शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

पाणी सोडण्यास पाटबंधारेला तगादा

By admin | Updated: October 31, 2015 22:31 IST

बंदोबस्त मागविला : प्रशासनाचे हातावर हात

नाशिक : जायकवाडीसाठी जिल्ह्यातील धरणांमधून पिण्यासाठी किती पाणी सोडायचे याबद्दल उच्च न्यायालयाने कोणतेही स्पष्ट आदेश दिलेले नसताना निव्वळ न्यायालयाचा आधार घेऊन मराठवाड्यातील पुढाऱ्यांनी पाटबंधारे खात्यावर पाणी सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली असून, राज्य शासनाच्या आदेशान्वये धरणे जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याने जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात कोणताही निर्णय न घेतल्यामुळे पाटबंधारे खाते कोंडीत सापडले आहे. परंतु पाणी सोडण्यासाठी येणारा दबाव पाहता, पोलीस बंदोबस्ताची मागणी पाटबंधारे खात्याने केली आहे. नाशिक व नगर या जिल्ह्यांतील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी तातडीने बैठक घेऊन उच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार जायकवाडीत पिण्यासाठी नेमके किती पाणी सोडायचे याबाबतचे सुधारित आदेश येत नाही तोपर्यंत नगरच्या धरणांमधून पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नाशिकचे जिल्हाधिकारी परदेशात असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत कामकाज पाहणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांना तो अधिकार नाही, त्यामुळे पाटबंधारे खात्याचीही कोंडी झाली आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी यासंदर्भात ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत पाटबंधारे खाते जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या पूर्वीच्याच आदेशावर कायम राहील, तसे झाल्यास न्यायालयाने इतके स्पष्टपणे आदेश देऊनही जिल्ह्यातील पाणी वाचणे शक्य होणार नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. उलट शुक्रवारी न्यायालयाचे आदेश जाहीर होताच, मराठवाड्यातील राजकीय पुढारी व अधिकाऱ्यांकडून पाणी सोडण्याचा तगादा लावला जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात ठोस भूमिका घेतली जात नसल्यामुळे जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशान्वये गंगापूर व गिरणा खोऱ्यातून पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने केली असून, धरणातून पाणी सोडताना विरोध होऊन कायदा व सुरव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून व्यापक पोलीस बंदोबस्त मिळावा, असे पत्र पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी नगर-नाशिक पाणी कृती समितीची होणारी बैठक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीमुळे स्थगित करण्यात आली आहे. शनिवारी ही बैठक होणार होती.