शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

किन्नराच्या एका लग्नाची आगळीवेगळी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 01:00 IST

असे म्हणतात की,   लग्नाच्या  रेशीम गाठी या  स्वर्गात बांधल्या जातात... अशाच जुळून आलेल्या आगळ्या वेगळ्या  रेशीम गाठीची  मनमाड  शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे. एका अर्थाने या सोहळ्याला क्रांतिकारी विवाह सोहळा म्हणावा लागेल.   हा एक पुरुषाने एका स्त्रीशी केलेला विवाह नव्हे तर ही आहे एका पुरुषाने एका तृतीय पंथीय अर्थात किन्नराशी घेतलेल्या सात फेऱ्यांची  कहाणी आहे. 

ठळक मुद्देपरंपरा झुगारून घेतला क्रांतिकारी निर्णय

मनमाड :  असे म्हणतात की,   लग्नाच्या  रेशीम गाठी या  स्वर्गात बांधल्या जातात... अशाच जुळून आलेल्या आगळ्या वेगळ्या  रेशीम गाठीची  मनमाड  शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे. एका अर्थाने या सोहळ्याला क्रांतिकारी विवाह सोहळा म्हणावा लागेल.   हा एक पुरुषाने एका स्त्रीशी केलेला विवाह नव्हे तर ही आहे एका पुरुषाने एका तृतीय पंथीय अर्थात किन्नराशी घेतलेल्या सात फेऱ्यांची  कहाणी आहे. रूढी-परंपरांचे सामाजिक बंधने झुगारून एका तरुणाने त्याची प्रेयसी असलेल्या किन्नराच्या गळ्यात सर्वांच्या  साक्षीने वरमाला घालून मंगळसूत्र बांधले आहे. हा आगळावेगळा विवाह सध्या सर्वत्र  चर्चेचा विषय ठरला आहे. मनमाड शहरातील किन्नरांच्या महंत शिवलक्ष्मी आणि येवला तालुक्यातील तरुण संजय झाल्टे यांची टिकटॉकच्या माध्यमातून ओळख झाली. नकळत या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला. मात्र, समाज आणि लोक काय म्हणतील, असा विचार  दोघांच्याही मनात आला असला तरी प्रेमाच्या ताकदीपुढे हा विचार  टिकाव धरू शकला नाही. अखेर दोघे विवाहबंधनात अडकले ते आयुष्यभर एकमेकांना साथ देण्यासाठी. दोघांच्याही परिवाराने दिली संमती दोघांनी आपापल्या परीने प्रयत्न करून घरच्या लोकांना पटवून दिले की, ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यांचे  एकमेकांवरील प्रेम पाहून अखेर दोघांच्या परिवारातील सदस्यांनी लग्नाला होकार दिला. त्यानंतर महंत शिवलक्ष्मी व  संजय झाल्टे या दोघांचा मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूर येथील नागेश्वर महादेव मंदिरात लग्नसोहळा पार पडला. यावेळी दोघांच्या घरातील काही मंडळी आणि मोजके मित्र उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिकmarriageलग्न