दुष्काळी टुरिझम थांबवा; राज ठाकरे यांचा सल्ला

By Admin | Updated: September 5, 2015 00:18 IST2015-09-05T00:17:28+5:302015-09-05T00:18:34+5:30

दुष्काळी टुरिझम थांबवा; राज ठाकरे यांचा सल्ला

Stop drought tourism; Raj Thackeray's advice | दुष्काळी टुरिझम थांबवा; राज ठाकरे यांचा सल्ला

दुष्काळी टुरिझम थांबवा; राज ठाकरे यांचा सल्ला

दुष्काळी टुरिझम थांबवा; राज ठाकरे यांचा सल्ला
नाशिक : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने सुरू केलेले दुष्काळी दौरे म्हणजे दुष्काळी टुरिझम असून हे दौरे थांबवून दुष्काळी भागातील लोकांना सर्वप्रथम सुविधा द्या, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीच केले नसल्याने त्यांना दौरे आणि आंदोलने करण्याचा अधिकारच नाही, असेही ते म्हणाले.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दौऱ्यांबाबत सत्ताधिकारी आणि विरोधक दोघांवरही टीका केली. सत्ता मिळूनही सत्ताधिकाऱ्यांची मंत्रालयात मांड बसलेले नाही. (पान ९ वर)


त्यामुळे घोषणा खूप होतात, परंतु अंमलबजावणी होते किंवा नाही याकडे बघितले जात नाही असे सांगून राज यांनी मु्ख्यमंत्र्यांना दौऱ्याविषयी बोलताना आता लोकांना भेटून आणि चर्चा करून उपयोग काय, लोकांशी बोलण्यापेक्षा जे हव आहे ती कामे करा, जनावरांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, तो सोडावा, लोकांना आता काय गरजेचे आहे ते करा, केवळ दुष्काळी दौरे करून काय उपयोग असा प्रश्न करून राज यांनी गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत आहे. पंधरा वर्षे हा छोटा कालावधी नाही, या कालावधीत जर राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी खरोखरीच काम केली असती तर आज राज्याची दुष्काळग्रस्त परिस्थिती राहिली नसती असेही ठाकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
..

Web Title: Stop drought tourism; Raj Thackeray's advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.