विद्यार्थ्यांनी केली अनाथ मुलांना मदत

By Admin | Updated: November 17, 2015 23:39 IST2015-11-17T23:37:49+5:302015-11-17T23:39:46+5:30

विद्यार्थ्यांनी केली अनाथ मुलांना मदत

Students help the orphaned children | विद्यार्थ्यांनी केली अनाथ मुलांना मदत

विद्यार्थ्यांनी केली अनाथ मुलांना मदत

इंदिरानगर : मुलांवर सामाजिक बांधीलकीचे संस्कार करण्यासाठी येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मूठभर धान्य उपक्रम राबवण्यात आला आणि जमा केलेले धान्य अनाथाश्रमातील मुलांना देण्यात आले. अनाथ मुलांमुळे भारावून गेलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून या मुलांना मदत करण्याचे ठरविले आहे.
व्यक्तिगत जीवनात दिवाळीचा आनंद सर्वच जण घेतात. मात्र शालेय मुलांवर अशा वेळी समाजातील वंचितांना मदत करण्याचे भान आले पाहिजे, यासाठी ‘मूठभर अन्न, पोटभर धान्य’ हा उपक्रम राबविण्यात आला. मुलांवर सामाजिक दायित्वाचे बीजारोपण होण्यासाठी उपक्रम राबविल्याचे यावेळी मुख्याध्यापक उज्ज्वला दळे यांनी सांगितले. तर अनाथ आश्रमातील निरागस मुलांना बघून भावूक झालेल्या या विद्यार्थ्यांनी येथून पुढेही खाऊच्या पैशातून अनाथ आश्रमातील मुलांना मदत करण्याचे वैष्णवी भागवत हिने मनोगत व्यक्त करताना सांगितले.
यावेळी दिनेश अहिरे, अलका चंद्रात्रे, अश्विनी भंवर, प्रज्ञा कुलकर्णी यांच्यासह अन्य विद्यार्थी उपस्थित होते.स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘मूठभर धान्य, पोटभर अन्न’ उपक्रमांतर्गत जमवलेले धान्य अनाथ मुलांच्या आश्रमास देताना शिक्षक आणि विद्यार्थी.

Web Title: Students help the orphaned children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.