शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एस.टी.चा ‘टोल फ्री’ क्रमांक वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:23 IST

राज्य परिवहन महामंडळात सुरू असलेल्या भरतीप्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप आणि प्रलोभनाची शक्यता गृहीत धरून महामंडळाने तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. मात्र हा क्रमांक दीर्घकाळ प्रतीक्षेवर राहत असल्यामुळे तक्रारकर्त्यांच्या तक्रारीबाबत महामंडळाकडून निव्वळ औपचारिकता पार पाडली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळात सुरू असलेल्या भरतीप्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप आणि प्रलोभनाची शक्यता गृहीत धरून महामंडळाने तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. मात्र हा क्रमांक दीर्घकाळ प्रतीक्षेवर राहत असल्यामुळे तक्रारकर्त्यांच्या तक्रारीबाबत महामंडळाकडून निव्वळ औपचारिकता पार पाडली जात असल्याचा आरोप केला जात आहे.एस.टी. महामंडळाकडून सुरू असलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरतीप्रक्रि येत उमेदवार व त्यांच्या नातेवाइकांनी प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे भरतीप्रक्रि येला सामोरे जावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना केले आहे. उमेदवारांना भरती प्रक्रियेबद्दल काही शंका अथवा तक्र ार असल्यास, सबळ पुराव्याच्या आधारे १८००१२१८४१४ या नि:शुल्क दूरध्वनी क्र मांकावर संपर्क साधून आपली तक्र ार नोंद करावी, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. मात्र हा क्रमांकच वेटिंगवर असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे.गेल्या २४ फेब्रुवारी रोजी राज्याच्या २१ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८ हजार २२ चालक तथा वाहक पदासाठी लेखी परीक्षा पार पडली. त्यातील उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रि या सुरू असून, यापैकी पात्र उमेदवारांना संगणकीय चालन परीक्षेसाठी बोलाविण्यात येणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा व संगणकीय चालन परीक्षा यांच्या संयुक्त गुणतालिकेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. असे असतानाही अनेक उमेदवारांना प्रलोभन दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्याने महामंडळाने तक्रार करण्यासाठीची व्यवस्था केलेली असल्याचा दावा केला आहे.आमिष दाखविलेयेत्या १७, १८ व १९ मे रोजी विविध वर्ग १ व २ च्या अधिकारी पदासाठी होणाऱ्या लेखी परीक्षेबाबतदेखील उमेदवारांना त्रयस्थ व्यक्तीकडून आमिष दाखविण्यात आले तर त्यांनाही टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु ही यंत्रणा किती कुचकामी आहे याची प्रचिती अनेकांना आलेली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक