शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मोदींसारखी पारदर्शकता राज्य सरकारकडे नाही : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 19:41 IST

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पाच हजार कार्डांचे वितरण आज नाशिकमध्ये करण्यात आले त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देकर्जमाफीसाठी अटी शती लादून शेतकऱ्यांची फसवणूकराज्य सरकारवर केली टीकाबेळगाव मधील मराठी माणसाबरोबरच राहणार

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात आखलेल्या सर्व योजना पारदर्शी असून त्यात अटी शर्ती नाहीत. मात्र सात बारा कोरा करू, सरसकट कर्ज माफी देऊ असे सांगणाऱ्यांनी महाराष्टÑात शेतक-यांसाठी अटी शर्ती लादून फसवणूक केली आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये केली.

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पाच हजार कार्डांचे वितरण आज नाशिकमध्ये करण्यात आले त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आयुष्यमान भारत ही अत्यंत पारदर्शी योजना आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सर्वच योजना अशाच पारदर्शी असतात. त्यात अटी शर्ती नसतात. मात्र राज्यातील सरकारे मात्र एक लाख रूपयांत बंगला आणि खाली अटी शर्ती लागू अशा स्वरूपाच्या योजना करू लागले आहेत. निवडणूकीत शेतकºयांन सरसकट कर्ज माफी देऊ, सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले गेले. मात्र सत्ता आल्यानंतर अटी शर्ती लादण्यात आल्या. त्यामुळे शेतकºयांना त्याचा फायदा झाला नाही. आमचे सरकार सत्तेवर असताना त्यावेळी शेतकºयांना आधार लिंक करण्यास सांगितले, त्यामुळे कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही असे सांगितले गेले मात्र आता जीआर बघा, प्रत्यक्ष आपले सरकार केंद्रात जाऊन आपल्या नावावर किती नुकसान आहे, ते बघा,ते मान्य असेल तर अपलोड करा अशा प्रकारच्या अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत, त्यामुळे ही कर्जमाफी पुर्णत: फसवी आहे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, बेळगाव मधील मराठी माणसाच्या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मराठी माणूस हा मराठी माणसाबरोबरच राहील, असे स्पष्ट केले. आणि नाशिकमध्ये निओ मेट्रो रद्द करण्यासाठी घालण्यात आलेला घाट दुदैवी आहे. योजनेविषयी शंका असतील तर त्या समजावून घ्या परंतु नाशिककरांचे नुकसान करू नका असेही ते फडणवीस म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार