शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 00:34 IST

सटाणा : कांद्याच्या भावात दररोज घसरण सुरूच असून कांदा निर्यात खुली करून कांद्याला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी आज, मंगळवारी ...

ठळक मुद्देनामपुर : हमीभाव देण्याची मागणी; दोन तास आंदोलन

सटाणा : कांद्याच्या भावात दररोज घसरण सुरूच असून कांदा निर्यात खुली करून कांद्याला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी आज, मंगळवारी दुपारी विविध शेतकरी संघटनांसह संतप्त शेतकरी नामपूर बाजार समितीच्या गेटसमोर ठिय्या देऊन दोन तास नामपूर-मालेगाव रस्ता रोखून धरला. दरम्यान, जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

मंगळवारी दुपारी नामपूर येथील बाजार समितीच्या गेटसमोर अचानक शेतकरी संघटनेचे अर्जुन बोराडे, अभिमन पगार, दीपक पगार, शैलेश कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या देऊन ताहाराबाद-मालेगाव रस्ता रोखून धरला. यावेळी महाराष्ट्रातील शेताला कमी पाण्यावरच कमी दिवसांत (चार महिन्यांत) पैसा मिळवून देणारे कांदा हे एकमेव नगदी पीक आहे. यावर्षी योग्य हवामान व पाऊस चांगला असल्यामुळे महाराष्ट्रात उन्हाळी कांद्याचे चांगले उत्पादन झाले आहे . पण निर्यात सुरळीत नसल्यामुळे कांद्याची भारतात मागणीपेक्षा पुरवठा जास्त यामुळे कांद्याचे दर लासलगाव व पिळगावसह महाराष्ट्रातील इतर मार्केटमध्ये ५०० ते ९ ०० रुपयांपर्यंत कोसळलेले आहेत.

नफा तर दूरच राहिला. मजुरी, डिझेल, खते, औषधांच्या किमती दुपटीने वाढल्या दर मात्र निम्याने कमी झाल्यामुळे उत्पादनखर्च देखील भरून निघत नाही. इतकी शोचनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तर उभ्या पिकांवर नांगरटी करून पीक उद्ध्वस्त केली. कांदा पीक तोट्यात गेल्यामुळे कर्जबाजारी झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या पण केल्या आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.आंदोलनात नामपूर बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे, महेश सावंत, जितेंद्र सूर्यवंशी, प्रवीण सावंत, शेखर कापडणीस, शरद सावंत, आण्णा मोरे, के. पी. नाना, बिपिन सावंत, गोरख चव्हाण यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.कांद्याला भाव न मिळण्याची कारणे ..कंटेनरची भाडेवाढ श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया आणि दुबई यासारख्या आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी असूनदेखील कंटेनरच्या भाडेवाढीमुळे निर्यातदार व्यापाऱ्यांना मिळत नाही व मिळाले तर परवडत नाही म्हणून कांदा निर्यातीत सातत्य राहिले नाही. मलेशियासाठी ३० टनांच्या कंटेनरला १९०० डॉलर्सच्या जागी २५०० डॉलर्स भाडेवाढ देऊनही निर्यातदार व्यापाऱ्यांना कंटेनर मिळत नाहीत तसेच दुबईसाठी कंटेनरचे भाडे २५०० डॉलर्सऐवजी ३००० डॉलर्सपर्यंत पोहोचले यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने जर निर्यात अनुदान योग्यप्रकारे दिल्यास निर्यातदारांना दिलासा मिळेल व कांद्याची निर्वात सुरळीत होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकेल .

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप