शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

Nashik ST Accident Video: विचित्र दुर्घटना... नशिबाने अन् स्थानिकांमुळेच वाचले ४३ प्रवासी, बस जळून खाक

By अझहर शेख | Updated: December 8, 2022 14:24 IST

बसमधील ४३ प्रवाशांच्या जीवाला या दुर्घटनेत धोका निर्माण झाला असता. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली. 

नाशिक - ऑक्टोबर महिन्यातच नाशिकजवळील तपोवन येथे बसला आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत १३ जणांना मृत्यू झाला होता. त्यानंतर, आजही तसाच विचित्र अपघात नाशिकपासून ६ ते ७ किमी अंतरावर घडला आहे. सुदैवाने, स्थानिकांच्या मदतीने बसमधील सर्वच प्रवासी बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या दुर्घटनेत २ दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर आहे. तर, बसमधील ८ प्रवासी किरकोळ जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच महापालिका, जिल्हा आणि पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र, या अपघाताचा घटनाक्रम ऐकून अनेकांच्या मुखातून नशिबच... असा शब्द आपसूकच बाहेर पडतोय. कारण, थोडाजरी विलंब झाला असता तर बसमधील ४३ प्रवाशांच्या जीवाला या दुर्घटनेत धोका निर्माण झाला असता. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली. 

राज्य परिवहन महामंडळाची एम एच १४ बीटी ३६३५ ही विठाई बस पळशे चौफुलीच्या बस थांब्यावर थांबली. तेथे त्यातून काही प्रवासी उतरत होते, त्याचवेळी पाठीमागून दुसरी बस, जी पुणे राजगुरुनगर-नाशिक (एमएच. ०७ सी ७०८१ ) असा प्रवास करत आली होती. या बसने बस थांब्यावर उभ्या असलेल्या विठाई बसला जोरदार धडक दिली. त्यावेळी, या दोन्ही बसच्या मधोमध उभे असलेल्या ३ दुचाकीस्वार हे बसमध्ये दाबले गेले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, बसमध्ये अडकलेल्या दुचाकीला स्पार्किंग होऊन बसने पेट घेतला. तत्पूर्वी दोन बस एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला होता. या आवाजामुळे स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी बसकडे धाव घेतली. यावेळी, पुण्याहून आलेल्या बसमध्ये ४३ प्रवासी होते, या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी उपस्थितांना त्या बसच्या दरवाजा, खिडक्याच्या काच्या आणि मागील दरवाजा फोडण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यामुळे, बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. बसमधील प्रवाशांना मुक्का मार लागला असून ८ जण जखमी झाले आहेत.  

बस चालकाशी संवाद

दरम्यान, राजगुरुनगर-नाशिक बसचे बसचालक राजेंद्र अंबादास उईके, महिला वाहक आशा शेळके दोघेही सुखरुप आहेत. पळसे चौफुलीच्या बस थांब्याजवळील गतीरोधक पाहून मी बसचा ब्रेक दाबला, पण बसचा ब्रेक न लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरील बसवर ही बस धडकली, असे बसचालक राजेंद्र उईके यांनी लोकमतच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

ऑक्टोबर महिन्यातही बस जळाली

विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात नाशिक शहराजवळच औरंगाबाद महामार्गावरील तपोवन येथे एका खासगी बसला  असाच भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, या घटनेनं महाराष्ट्र हादरला होता. सुदैवाने आज या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली. मात्र,, या घटनेवरुन भीषणता आणि  तीव्रता दिसून येती. 

बस अपघातात जखमी झालेल्या राजगुरू नगर-नाशिक बस मधील प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे

हर्षदा मंगेस पोंदे, संगमनेररुपाली सचिन दिवटे, अकोलेसमृद्धी सचिन दिवटेसईदा इनामदार, संगमनेरमुस्तफा शेख, संगमनेरनसमा जहाँगिरदार, संगमनेरऔवेस अहमद, धारावी मुंबईसिताराम देवराम कुरणे, सिकर

या सर्व प्रवाशांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकBus Driverबसचालक