शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

राष्टवादी कॉँग्रेसचे राज्य सरकारला ५६ प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:23 IST

भाजपा- शिवसेना सरकारच्या चार वर्षांत महाराष्ट्र राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी केला आहे. ५६ इंच छातीवाल्या सरकारच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५६ प्रश्न उपस्थित केले आहे. या प्रश्नांची जनतेला उत्तर देऊन आपली पारदर्शकता दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

नाशिक : भाजपा- शिवसेना सरकारच्या चार वर्षांत महाराष्ट्र राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी केला आहे. ५६ इंच छातीवाल्या सरकारच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५६ प्रश्न उपस्थित केले आहे. या प्रश्नांची जनतेला उत्तर देऊन आपली पारदर्शकता दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात सोमवारी पक्ष प्रवक्त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे की, मोठे दावे करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने खोट्या आश्वासनांचे फुगे व अच्छे दिनचे निव्वळ बुडबुडे सोडून सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये काहीच ठोस काम केलेले नाही. नोटबंदी, महागाई, इंधनाचे वाढते दर व यामुळे सर्वसामान्यांचे मोडलेले कंबरडे, कर्जाच्या खाईत ढकलेले राज्य, सतत ढासळत जाणारा कृषी विकासाचा दर, कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न, महिलांची सुरक्षितता, दीर्घकाळ प्रलंबित असलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून हमीभावापर्यंतचे प्रश्न कायम आहेत. सरकारकडून सनातनी व जातीयवादींना पाठबळ मिळत असून, त्यामुळे संविधान व लोकशाहीची पायमल्ली होत आहे. अशा स्वरूपाचे ५६ प्रश्न सोशल मीडियासह इतर माध्यमातून सरकारला विचारले आहे. निम्म्या मंत्रिमंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर मुख्यमंत्र्यांना केवळ धुलाई कामगार बनावे लागत आहे. त्यातच चार वर्षांची संधी वाया गेली आहे. बारा हजार कोटी जाहिरातींवर खर्च करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने चार वर्षे पूर्ण झाली. हा कालावधी म्हणजे निव्वळ पोकळ घोषणा, निष्क्रिय कारभार असून, भाजपाप्रणित नेतृत्वाखालील सरकार चौथा वर्धापनदिन साजरा करत असताना विकासाच्या मुद्द्यावर कुठलीच वाढ झालेली नसल्याने या मुहूतार्ला ‘वर्धापनदिन’ का म्हणायचा? असा प्रश्न डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी विचारला आहे.भाजपा निरुत्तरसत्ताधारी ५६ इंच छातीवाल्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ५६ प्रश्न विचारण्यात आले असून, भाजपाचे अनेक नेते सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ते या मुद्द्यांना व प्रश्नांना उत्तर देतील अशी अपेक्षा व्यक्त करून एकाही मुद्द्याला एकही भाजपाच्या नेत्याने उत्तर दिले नसल्यामुळे जनतेसाठी हे प्रश्न खुले करण्यात आल्याचे पवार, ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिकBJPभाजपा