कळवण शहरात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:14 IST2021-03-21T04:14:13+5:302021-03-21T04:14:13+5:30
कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या जिल्हा प्रशासनाने प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ...

कळवण शहरात कडकडीत बंद
कळवण :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या जिल्हा प्रशासनाने प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील व तालुक्यातील व्यापारी व व्यावसायिक बांधवानी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व दुकाने बंद ठेवली. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
शहरात सर्वत्र सामसूम दिसून आल्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असला तरी व्यापारी बांधवाची बंदच्या निर्णयावर नाराजी आहे.
दरम्यान शहरात आजमितीस ३५ कोरोनाबाधित रुग्णाचा शासकीय आकडा असून खासगी औषधोपचार करून घरात क्वॉरंटाईन असणाऱ्या बाधितांचा आकडा अधिक आहे. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांना व व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर पोलीस व नगरपंचायत प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शनिवार व रविवार बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणीमात्रासाठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे किराणा, दूध व वृत्तपत्रे वितरण मात्र सुरू होते तरी त्या व्यावसायिकांना बंदचा परिणाम जाणवला.
कळवण शहरात व तालुक्यात आजमितीस ७८ रुग्ण असून खासगी दवाखान्यात औषधोपचार घेऊन घरात होम क्वॉरंटाईन असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे जनता चांगलीच हादरली आहे. शनिवारी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, सुभाष पेठ,शिवाजीनगर, गणेशनगर, बसस्थानक, जुना ओतूर रोड, गांधी चौक, अंबिका चौक, फुलाबाई चौक, नेहरू चौक, ओतूररोड, परिसरात आज सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. कळवणकरानी घरात राहणे पसंत केल्यामुळे रस्त्यावर नीरव शांतता होती शिवाय अभोणा व कनाशी गावामध्ये शांतता दिसून आली.
----------------
रस्त्यांवर शुकशुकाट
जीवनावश्यक वस्तू मेडिकल दुकान वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यामुळे कळवण शहरात व्यापारी व व्यावसायिक यांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवली त्यामुळे शहरातील रस्त्यांवर नीरव शांतता दिसून आली. कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी कळवणकरानी कंबर कसल्याचे दिसून आले.
मास्कशिवाय वावर,पोलीस नगरपंचायतकडून दंड - कोरोनाचे संकट वाढत असताना एकीकडे प्रशासनाकडून जिल्हाभरात कडक कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर अनेक दुचाकी चालकांनी हेल्मेट अथवा मास्कचा वापर करीत नसल्याचे चित्र पाहायला मिळते या पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी शहरात पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. विनामास्क व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक व भाजीपाला विक्रेते यांना दंड आकारण्यात येऊन दंडात्मक कारवाई केली. (२० कळवण १/२)
===Photopath===
200321\20nsk_1_20032021_13.jpg
===Caption===
२० कळवण१/२