शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

संघर्षातून बळ !

By किरण अग्रवाल | Updated: October 14, 2018 01:34 IST

कॉँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सत्ताधाऱ्यांविरोधातील रान उठवून तर गेलीच, शिवाय स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांना बळही देऊन गेल्याचे म्हणता यावे. कारण, सत्ताधाºयांच्या प्रचार तंत्रापुढे आपला निभाव लागणार नाही, असे दडपण बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये या यात्रेमुळे आश्वासकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्देकुठल्याच पातळीवरची सत्ता नसल्याने कमालीची मरगळ आलेली होती.जनसंघर्ष यात्रेसाठीही झाडून सारे नेते एकत्र आलेले दिसून आले.

कॉँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सत्ताधाऱ्यांविरोधातील रान उठवून तर गेलीच, शिवाय स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांना बळही देऊन गेल्याचे म्हणता यावे. कारण, सत्ताधाºयांच्या प्रचार तंत्रापुढे आपला निभाव लागणार नाही, असे दडपण बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये या यात्रेमुळे आश्वासकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.

खरे तर स्थानिक काँग्रेसचे रडगाणे हे कोळसा उगाळावा तितका काळाच, अशा स्वरूपाचे राहिले आहे. नेत्यांच्या आपापसातील वर्चस्ववादामुळे कार्यकर्ते परागंदा झाले आहेत. त्यात कुठल्याच पातळीवरची म्हणजे, केंद्रात, राज्यात, स्थानिक महापालिकेत अगर जिल्हा परिषदेत सत्ता नसल्याने कमालीची मरगळ आलेली होती. पण, अलीकडच्या काळात विविध कार्यक्रम-उपक्रमांच्या निमित्ताने पक्षीय सक्रियता वाढून ही मरगळ झटकली गेल्याचे दिसून येत आहे. जनसंघर्ष यात्रेसाठीही झाडून सारे नेते एकत्र आलेले दिसून आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याच्या बाबीचा समाचार घेताना नाशिककरांना ‘बाबाजी का ठुल्लू’ मिळाल्याचे सांगत आक्रमकपणे तोफ डागली, तर दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राफेलप्रश्नी गोदाकिनारी आमने-सामने चर्चा करण्याचे आव्हान संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना दिले. स्थानिक प्रश्नांच्या संदर्भाने केली गेलेली टीका जशी लोकाधार मिळवून देणारी ठरली तशी, स्थानिक नेते विनायकदादा पाटील, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, आमदार निर्मला गावित, माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ आदींची यावेळची उपस्थितीही नजरेत भरणारी ठरली. एरव्ही एवढे सारे नेते एकजिनसीपणे पक्षाच्या व्यासपीठावर अपवादानेच आढळत. त्यामुळे सत्ताधाºयांशी संघर्षाचे रणशिंग फुंकणाºया या यात्रेच्या माध्यमातून पक्ष-कार्यकर्त्यांमध्ये आश्वासकतेचे बळ निर्माण झाले नसते तर नवल ! आता ही आश्वासकता टिकवून ठेवता आली पाहिजे. त्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते असेच एकोप्याने राहतात का, हेच बघायचे !

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण