शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन काढण्यास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:07 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत.  एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी, माडसांगवी या भागात सर्वत्र सोयाबीनचे पीक बºयापैकी आले आहे. काही ठिकाणी उशिरा पेरलेले सोयाबीन अजूनही पिवळसर असल्याने साधारणत: आठवडाभराने कापणीस येईल. तर काही ठिकाणी सोयाबीन कापणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू  आहे.  हल्ली शेतकºयांकडून यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन काढले जाते. ज्यांनी सोयाबीन काढले त्यांनी आॅक्टोबरच्या कडक उन्हात वाळवून गोण्या भरून ठेवल्या आहेत. परिसरातील अनेक शेतकरी सिन्नरफाटा, नाशिक पेठरोड मार्केट, पिंपळगाव अथवा सायखेडा मार्केटला आपापल्या सोईने सोयाबीन विक्रीसाठी नेत असून, सध्या तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल भावाने व्यापारी खरेदी करीत आहेत. काही व्यापारी थेट शेतातूनच २५०० ते २८०० रुपये क्ंिवटलने खरेदी करीत आहेत.शेतकºयांना भाजीपाल्याचा आधारपरिसरातील शेतकºयांना सध्या भाजीपाला पिकांचा आधार आहे. त्यातल्या त्यात पालकाची भाजी मुबलक प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी पालकाची भाजी सिन्नर फाटा मार्केट, जेलरोड शनिमंदिर, नोट प्रेस समोरचे भाजी मार्केट येथे जुडीने व्यापारी भाजी खरेदी करीत आहेत.४साधारणत: ७०० ते ८०० रुपये शेकडा जुडी पालकाचा दर आहे. काही व्यापारी थेट शेतकºयांच्या शेतातूनच पालक ठोक पद्धतीने खरेदी करतात. त्यासाठी ५०० ते ६०० रुपये दर आहे. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंतचा कालावधी पालकासाठी जास्त मागणीचा असतो, असे जाणकार शेतकरी सांगतात.रब्बीच्या पूर्व मशागतीला वेगसोयाबीन काढून झाल्यानंतर शेत नांगरुन ते रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा, ज्वारी पिकांची तयारी शेतकरी करीत आहेत. यंदा परतीच्या पावसाने ओढ दिली असली तरी या भागातील शेतकºयांना दारणा व गोदावरी नदीच्या पाण्याचा थोडाफार आधार आहे. त्यातून खरिपाची पिके जगली असली तरी रब्बीच्या पिकांना मात्र ताण पडू शकतो. पावसाची कमतरता असल्याने विहिरींना यंदा कमी पाणी उतरले. धरणातील पाण्याचा साठा कमी असल्याने दोन्ही नद्यांना पाणी कमी प्रमाणात राहील. त्यामुळे रब्बीच्या पिकांना ताण पडेल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNashikनाशिक