मनमाड : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठूमाउलीच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविंकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.नवीन अमरावती रेल्वेस्थानका-वरून सोडण्यात येणारी गाडी क्रमांक ०१२०१ ही दि. ६ व ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता पंढरपूरसाठी रवाना होईल व परतीच्या प्रवासासाठी दि. ५, १० आणि ११ जुलै रोजी पंढरपूर येथून दुपारी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून ४० मि. अमरावतीला पोहोचेल. या विशेष गाडीला अमरावतीहून सुटताना पाच जनरल बोग्या, एक एसी थ्री टियर, एक स्लिपर, एक एसएलआर बोगी राहाणार असून, खामगाव येथे गाडी आल्यानंतर आठ बोग्या जोडून एकूण १८ डब्ब्यांची गाडी भुसावळला रात्री ८ वाजता नांदगावला ११ वाजून ५ मी. तर मनमाड येथे ११ वाजून ४० मी. येऊन पंढरपूरकडे रवाना होईल व सकाळी ९ वाजून ५ मि.नी पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी पंढरपूरहून दुपारी ४ वाजता निघालेली ही गाडी मनमाड येथे रात्री १ वा २० मि. नांदगाव येथे २ वा. २० मि.जळगाव येथे ४ वा.५० मि. भुसावळ येथे ५ वा.३० मि. येऊन अमरावती येथे सकाळी १० वा. ४० मि. पोहोचेल. अमरावती येथून सुटणाऱ्या या गाडीसाठी अकोला रेल्वेस्थानकासाठी दोन बोग्या राखीव ठेवण्यात आल्या आहे. रेल्वे प्रशासनाने भाविकांनी सुरू केलेल्या या विशेष गाड्यांचा लाभ पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना होत आहे. (वार्ताहर)