शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

राज्य सरकारचे केंद्रापुढे लोटांगण राजेंद्र जाधव यांचा आरोप : महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:28 AM

नाशिक : महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, अशी घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे लोटांगण घातल्याचा आरोप राजेंद्र जाधव यांनी रविवारी (दि़८) पत्रकार परिषदेत केला़

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा खोºयामध्ये १९़३८ तर तज्ज्ञांच्या मते ३७ टीएमसी पाणी आहे

नाशिक : महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, अशी विधानसभेत घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार-पार, दमणगंगा, पिंजाळ या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे लोटांगण घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी रविवारी (दि़८) पत्रकार परिषदेत केला़राज्य सरकारने हे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करून योग्य ती कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलनाचा इशारा आमदार जयंत जाधव यांनी दिला आहे़ राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या अहवालासाठी साडेतेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून राज्याच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा डाव आखला आहे़ या प्रकल्पाबरोबरच दमणगंगा-गोदावरी लिंकचा सविस्तर अहवाल सरकार का तयार करीत नाही, असा प्रश्नही जाधव यांनी केला आहे़ चितळे समितीने नार-पार खोऱ्यात प्रत्यक्षात ५० टीएमसी पाणी असल्याचा अहवाल दिला आहे़ तर राष्ट्रीय जलविज्ञान विकास प्राधिकरणानुसार खोºयामध्ये १९़३८ तर तज्ज्ञांच्या मते ३७ टीएमसी पाणी आहे़ तापी खोरे महामंडळाने राष्ट्रीय जलविज्ञान विकास प्राधिकरणाच्या अहवालाला मंजुरी देऊन खोºयातील १९़३८ टक्के पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविणे शक्य असल्याचे म्हटले आहे़ असे असताना राज्य सरकारने केवळ १०़५० टक्के टीएमसी पाणी वळविण्यासाठी नार-पार-गिरणा अहवाल तयार करण्यास मान्यता देऊन निधी मंजूर केला़ त्यामुळे उर्वरित पाणी हे नार-पार-तापी खोºयातून गुुजरातला पळविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे़ नार-पार, दमणगंगा-एकदरे खोºयामध्ये १३३ टीएमसी पाणी असून, ते नार-पार-गिरणा व दमणगंगा-पिंजाळ-गोदावरी प्रकल्पाद्वारे तापी, गिरणा व गोदावरी खोºयात वळविणे शक्य आहे. यासाठी तयार करण्यात येणाºया प्रकल्पांच्या अहवालासाठी सुमारे शंभर कोटींचा खर्च येणार आहे़ या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे), येवला, नांदगाव व चांदवड या तालुक्यांसह जळगाव, धुळे हे जिल्हे तसेच मराठवाड्यालाही पाणी मिळणार आहे़ त्यामुळे सरकारने या सर्व प्रकल्पांचे अहवाल तातडीने तयार करावेत, अशी मागणी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी केली़ यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते़