शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 22:13 IST

नाशिक : एरव्ही राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदला कमी-अधिक प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांनी जिवावरचे संकट घेऊन उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या कोरोना विषाणूला पिटाळून लावण्यासाठी रविवारी (दि.२२) घराचा उंबरा न ओलांडणे पसंत केले. माणसांचा कोलाहल थांबल्याने पाखरांचा किलबिलाट वगळता सारे कसे चिडीचूप. जिल्ह्यातील गावोगावी, खेडो-पाडी, वाड्या-वस्त्यांवर, माळरानावर अभूतपूर्व अशी शांतता बघावयास मिळाली.

ठळक मुद्देजगरहाटी थबकली : सारे कसे शांत शांत; गावोगावी जनता कर्फ्यू मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एरव्ही राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदला कमी-अधिक प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांनी जिवावरचे संकट घेऊन उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या कोरोना विषाणूला पिटाळून लावण्यासाठी रविवारी (दि.२२) घराचा उंबरा न ओलांडणे पसंत केले. माणसांचा कोलाहल थांबल्याने पाखरांचा किलबिलाट वगळता सारे कसे चिडीचूप. जिल्ह्यातील गावोगावी, खेडो-पाडी, वाड्या-वस्त्यांवर, माळरानावर अभूतपूर्व अशी शांतता बघावयास मिळाली.रस्त्या-रस्त्यांवर पसरलेला सन्नाटा कोरोनाच्या भयावहतेची जाणीव करून देत होता. ‘गो कोरोना’ म्हणतानाच या जीवघेण्या विषाणूला हटविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाºया वैद्यकीय क्षेत्रातील देवदूतांपासून ते कायदा-सुव्यवस्था राखणाºया पोलिसांपर्यंत साऱ्यांचेच नागरिकांनी आपल्या घरी-दारी टाळ्यांचा गजर तसेच थाळीनाद करून कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद देत जिल्हावासीयांनी संकटात सापडलेल्या देशाला यानिमित्ताने एकात्मतेचाही संदेश दिला. जगभरातील विविध देशांमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे. या जीवघेण्या विषाणूचे भारतात संक्रमण होऊ नये, याकरिता शासनस्तरावर युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत.हवापालटसाठी आलेल्यांचा काढता पाय१ त्र्यंबकेश्वर : भीतीपोटी एकदा संशयाचे भूत एखाद्याच्या डोक्यावर बसले तर काय केले जाईल ते सांगता येत नाही. हे भूत संपूर्ण गावाच्याच डोक्यावर बसल्यावर तर विचारूच नका. संपूर्ण गाव एक झाल्याने एका निरोगी कुटुंबावर गाव सोडून पळ काढण्याची वेळ आली.२ त्र्यंबकेश्वरपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर ब्राह्मणवाडे गाव आहे. या गावात पुणे येथील एका कुटुंबाने जागा घेऊन घर बांधले आहे. ब्राह्मणवाडे येथे या कुटुंबापैकी एक महिला राहते. घर बांधण्याचा हेतू एकच होता, कधी काळी उन्हाळ्यात अगर हवापाणी बदलासाठी येऊन राहणे. ३ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील एक कुटुंब हवापालटसाठी ब्राह्मणवाडे येथे आले. ही बाब ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी त्यांना येथे राहण्यास विरोध केला. सरपंच पांडुरंग कोरडे आणि अन्य सहकाºयांनी या कुटुंबाला तुम्ही वैद्यकीय तपासणी करून घ्या असे सुनावले. साफसफाई अन् सर्व्हिस स्टेशन घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्याने अनेकांनी घरातील साफसफाईवर भर दिला तर कुणी आपली वाहने पाण्याने धूवून काढत पार्किंगला सर्व्हिस स्टेशनचे स्वरूप आणले. एरव्ही व्यस्त शेड्यूलमुळे प्रलंबित राहिलेल्या कामांचाही निपटरा करण्याला पसंती देण्यात आली. वेळ घालविण्यासाठी कुणी वाचनानंद मिळविला, तर कुणी गृहिणींना स्वयंपाकात मदत करून हातभार लावला. कोरोनाच्या निमित्ताने एक ा वेगळ्या अनुभूतीला नागरिक सामोरे गेले. गप्पांचा पार सुनासुना...गप्पांचे फड रंगणारे पार-कट्टे सुने सुने झाले. दुकानांचे शटर्स उघडलेच नाहीत. घराघरांमध्ये आतून कड्या लागल्या गेल्या. निर्मनुष्य झालेल्या रस्त्यांवरील स्मशान शांतता जीवघेण्या कोरोनाची भयावहता अधोरेखित करीत होती.नागरिकांकडून घंटानाद;टाळ्या वाजवून आभारबच्चे कंपनीने घरातच बुद्धिबळाचे पट मांडत, कॅरमच्या सोंगट्यांशी खेळत, पत्त्यांचा डाव मांडत दिवस घालविला. दिवसभर वृत्तवाहिन्यांवरून अपडेट घेत आप्तस्वकीय, नातेवाइकांची मोबाइलवरून विचारपूस करून घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात होता. या अभूतपूर्व बंदमध्ये गावोगावी अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय व्यावसायिकांपासून ते प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयांकडून आरोग्यसेवा कार्यरत होती. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार, सायंकाळी अनेक ठिकाणी नागरिकांनी आपल्या घरात, गच्चीवर, बाल्कनीत, अंगणात येऊन टाळ्या वाजवत, घंटानाद-थाळीनाद करून कोरोनाच्या लढाईत आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा बजावणाºयांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या