शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन काढण्यास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:07 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत.  एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी, माडसांगवी या भागात सर्वत्र सोयाबीनचे पीक बºयापैकी आले आहे. काही ठिकाणी उशिरा पेरलेले सोयाबीन अजूनही पिवळसर असल्याने साधारणत: आठवडाभराने कापणीस येईल. तर काही ठिकाणी सोयाबीन कापणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू  आहे.  हल्ली शेतकºयांकडून यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन काढले जाते. ज्यांनी सोयाबीन काढले त्यांनी आॅक्टोबरच्या कडक उन्हात वाळवून गोण्या भरून ठेवल्या आहेत. परिसरातील अनेक शेतकरी सिन्नरफाटा, नाशिक पेठरोड मार्केट, पिंपळगाव अथवा सायखेडा मार्केटला आपापल्या सोईने सोयाबीन विक्रीसाठी नेत असून, सध्या तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल भावाने व्यापारी खरेदी करीत आहेत. काही व्यापारी थेट शेतातूनच २५०० ते २८०० रुपये क्ंिवटलने खरेदी करीत आहेत.शेतकºयांना भाजीपाल्याचा आधारपरिसरातील शेतकºयांना सध्या भाजीपाला पिकांचा आधार आहे. त्यातल्या त्यात पालकाची भाजी मुबलक प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी पालकाची भाजी सिन्नर फाटा मार्केट, जेलरोड शनिमंदिर, नोट प्रेस समोरचे भाजी मार्केट येथे जुडीने व्यापारी भाजी खरेदी करीत आहेत.४साधारणत: ७०० ते ८०० रुपये शेकडा जुडी पालकाचा दर आहे. काही व्यापारी थेट शेतकºयांच्या शेतातूनच पालक ठोक पद्धतीने खरेदी करतात. त्यासाठी ५०० ते ६०० रुपये दर आहे. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंतचा कालावधी पालकासाठी जास्त मागणीचा असतो, असे जाणकार शेतकरी सांगतात.रब्बीच्या पूर्व मशागतीला वेगसोयाबीन काढून झाल्यानंतर शेत नांगरुन ते रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा, ज्वारी पिकांची तयारी शेतकरी करीत आहेत. यंदा परतीच्या पावसाने ओढ दिली असली तरी या भागातील शेतकºयांना दारणा व गोदावरी नदीच्या पाण्याचा थोडाफार आधार आहे. त्यातून खरिपाची पिके जगली असली तरी रब्बीच्या पिकांना मात्र ताण पडू शकतो. पावसाची कमतरता असल्याने विहिरींना यंदा कमी पाणी उतरले. धरणातील पाण्याचा साठा कमी असल्याने दोन्ही नद्यांना पाणी कमी प्रमाणात राहील. त्यामुळे रब्बीच्या पिकांना ताण पडेल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNashikनाशिक