गांडूळ खतदेखील दिले जाते. यातून भरपूर उत्पन्न मिळते. या खतामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढते. रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणाम होत नाही. कीटकनाशकांचा वापर न करता कीड नियंत्रणासाठी निंबोळी द्रावण वापरावे. यातून कीटकांचा नाश होतो. फुलशेतीपासून कुटुबांची आर्थिक प्रगती होते व नेहमी फुलांच्या सहवासात राहिल्याने मन प्रसन्न राहते. फुलांच्या वेगवेगळ्या जाती व त्याचे औषधी उपयोग समजतात, अशाप्रकारे पाटोळे यांनी या शेतीत ग्रीन, आॅरेंज, इंडम, कलकत्ता झेंडू फुले या फुलांचे उत्पादन घेतले आहे.मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आपले पालक वापरत असलेल्या जंतुनाशक औषधे, तणनाशक औषधे यांचे घातक परिणाम व आपल्या शरीरावर त्याचा विघातक परिणाम वेगवेगळ्या रोगांना बळी पडावे लागत असल्याचे सांगितले. त्याचा वापर करतांना व पाल्याभाज्या, फळभाज्या शिजवताना त्या व्यवस्थित धुऊन घ्याव्यात, असे आवाहन केले. आपल्या आहारात वेगवेगळ्या जीवन सत्त्वयुक्त पाल्याभाज्यांचा समावेश करून अती न शिजवता घ्याव्या व रासायनिक औषधाची फवारणी करताना घ्यावयाची दक्षता व त्याचा वापर स्वयंपाक घरात न ठेवता ती बाहेरच्या एखाद्या बंद खोलीमध्ये ठेवावे, असे सांगितले. सध्या या जंतुनाशक औषधापासून कॅन्सरसारख्या रोगाला बळी पडण्याची शक्यता असते. म्हणून आपण सर्वांनी हे धोके टाळण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, असे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रagricultureशेती