शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘कालत्रयी कुमार गंधर्व’चे अभिवाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:50 IST

आयाम नाशिक आयोजित व ग्रंथ तुमच्या दारी प्रस्तुत अक्षरबाग वाचन कट्टा या जयेश आपटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमाचे आयोजन ऋतुरंग भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते.

नाशिकरोड : आयाम नाशिक आयोजित व ग्रंथ तुमच्या दारी प्रस्तुत अक्षरबाग वाचन कट्टा या जयेश आपटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमाचे आयोजन ऋतुरंग भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते.  कुमार गंधर्वांच्या जीवनावर आधारित ‘कालत्रयी कुमार गंधर्व’ या पुस्तकाचे अभिवाचन करण्यात आले. यातील संवाद वाचन चिन्मय खेडेकर यांनी केले, तर कुमार गंधर्वांच्या विविध रागदारीतील रचना प्रीतम नाकील यांनी सादर केल्या. अभिवाचनात श्रोते तल्लीन होऊन एकेका संवादाला व रचनेला दाद देत होते. ‘अवधुता गगन घटा... रूम झुम बरसे नेहारे’ ही रचना दाद घेऊन गेली. कुमार गंधर्वांचे संगीत क्षेत्रातील योगदान मोठे आहेच. याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आला. जयेश आपटे यांनी प्रास्ताविक केले. ऋतुरंग परिवाराचे सदस्य व कलाकारांचा सत्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी केला. आभार विनायक रानडे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ. राम कुलकर्णी, डॉ. राजीव पाठक, आर्किटेक्ट संजय पाटील, प्रकाश पाटील, संतोष जोशी, गिरीश वागळे, तन्वी अमित, भागवत माळी आदिंसह उपस्थित होते. कुमार गंधर्वांबद्दल त्यांचे समकालीन व कवी, साहित्यिक यांनी सांगितलेले काही किस्से व रचना पेश करण्यात आल्या. मंगेश पाडगांवकर आपल्या कवितेतून कुमार गंधर्वांबद्दल म्हणतात ‘झाडे गदागदा हलवणारा वनघोर पाऊस, थेंबाचा अपार उत्सव मनस्वी पानापानातून फांद्यांच्या हिरव्या जत्रेत गरगणारे बिलोरी पाळणे आत्मा पिसाऱ्यातून फुलवणारा मुक्त मनमोर पाऊस’ असे वर्णन करतात. तसेच अवलिया पाऊस, गोरखनाथाच्या हाकेसारखा अलखनिरंजन पाऊस हाक ऐकुन नकळत उठुन चालु लागतो आपण दुर्लघ्य पहाडापल्याडच्या निर्विकल्पात असा पाऊस असेही पाडगांवकर म्हणतात. हे सुरू असतांनाच संवादिनीचा मधुर सूर आणि कुमार गंधर्वांची रचना सादर करून प्रीतम नाकील यांनी टाळ्या मिळविल्या.

टॅग्स :Nashikनाशिक