शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षातून बळ !

By किरण अग्रवाल | Updated: October 14, 2018 01:34 IST

कॉँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सत्ताधाऱ्यांविरोधातील रान उठवून तर गेलीच, शिवाय स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांना बळही देऊन गेल्याचे म्हणता यावे. कारण, सत्ताधाºयांच्या प्रचार तंत्रापुढे आपला निभाव लागणार नाही, असे दडपण बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये या यात्रेमुळे आश्वासकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्देकुठल्याच पातळीवरची सत्ता नसल्याने कमालीची मरगळ आलेली होती.जनसंघर्ष यात्रेसाठीही झाडून सारे नेते एकत्र आलेले दिसून आले.

कॉँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सत्ताधाऱ्यांविरोधातील रान उठवून तर गेलीच, शिवाय स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांना बळही देऊन गेल्याचे म्हणता यावे. कारण, सत्ताधाºयांच्या प्रचार तंत्रापुढे आपला निभाव लागणार नाही, असे दडपण बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये या यात्रेमुळे आश्वासकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.

खरे तर स्थानिक काँग्रेसचे रडगाणे हे कोळसा उगाळावा तितका काळाच, अशा स्वरूपाचे राहिले आहे. नेत्यांच्या आपापसातील वर्चस्ववादामुळे कार्यकर्ते परागंदा झाले आहेत. त्यात कुठल्याच पातळीवरची म्हणजे, केंद्रात, राज्यात, स्थानिक महापालिकेत अगर जिल्हा परिषदेत सत्ता नसल्याने कमालीची मरगळ आलेली होती. पण, अलीकडच्या काळात विविध कार्यक्रम-उपक्रमांच्या निमित्ताने पक्षीय सक्रियता वाढून ही मरगळ झटकली गेल्याचे दिसून येत आहे. जनसंघर्ष यात्रेसाठीही झाडून सारे नेते एकत्र आलेले दिसून आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याच्या बाबीचा समाचार घेताना नाशिककरांना ‘बाबाजी का ठुल्लू’ मिळाल्याचे सांगत आक्रमकपणे तोफ डागली, तर दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राफेलप्रश्नी गोदाकिनारी आमने-सामने चर्चा करण्याचे आव्हान संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना दिले. स्थानिक प्रश्नांच्या संदर्भाने केली गेलेली टीका जशी लोकाधार मिळवून देणारी ठरली तशी, स्थानिक नेते विनायकदादा पाटील, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, आमदार निर्मला गावित, माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ आदींची यावेळची उपस्थितीही नजरेत भरणारी ठरली. एरव्ही एवढे सारे नेते एकजिनसीपणे पक्षाच्या व्यासपीठावर अपवादानेच आढळत. त्यामुळे सत्ताधाºयांशी संघर्षाचे रणशिंग फुंकणाºया या यात्रेच्या माध्यमातून पक्ष-कार्यकर्त्यांमध्ये आश्वासकतेचे बळ निर्माण झाले नसते तर नवल ! आता ही आश्वासकता टिकवून ठेवता आली पाहिजे. त्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते असेच एकोप्याने राहतात का, हेच बघायचे !

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण