शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 00:34 IST

सटाणा : कांद्याच्या भावात दररोज घसरण सुरूच असून कांदा निर्यात खुली करून कांद्याला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी आज, मंगळवारी ...

ठळक मुद्देनामपुर : हमीभाव देण्याची मागणी; दोन तास आंदोलन

सटाणा : कांद्याच्या भावात दररोज घसरण सुरूच असून कांदा निर्यात खुली करून कांद्याला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी आज, मंगळवारी दुपारी विविध शेतकरी संघटनांसह संतप्त शेतकरी नामपूर बाजार समितीच्या गेटसमोर ठिय्या देऊन दोन तास नामपूर-मालेगाव रस्ता रोखून धरला. दरम्यान, जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

मंगळवारी दुपारी नामपूर येथील बाजार समितीच्या गेटसमोर अचानक शेतकरी संघटनेचे अर्जुन बोराडे, अभिमन पगार, दीपक पगार, शैलेश कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या देऊन ताहाराबाद-मालेगाव रस्ता रोखून धरला. यावेळी महाराष्ट्रातील शेताला कमी पाण्यावरच कमी दिवसांत (चार महिन्यांत) पैसा मिळवून देणारे कांदा हे एकमेव नगदी पीक आहे. यावर्षी योग्य हवामान व पाऊस चांगला असल्यामुळे महाराष्ट्रात उन्हाळी कांद्याचे चांगले उत्पादन झाले आहे . पण निर्यात सुरळीत नसल्यामुळे कांद्याची भारतात मागणीपेक्षा पुरवठा जास्त यामुळे कांद्याचे दर लासलगाव व पिळगावसह महाराष्ट्रातील इतर मार्केटमध्ये ५०० ते ९ ०० रुपयांपर्यंत कोसळलेले आहेत.

नफा तर दूरच राहिला. मजुरी, डिझेल, खते, औषधांच्या किमती दुपटीने वाढल्या दर मात्र निम्याने कमी झाल्यामुळे उत्पादनखर्च देखील भरून निघत नाही. इतकी शोचनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तर उभ्या पिकांवर नांगरटी करून पीक उद्ध्वस्त केली. कांदा पीक तोट्यात गेल्यामुळे कर्जबाजारी झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या पण केल्या आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.आंदोलनात नामपूर बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे, महेश सावंत, जितेंद्र सूर्यवंशी, प्रवीण सावंत, शेखर कापडणीस, शरद सावंत, आण्णा मोरे, के. पी. नाना, बिपिन सावंत, गोरख चव्हाण यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.कांद्याला भाव न मिळण्याची कारणे ..कंटेनरची भाडेवाढ श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया आणि दुबई यासारख्या आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी असूनदेखील कंटेनरच्या भाडेवाढीमुळे निर्यातदार व्यापाऱ्यांना मिळत नाही व मिळाले तर परवडत नाही म्हणून कांदा निर्यातीत सातत्य राहिले नाही. मलेशियासाठी ३० टनांच्या कंटेनरला १९०० डॉलर्सच्या जागी २५०० डॉलर्स भाडेवाढ देऊनही निर्यातदार व्यापाऱ्यांना कंटेनर मिळत नाहीत तसेच दुबईसाठी कंटेनरचे भाडे २५०० डॉलर्सऐवजी ३००० डॉलर्सपर्यंत पोहोचले यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने जर निर्यात अनुदान योग्यप्रकारे दिल्यास निर्यातदारांना दिलासा मिळेल व कांद्याची निर्वात सुरळीत होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकेल .

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप