शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन काढण्यास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:07 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत.

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सोयाबीन काढणीच्या कामास वेग आला असून, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तर काहींनी खळ्यावरच व्यापाºयांना बोलावून सौदे केले आहेत.  एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी, माडसांगवी या भागात सर्वत्र सोयाबीनचे पीक बºयापैकी आले आहे. काही ठिकाणी उशिरा पेरलेले सोयाबीन अजूनही पिवळसर असल्याने साधारणत: आठवडाभराने कापणीस येईल. तर काही ठिकाणी सोयाबीन कापणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू  आहे.  हल्ली शेतकºयांकडून यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन काढले जाते. ज्यांनी सोयाबीन काढले त्यांनी आॅक्टोबरच्या कडक उन्हात वाळवून गोण्या भरून ठेवल्या आहेत. परिसरातील अनेक शेतकरी सिन्नरफाटा, नाशिक पेठरोड मार्केट, पिंपळगाव अथवा सायखेडा मार्केटला आपापल्या सोईने सोयाबीन विक्रीसाठी नेत असून, सध्या तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल भावाने व्यापारी खरेदी करीत आहेत. काही व्यापारी थेट शेतातूनच २५०० ते २८०० रुपये क्ंिवटलने खरेदी करीत आहेत.शेतकºयांना भाजीपाल्याचा आधारपरिसरातील शेतकºयांना सध्या भाजीपाला पिकांचा आधार आहे. त्यातल्या त्यात पालकाची भाजी मुबलक प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी पालकाची भाजी सिन्नर फाटा मार्केट, जेलरोड शनिमंदिर, नोट प्रेस समोरचे भाजी मार्केट येथे जुडीने व्यापारी भाजी खरेदी करीत आहेत.४साधारणत: ७०० ते ८०० रुपये शेकडा जुडी पालकाचा दर आहे. काही व्यापारी थेट शेतकºयांच्या शेतातूनच पालक ठोक पद्धतीने खरेदी करतात. त्यासाठी ५०० ते ६०० रुपये दर आहे. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंतचा कालावधी पालकासाठी जास्त मागणीचा असतो, असे जाणकार शेतकरी सांगतात.रब्बीच्या पूर्व मशागतीला वेगसोयाबीन काढून झाल्यानंतर शेत नांगरुन ते रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा, ज्वारी पिकांची तयारी शेतकरी करीत आहेत. यंदा परतीच्या पावसाने ओढ दिली असली तरी या भागातील शेतकºयांना दारणा व गोदावरी नदीच्या पाण्याचा थोडाफार आधार आहे. त्यातून खरिपाची पिके जगली असली तरी रब्बीच्या पिकांना मात्र ताण पडू शकतो. पावसाची कमतरता असल्याने विहिरींना यंदा कमी पाणी उतरले. धरणातील पाण्याचा साठा कमी असल्याने दोन्ही नद्यांना पाणी कमी प्रमाणात राहील. त्यामुळे रब्बीच्या पिकांना ताण पडेल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNashikनाशिक