शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

कळसुबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्यात राज्यप्राणी शेकरूची वाढ दमदार; गतवर्षापेक्षा संख्या वाढली 

By अझहर शेख | Updated: June 15, 2023 17:53 IST

राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तीन वनपरिमंडळातील जंगलात ही प्रगणना राबविण्यात आली.

नाशिक : राज्यप्राणी शेकरूची कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात चांगली वाढ होत असल्याचे निरीक्षण नाशिक वन्यजीव विभागाने नोंदविले आहे. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी शेकरूंची संख्या वाढली असून पंधरा दिवसांच्या प्रगणनेत १४६ शेकरूंची मोजदाद वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. या दरम्यान, ५४ शेकरूंनी वनकर्मचाऱ्यांना प्रत्यक्षरीत्या दर्शन दिले. राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तीन वनपरिमंडळातील जंगलात ही प्रगणना राबविण्यात आली.

नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीतील अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य हे शेकरूंच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी राजूर, भंडारदरा वनपरिक्षेत्रांमध्ये शेकरूंच्या प्रगणनेचा उपक्रम वन्यजीव विभागामार्फत राबविला जातो. उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या आदेशान्वये राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्या पथकाने येथील काेथळे देवराई, पाचनई, लव्हाळी, कोतुळ, अंबित, कुमशेत या भागांतील जंगलांमध्ये प्रत्यक्ष दिसणाऱ्या शेकरूंसह व त्यांच्या घरट्यांचे निरीक्षण करण्यात आले. एकूण ५४ शेकरूंनी प्रत्यक्षरीत्या दर्शन दिले. चांदा, करंबू, आळीव, करप, जांभूळ, हिरडा, कोभोळ, आवळा, उंबर, गेळ, येहळा, शेंदरी, लोध, गुळचाई, पिंपर, आशिंद, आंबा या झाडांना शेकरूंची पसंती असल्याचे दिसून आले.

...यंदा नवीन घरट्यांमध्ये वाढ

यंदा अभयारण्यात शेकरूंच्या नव्या घरट्यांची संख्या वाढलेली दिसून आली. तसेच गतवर्षी सोडलेल्या जुन्या घरट्यांचा आकडा जास्त होता; मात्र यावर्षी वापरात असलेल्या जुन्या घरट्यांचा आकडा त्या तुलनेत जास्त असून ही दिलासादायक बाब मानली जात आहे. यामुळे शेकरूंचा या अभयारण्यास अधिवास समृद्ध होत असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षी प्रत्यक्षरीत्या केवळ ४७ शेकरू दिसले होते. तसेच नवीन घरटे केवळ १७७ तर जुने वापरात असलेली घरटी १३५ इतकी होती.

..अशी झाली प्रगणनाअभयारण्यातील निश्चित केलेल्या जंगलातील झाडांना क्रमांक देण्यात आले. प्रत्येक झाडावर क्रमांक लिहिला गेला. तसेच जीपीएस रीडिंग घेत शेकरूंचे त्या झाडांवरील अधिवासाबाबतचे निरीक्षण वनपाल, वनरक्षक, वनमजुरांकडून नोंदविण्यात आले. राजूर वनपरिक्षेत्रातील तीनही वनपरिमंडळात सुमारे दहा ते पंधरा दिवस प्रगणना घेण्यात आली. पाच घरटे म्हणजे एक शेकरूचे वास्तव्य याप्रमाणे मोजदाद केली गेली.

प्रगणनेची आकडेवारी अशी..

राऊंड- प्रत्यक्ष दिसलेले - नवे घरटे- जुने घरटे- सोडलेले घरटेकोथळे- ३४------------- १२९------- ८७-------३७

पाचनई- १६-------------१११----------- ७६-------१९अंबित- ०४-------------२०-----------२२---------०५

एकूण = ५४------------२६०----------१८५-------६१ 

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रforestजंगल