शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

संघर्षातून बळ !

By किरण अग्रवाल | Updated: October 14, 2018 01:34 IST

कॉँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सत्ताधाऱ्यांविरोधातील रान उठवून तर गेलीच, शिवाय स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांना बळही देऊन गेल्याचे म्हणता यावे. कारण, सत्ताधाºयांच्या प्रचार तंत्रापुढे आपला निभाव लागणार नाही, असे दडपण बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये या यात्रेमुळे आश्वासकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्देकुठल्याच पातळीवरची सत्ता नसल्याने कमालीची मरगळ आलेली होती.जनसंघर्ष यात्रेसाठीही झाडून सारे नेते एकत्र आलेले दिसून आले.

कॉँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सत्ताधाऱ्यांविरोधातील रान उठवून तर गेलीच, शिवाय स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांना बळही देऊन गेल्याचे म्हणता यावे. कारण, सत्ताधाºयांच्या प्रचार तंत्रापुढे आपला निभाव लागणार नाही, असे दडपण बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये या यात्रेमुळे आश्वासकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.

खरे तर स्थानिक काँग्रेसचे रडगाणे हे कोळसा उगाळावा तितका काळाच, अशा स्वरूपाचे राहिले आहे. नेत्यांच्या आपापसातील वर्चस्ववादामुळे कार्यकर्ते परागंदा झाले आहेत. त्यात कुठल्याच पातळीवरची म्हणजे, केंद्रात, राज्यात, स्थानिक महापालिकेत अगर जिल्हा परिषदेत सत्ता नसल्याने कमालीची मरगळ आलेली होती. पण, अलीकडच्या काळात विविध कार्यक्रम-उपक्रमांच्या निमित्ताने पक्षीय सक्रियता वाढून ही मरगळ झटकली गेल्याचे दिसून येत आहे. जनसंघर्ष यात्रेसाठीही झाडून सारे नेते एकत्र आलेले दिसून आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याच्या बाबीचा समाचार घेताना नाशिककरांना ‘बाबाजी का ठुल्लू’ मिळाल्याचे सांगत आक्रमकपणे तोफ डागली, तर दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राफेलप्रश्नी गोदाकिनारी आमने-सामने चर्चा करण्याचे आव्हान संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना दिले. स्थानिक प्रश्नांच्या संदर्भाने केली गेलेली टीका जशी लोकाधार मिळवून देणारी ठरली तशी, स्थानिक नेते विनायकदादा पाटील, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, आमदार निर्मला गावित, माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ आदींची यावेळची उपस्थितीही नजरेत भरणारी ठरली. एरव्ही एवढे सारे नेते एकजिनसीपणे पक्षाच्या व्यासपीठावर अपवादानेच आढळत. त्यामुळे सत्ताधाºयांशी संघर्षाचे रणशिंग फुंकणाºया या यात्रेच्या माध्यमातून पक्ष-कार्यकर्त्यांमध्ये आश्वासकतेचे बळ निर्माण झाले नसते तर नवल ! आता ही आश्वासकता टिकवून ठेवता आली पाहिजे. त्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते असेच एकोप्याने राहतात का, हेच बघायचे !

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण