शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक भाषा येण्यात विद्यार्थ्यांचे हितच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:42 IST

प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयाबाबत बहुतांश शालेय प्रमुखांनी सकारात्मकता दाखविली आहे. विद्यार्थी अन्य भाषिक असला तरी त्याला स्थानिक मराठी भाषा येणे, हे बंधनकारक न मानता त्यातील उपयुक्तता समजून घ्यावी.

माझे मतनाशिक : प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयाबाबत बहुतांश शालेय प्रमुखांनी सकारात्मकता दाखविली आहे. विद्यार्थी अन्य भाषिक असला तरी त्याला स्थानिक मराठी भाषा येणे, हे बंधनकारक न मानता त्यातील उपयुक्तता समजून घ्यावी. कारण त्यात विद्यार्थ्यांचे अधिक प्रमाणात हित असल्याचा सूर नाशिक महानगरातील विविध शाळांच्या प्रमुखांनी व्यक्त केला.शाळांमध्ये मराठीची सक्ती हा प्रस्तावित निर्णय अत्यंत आवश्यक होता. अन्य अनेक राज्यांमध्ये तेथील भाषा शिकणे बंधनकारक असल्याने महाराष्ट्रातदेखील तो निर्णय होणे अपेक्षितच होते. शासनाने योग्य दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. मात्र, महाराष्टÑातील मराठी माणसांनी व्यवहारातदेखील मराठी भाषेचा वापर केला तरच मराठी टिकू शकेल. त्यामुळे मराठी भाषेचा व्यावहारिक उपयोग अधिकाधिक कसा करता येईल, त्याचादेखील गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.- प्रा. दिलीप फडके, शिक्षणतज्ज्ञप्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषाबंधनकारक करायलाच हवी, असे माझेदेखील मत आहे. आपण अन्य देशांच्या भाषा शिकू शकतो, तर जिथे राहतो तेथील भाषा शिकण्यास कोणतीच अडचण नसावी. स्थानिक भाषा शिकणे हा त्या भाषेचा सन्मान असतो, तसेच मुलांची त्या भाषेशी आणि स्थानिकांशी भावनिक जवळीकदेखील वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक शाळेत मराठी भाषेचा आवर्जून समावेश करायला हवा, असे मला वाटते.- रतन लथ, संचालक, फ्रावशी अकॅडमीप्रत्येक राज्यात तेथील भाषासक्ती ही करायलाच हवी, असे माझे मत आहे. एसएससी बोर्डप्रमाणेच सीबीएसई, आयसीएसईलादेखील मराठी बंधनकारक करण्याच्या निर्णयाचे स्वागतच व्हायला हवे. महाराष्टÑात राहताना मराठी येण्याने त्या मुलांचाच फायदा होणार असतो. त्यामुळे इतर भाषिक असले तरी ते समाजात सहजतेने मिसळू शकतात.- विजयालक्ष्मी मणेरीकर, संचालक,ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलकोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी स्थानिक भाषांचे महत्त्व खूप असते. त्यामुळे त्याची सक्ती वाटून न घेता, ती संधी मानत शिकायला हवी. जी मुले अधिकाधिक भाषा शिकतात, त्यांचे ज्ञान अधिकाधिक समृद्ध होत जाते. त्यासाठी गत शतकात विदेशात गेलेल्या भारतीयांची उदाहरणेदेखील नजरेसमोर ठेवता येतील. तसेच बालवयात मुलांना भाषेचे आकलन अधिक झटकन होत असल्याने बालपणापासून माध्यमिक शाळेपर्यंत मराठी भाषा बंधनकारक केली तरी त्याचे स्वागतच होईल.- स्वामिनी वाघ, मुख्याध्यापक, बॉइज टाउन स्कूल

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा