शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Nashik ST Accident Video: विचित्र दुर्घटना... नशिबाने अन् स्थानिकांमुळेच वाचले ४३ प्रवासी, बस जळून खाक

By अझहर शेख | Updated: December 8, 2022 14:24 IST

बसमधील ४३ प्रवाशांच्या जीवाला या दुर्घटनेत धोका निर्माण झाला असता. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली. 

नाशिक - ऑक्टोबर महिन्यातच नाशिकजवळील तपोवन येथे बसला आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत १३ जणांना मृत्यू झाला होता. त्यानंतर, आजही तसाच विचित्र अपघात नाशिकपासून ६ ते ७ किमी अंतरावर घडला आहे. सुदैवाने, स्थानिकांच्या मदतीने बसमधील सर्वच प्रवासी बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या दुर्घटनेत २ दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर आहे. तर, बसमधील ८ प्रवासी किरकोळ जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच महापालिका, जिल्हा आणि पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र, या अपघाताचा घटनाक्रम ऐकून अनेकांच्या मुखातून नशिबच... असा शब्द आपसूकच बाहेर पडतोय. कारण, थोडाजरी विलंब झाला असता तर बसमधील ४३ प्रवाशांच्या जीवाला या दुर्घटनेत धोका निर्माण झाला असता. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली. 

राज्य परिवहन महामंडळाची एम एच १४ बीटी ३६३५ ही विठाई बस पळशे चौफुलीच्या बस थांब्यावर थांबली. तेथे त्यातून काही प्रवासी उतरत होते, त्याचवेळी पाठीमागून दुसरी बस, जी पुणे राजगुरुनगर-नाशिक (एमएच. ०७ सी ७०८१ ) असा प्रवास करत आली होती. या बसने बस थांब्यावर उभ्या असलेल्या विठाई बसला जोरदार धडक दिली. त्यावेळी, या दोन्ही बसच्या मधोमध उभे असलेल्या ३ दुचाकीस्वार हे बसमध्ये दाबले गेले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, बसमध्ये अडकलेल्या दुचाकीला स्पार्किंग होऊन बसने पेट घेतला. तत्पूर्वी दोन बस एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला होता. या आवाजामुळे स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी बसकडे धाव घेतली. यावेळी, पुण्याहून आलेल्या बसमध्ये ४३ प्रवासी होते, या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी उपस्थितांना त्या बसच्या दरवाजा, खिडक्याच्या काच्या आणि मागील दरवाजा फोडण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यामुळे, बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. बसमधील प्रवाशांना मुक्का मार लागला असून ८ जण जखमी झाले आहेत.  

बस चालकाशी संवाद

दरम्यान, राजगुरुनगर-नाशिक बसचे बसचालक राजेंद्र अंबादास उईके, महिला वाहक आशा शेळके दोघेही सुखरुप आहेत. पळसे चौफुलीच्या बस थांब्याजवळील गतीरोधक पाहून मी बसचा ब्रेक दाबला, पण बसचा ब्रेक न लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरील बसवर ही बस धडकली, असे बसचालक राजेंद्र उईके यांनी लोकमतच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

ऑक्टोबर महिन्यातही बस जळाली

विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात नाशिक शहराजवळच औरंगाबाद महामार्गावरील तपोवन येथे एका खासगी बसला  असाच भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, या घटनेनं महाराष्ट्र हादरला होता. सुदैवाने आज या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली. मात्र,, या घटनेवरुन भीषणता आणि  तीव्रता दिसून येती. 

बस अपघातात जखमी झालेल्या राजगुरू नगर-नाशिक बस मधील प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे

हर्षदा मंगेस पोंदे, संगमनेररुपाली सचिन दिवटे, अकोलेसमृद्धी सचिन दिवटेसईदा इनामदार, संगमनेरमुस्तफा शेख, संगमनेरनसमा जहाँगिरदार, संगमनेरऔवेस अहमद, धारावी मुंबईसिताराम देवराम कुरणे, सिकर

या सर्व प्रवाशांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकBus Driverबसचालक