शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नाशिकला हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 00:15 IST

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगाव, धुळे, नंदुरबारचा दौरा करून नाशिक जिल्ह्याला हुलकावणी दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशा व्यक्त केली जात असून, पदाधिकाऱ्यांना मात्र हायसे वाटले आहे. 

ठळक मुद्देकॉंग्रेस कार्यकर्त्यांची निराशा : पदाधिकाऱ्यांना वाटले हायसे

नाशिक : आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगाव, धुळे, नंदुरबारचा दौरा करून नाशिक जिल्ह्याला हुलकावणी दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशा व्यक्त केली जात असून, पदाधिकाऱ्यांना मात्र हायसे वाटले आहे. पटोले यांचा दौरा अचानक रद्द करण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले, तरी जिल्ह्यातील काँग्रेसची एकूणच झालेली वाताहत पाहता पटोले यांनी ‘हात दाखवून अवलक्षण नको’ म्हणून दौरा रद्द केल्याची चर्चा होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नाना पटोले हे पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याने विभागातील प्रत्येक जिल्ह्याने पटोलेंचे जाेरदार स्वागत व त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठका, मेळाव्यांची तयारी केली होती. नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि.२६) सकाळी आगमन होऊन दिवसभर त्यांच्या झंझावाती दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेण्यात आल्या. नाना पटोले यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पक्ष संघटनेचे बळकटीकरण व रखडलेल्या पक्षीय नियुक्त्यांचा प्रश्न निकाली निघण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. त्यादृष्टीने काहींनी तयारीही केली. प्रत्यक्षात पटोले यांनी नाशिक सोडून अन्य जिल्ह्यातील नियोजित दौरा पूर्ण केला व नाशिकला टाळून ते तातडीने मुंबईकडे गुरुवारी रात्री रवाना झाले. पटोले यांना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी बोलावणे धाडल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे. मात्र, पटोले यांचा दौरा रद्द झाल्याने सामान्य काँग्रेस कार्यकर्ते निराश झाले आहेत. पक्षाची गेल्या काही वर्षांत झालेली वाताहत पाहता त्याविषयीच्या भावना पटोले यांच्या कानी घालण्याची संधी हुकल्याची खंत व्यक्त केली जात असून, नेमकी हीच उदासीनता प्रदेशाध्यक्षांसमोर उघड होऊ नये म्हणून बरे झाले. दौरा रद्द झाला म्हणून पदाधिकाऱ्यांना हायसे वाटले आहे.पटोलेंचे मध्यरात्री स्वागतधुळे दौरा आटोपून मुंबईकडे परतणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गुरुवारी मध्यरात्री द्वारका चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. नियोजित दौऱ्यानुसार पटोले हे शनिवारी नाशकात येणार होते. मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द करण्यात आला व धुळे येथून ते मोटारीने मुंबईकडे रवाना झाले. शहराध्यक्ष शरद आहेर, हनिफ बशीर, बबलू खैरे, उद्धव पवार, स्वप्नील पाटील, समीना पठाण, दाऊद शेख, नदीम शेख, रूबीना खान आदींनी त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Nashikनाशिकcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले