शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

पाणी सोडण्यास पाटबंधारेला तगादा

By admin | Updated: October 31, 2015 22:31 IST

बंदोबस्त मागविला : प्रशासनाचे हातावर हात

नाशिक : जायकवाडीसाठी जिल्ह्यातील धरणांमधून पिण्यासाठी किती पाणी सोडायचे याबद्दल उच्च न्यायालयाने कोणतेही स्पष्ट आदेश दिलेले नसताना निव्वळ न्यायालयाचा आधार घेऊन मराठवाड्यातील पुढाऱ्यांनी पाटबंधारे खात्यावर पाणी सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली असून, राज्य शासनाच्या आदेशान्वये धरणे जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याने जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात कोणताही निर्णय न घेतल्यामुळे पाटबंधारे खाते कोंडीत सापडले आहे. परंतु पाणी सोडण्यासाठी येणारा दबाव पाहता, पोलीस बंदोबस्ताची मागणी पाटबंधारे खात्याने केली आहे. नाशिक व नगर या जिल्ह्यांतील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी तातडीने बैठक घेऊन उच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार जायकवाडीत पिण्यासाठी नेमके किती पाणी सोडायचे याबाबतचे सुधारित आदेश येत नाही तोपर्यंत नगरच्या धरणांमधून पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नाशिकचे जिल्हाधिकारी परदेशात असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत कामकाज पाहणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांना तो अधिकार नाही, त्यामुळे पाटबंधारे खात्याचीही कोंडी झाली आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी यासंदर्भात ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत पाटबंधारे खाते जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या पूर्वीच्याच आदेशावर कायम राहील, तसे झाल्यास न्यायालयाने इतके स्पष्टपणे आदेश देऊनही जिल्ह्यातील पाणी वाचणे शक्य होणार नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. उलट शुक्रवारी न्यायालयाचे आदेश जाहीर होताच, मराठवाड्यातील राजकीय पुढारी व अधिकाऱ्यांकडून पाणी सोडण्याचा तगादा लावला जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात ठोस भूमिका घेतली जात नसल्यामुळे जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशान्वये गंगापूर व गिरणा खोऱ्यातून पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे खात्याने केली असून, धरणातून पाणी सोडताना विरोध होऊन कायदा व सुरव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून व्यापक पोलीस बंदोबस्त मिळावा, असे पत्र पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी नगर-नाशिक पाणी कृती समितीची होणारी बैठक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीमुळे स्थगित करण्यात आली आहे. शनिवारी ही बैठक होणार होती.