शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक भाषा येण्यात विद्यार्थ्यांचे हितच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:42 IST

प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयाबाबत बहुतांश शालेय प्रमुखांनी सकारात्मकता दाखविली आहे. विद्यार्थी अन्य भाषिक असला तरी त्याला स्थानिक मराठी भाषा येणे, हे बंधनकारक न मानता त्यातील उपयुक्तता समजून घ्यावी.

माझे मतनाशिक : प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयाबाबत बहुतांश शालेय प्रमुखांनी सकारात्मकता दाखविली आहे. विद्यार्थी अन्य भाषिक असला तरी त्याला स्थानिक मराठी भाषा येणे, हे बंधनकारक न मानता त्यातील उपयुक्तता समजून घ्यावी. कारण त्यात विद्यार्थ्यांचे अधिक प्रमाणात हित असल्याचा सूर नाशिक महानगरातील विविध शाळांच्या प्रमुखांनी व्यक्त केला.शाळांमध्ये मराठीची सक्ती हा प्रस्तावित निर्णय अत्यंत आवश्यक होता. अन्य अनेक राज्यांमध्ये तेथील भाषा शिकणे बंधनकारक असल्याने महाराष्ट्रातदेखील तो निर्णय होणे अपेक्षितच होते. शासनाने योग्य दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. मात्र, महाराष्टÑातील मराठी माणसांनी व्यवहारातदेखील मराठी भाषेचा वापर केला तरच मराठी टिकू शकेल. त्यामुळे मराठी भाषेचा व्यावहारिक उपयोग अधिकाधिक कसा करता येईल, त्याचादेखील गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.- प्रा. दिलीप फडके, शिक्षणतज्ज्ञप्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषाबंधनकारक करायलाच हवी, असे माझेदेखील मत आहे. आपण अन्य देशांच्या भाषा शिकू शकतो, तर जिथे राहतो तेथील भाषा शिकण्यास कोणतीच अडचण नसावी. स्थानिक भाषा शिकणे हा त्या भाषेचा सन्मान असतो, तसेच मुलांची त्या भाषेशी आणि स्थानिकांशी भावनिक जवळीकदेखील वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक शाळेत मराठी भाषेचा आवर्जून समावेश करायला हवा, असे मला वाटते.- रतन लथ, संचालक, फ्रावशी अकॅडमीप्रत्येक राज्यात तेथील भाषासक्ती ही करायलाच हवी, असे माझे मत आहे. एसएससी बोर्डप्रमाणेच सीबीएसई, आयसीएसईलादेखील मराठी बंधनकारक करण्याच्या निर्णयाचे स्वागतच व्हायला हवे. महाराष्टÑात राहताना मराठी येण्याने त्या मुलांचाच फायदा होणार असतो. त्यामुळे इतर भाषिक असले तरी ते समाजात सहजतेने मिसळू शकतात.- विजयालक्ष्मी मणेरीकर, संचालक,ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलकोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी स्थानिक भाषांचे महत्त्व खूप असते. त्यामुळे त्याची सक्ती वाटून न घेता, ती संधी मानत शिकायला हवी. जी मुले अधिकाधिक भाषा शिकतात, त्यांचे ज्ञान अधिकाधिक समृद्ध होत जाते. त्यासाठी गत शतकात विदेशात गेलेल्या भारतीयांची उदाहरणेदेखील नजरेसमोर ठेवता येतील. तसेच बालवयात मुलांना भाषेचे आकलन अधिक झटकन होत असल्याने बालपणापासून माध्यमिक शाळेपर्यंत मराठी भाषा बंधनकारक केली तरी त्याचे स्वागतच होईल.- स्वामिनी वाघ, मुख्याध्यापक, बॉइज टाउन स्कूल

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा