शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली सेंद्रिय फुलशेतीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:57 IST

सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय फुलशेतीला भेट देऊन माहिती जाणून घेतली.

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय फुलशेतीला भेट देऊन माहिती जाणून घेतली.पाडळी परिसरात आशापूर येथील प्रगतिशील शेतकरी विक्रम पाटोळे हे आधुनिक पद्धतीने सेंद्रिय फुलशेती करून विक्रमी उत्पन्न काढतात. या सेंद्रिय शेतीची माहिती विद्यार्थ्यांना एस.एम. कोटकर, सविता देशमुख यांनी दिली. या शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खत तयार करताना पालापाचोळा शेतीतील टाकाऊ पदार्थ व जनावरांचे शेण एकत्र करून कम्पोष्ट खत तयार करून शेतीला दिले जाते. तसेच गांडूळ खतदेखील दिले जाते. यातून भरपूर उत्पन्न मिळते. या खतामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढते. रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणाम होत नाही. कीटकनाशकांचा वापर न करता कीड नियंत्रणासाठी निंबोळी द्रावण वापरावे. यातून कीटकांचा नाश होतो. फुलशेतीपासून कुटुबांची आर्थिक प्रगती होते व नेहमी फुलांच्या सहवासात राहिल्याने मन प्रसन्न राहते. फुलांच्या वेगवेगळ्या जाती व त्याचे औषधी उपयोग समजतात, अशाप्रकारे पाटोळे यांनी या शेतीत ग्रीन, आॅरेंज, इंडम, कलकत्ता झेंडू फुले या फुलांचे उत्पादन घेतले आहे.मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आपले पालक वापरत असलेल्या जंतुनाशक औषधे, तणनाशक औषधे यांचे घातक परिणाम व आपल्या शरीरावर त्याचा विघातक परिणाम वेगवेगळ्या रोगांना बळी पडावे लागत असल्याचे सांगितले. त्याचा वापर करतांना व पाल्याभाज्या, फळभाज्या शिजवताना त्या व्यवस्थित धुऊन घ्याव्यात, असे आवाहन केले. आपल्या आहारात वेगवेगळ्या जीवन सत्त्वयुक्त पाल्याभाज्यांचा समावेश करून अती न शिजवता घ्याव्या व रासायनिक औषधाची फवारणी करताना घ्यावयाची दक्षता व त्याचा वापर स्वयंपाक घरात न ठेवता ती बाहेरच्या एखाद्या बंद खोलीमध्ये ठेवावे, असे सांगितले. सध्या या जंतुनाशक औषधापासून कॅन्सरसारख्या रोगाला बळी पडण्याची शक्यता असते. म्हणून आपण सर्वांनी हे धोके टाळण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, असे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रagricultureशेती