शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मोदींसारखी पारदर्शकता राज्य सरकारकडे नाही : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 19:41 IST

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पाच हजार कार्डांचे वितरण आज नाशिकमध्ये करण्यात आले त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देकर्जमाफीसाठी अटी शती लादून शेतकऱ्यांची फसवणूकराज्य सरकारवर केली टीकाबेळगाव मधील मराठी माणसाबरोबरच राहणार

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात आखलेल्या सर्व योजना पारदर्शी असून त्यात अटी शर्ती नाहीत. मात्र सात बारा कोरा करू, सरसकट कर्ज माफी देऊ असे सांगणाऱ्यांनी महाराष्टÑात शेतक-यांसाठी अटी शर्ती लादून फसवणूक केली आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये केली.

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पाच हजार कार्डांचे वितरण आज नाशिकमध्ये करण्यात आले त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आयुष्यमान भारत ही अत्यंत पारदर्शी योजना आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सर्वच योजना अशाच पारदर्शी असतात. त्यात अटी शर्ती नसतात. मात्र राज्यातील सरकारे मात्र एक लाख रूपयांत बंगला आणि खाली अटी शर्ती लागू अशा स्वरूपाच्या योजना करू लागले आहेत. निवडणूकीत शेतकºयांन सरसकट कर्ज माफी देऊ, सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले गेले. मात्र सत्ता आल्यानंतर अटी शर्ती लादण्यात आल्या. त्यामुळे शेतकºयांना त्याचा फायदा झाला नाही. आमचे सरकार सत्तेवर असताना त्यावेळी शेतकºयांना आधार लिंक करण्यास सांगितले, त्यामुळे कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही असे सांगितले गेले मात्र आता जीआर बघा, प्रत्यक्ष आपले सरकार केंद्रात जाऊन आपल्या नावावर किती नुकसान आहे, ते बघा,ते मान्य असेल तर अपलोड करा अशा प्रकारच्या अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत, त्यामुळे ही कर्जमाफी पुर्णत: फसवी आहे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, बेळगाव मधील मराठी माणसाच्या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मराठी माणूस हा मराठी माणसाबरोबरच राहील, असे स्पष्ट केले. आणि नाशिकमध्ये निओ मेट्रो रद्द करण्यासाठी घालण्यात आलेला घाट दुदैवी आहे. योजनेविषयी शंका असतील तर त्या समजावून घ्या परंतु नाशिककरांचे नुकसान करू नका असेही ते फडणवीस म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार