शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

राष्टवादी कॉँग्रेसचे राज्य सरकारला ५६ प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:23 IST

भाजपा- शिवसेना सरकारच्या चार वर्षांत महाराष्ट्र राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी केला आहे. ५६ इंच छातीवाल्या सरकारच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५६ प्रश्न उपस्थित केले आहे. या प्रश्नांची जनतेला उत्तर देऊन आपली पारदर्शकता दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

नाशिक : भाजपा- शिवसेना सरकारच्या चार वर्षांत महाराष्ट्र राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी केला आहे. ५६ इंच छातीवाल्या सरकारच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५६ प्रश्न उपस्थित केले आहे. या प्रश्नांची जनतेला उत्तर देऊन आपली पारदर्शकता दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात सोमवारी पक्ष प्रवक्त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे की, मोठे दावे करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने खोट्या आश्वासनांचे फुगे व अच्छे दिनचे निव्वळ बुडबुडे सोडून सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये काहीच ठोस काम केलेले नाही. नोटबंदी, महागाई, इंधनाचे वाढते दर व यामुळे सर्वसामान्यांचे मोडलेले कंबरडे, कर्जाच्या खाईत ढकलेले राज्य, सतत ढासळत जाणारा कृषी विकासाचा दर, कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न, महिलांची सुरक्षितता, दीर्घकाळ प्रलंबित असलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून हमीभावापर्यंतचे प्रश्न कायम आहेत. सरकारकडून सनातनी व जातीयवादींना पाठबळ मिळत असून, त्यामुळे संविधान व लोकशाहीची पायमल्ली होत आहे. अशा स्वरूपाचे ५६ प्रश्न सोशल मीडियासह इतर माध्यमातून सरकारला विचारले आहे. निम्म्या मंत्रिमंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर मुख्यमंत्र्यांना केवळ धुलाई कामगार बनावे लागत आहे. त्यातच चार वर्षांची संधी वाया गेली आहे. बारा हजार कोटी जाहिरातींवर खर्च करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने चार वर्षे पूर्ण झाली. हा कालावधी म्हणजे निव्वळ पोकळ घोषणा, निष्क्रिय कारभार असून, भाजपाप्रणित नेतृत्वाखालील सरकार चौथा वर्धापनदिन साजरा करत असताना विकासाच्या मुद्द्यावर कुठलीच वाढ झालेली नसल्याने या मुहूतार्ला ‘वर्धापनदिन’ का म्हणायचा? असा प्रश्न डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी विचारला आहे.भाजपा निरुत्तरसत्ताधारी ५६ इंच छातीवाल्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ५६ प्रश्न विचारण्यात आले असून, भाजपाचे अनेक नेते सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ते या मुद्द्यांना व प्रश्नांना उत्तर देतील अशी अपेक्षा व्यक्त करून एकाही मुद्द्याला एकही भाजपाच्या नेत्याने उत्तर दिले नसल्यामुळे जनतेसाठी हे प्रश्न खुले करण्यात आल्याचे पवार, ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिकBJPभाजपा