शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सरासरी २१ हजार ७७६ हेक्टरवर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:00 IST

त्र्यंबकेश्वर : यंदा खरीप पिकांमध्ये भाताला जास्त महत्व कृषि विभागाने दिले आहे. यंदा जवळपास 10 हजार हेक्टर मध्ये विविध जातीच्या भाताची लागवड करण्यात येत आहे. त्या खालोखाल नागली खुरसणी उडीद पावसाळी भुईमूग शेंगा कडधान्य वगैरे खरीपाची पेरणी सुरु आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांची लगबग : भातासह नागली, खुरसणी, उडीद, भुईमूगास पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : यंदा खरीप पिकांमध्ये भाताला जास्त महत्व कृषि विभागाने दिले आहे. यंदा जवळपास 10 हजार हेक्टर मध्ये विविध जातीच्या भाताची लागवड करण्यात येत आहे. त्या खालोखाल नागली खुरसणी उडीद पावसाळी भुईमूग शेंगा कडधान्य वगैरे खरीपाची पेरणी सुरु आहे.त्र्यंबकेश्वरला नेहमी हाता तोंडाशी आलेला घास कधी अतिवृष्टीने, कधी वेळेवर पाउसच न पडल्याने तर कधी वादळी वा-याने भाताच्या तोरंब्या गळून पडतात. असे काही ना काही संकटे येत असतात. दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकुण खरीप क्षेत्र 24935 हेक्टर असुन त्यापैकी या वर्षी 21776 हेक्टर क्षेत्रावर यावर्षी ( सन 2020/21) खरीपाची लागवड करण्यात आली आहे. या वर्षी भात 9051 हेक्टर खरीप ज्वारी 68 हेक्टर नागली 3030 हेक्टर वरई 3527 हेक्टर, एकुण तृण धान्य 15676, तुर 1019 हेक्टर उडीद 1648 हेक्टर इतर कडधान्ये 996 एकुण कडधान्ये 3666 हेक्टर भुईमुग 1152 हेक्टर खुरसणी 906 हेक्टर सोयाबीन 66 हेक्टर एकुण तेलिबया 2366 हेक्टर तर ऊस 68 हेक्टर याप्रमाणे खरीप लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र कृषि विभागाने गृहीत धरले आहे. आता प्रत्यक्षात खरीपाची किती हेक्टर क्षेत्रात लागवड होणार आहे. ते 10/15 दिवसात कळेलच. पण या वर्षी भात तथा तांदुळ यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने भाताची लागवड करण्यात आली आहे. काही शेतक-यांची रोपे आवणी (लावणी) लायक झालायाने पुढील आठवड्यात आवणी होईल.विशेष म्हणजे सध्या नाशिक मुंबई सह महाराष्ट्रात कोरोना कोव्हीड -19 चा फैलाव मालेगावला लाजवणारा आहे. जिल्ह्यात भितीचे वातावरण असले तरी पाउस शेतीशेतीची कामे यामध्ये काही वेळ का होईना कोरोनाचा विसर पडत आहे.दिवसें दिवस कृषी क्षेत्रात बदल होत असुन हल्ली यांत्रिक पद्धतीने बळीराजाचा कल दिसुन येत आहे. जवळपास 75 टक्के शेतकरी ट्रॅक्टर कल्टीव्हेटर वगैरेला पसंती मिळत आहे. एवढेच नव्हे तर कृषी विभागच मोठा ट्रॅक्टर घेतल्यास सव्वा लाख रु पयांची सबिसडी तर लहान ट्रॅक्टर साठी एक लाख रु पये सबिसडी देउन यांत्रिक शेती करण्यासाठी अप्रत्यक्ष रित्या एक प्रकारे प्रोत्साहनच देत आहे. संपुर्ण तालुक्या तुन अवघे 25 टक्के लोक पारंपारि क पद्धतीने बैल जोडीच्या माध्यमा तून नांगर वखर या अवजाराच्या सहाय्याने शेती करीत आहेत. सध्या असलेले मृग नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असते. अशी येथील शेतकरी व जाणकार कृषी तज्ञांची श्रध्दा आहे. पाणघोंगडे ही अंगावर घेण्याची वस्तु बांबुच्या कामट्या पासुन साठा तयार करु न त्यावर काथ्याच्या सहायाने पळसाची पाने गुंफली जात सर्व पाने आच्छादले गेल्यावर पुनश्च सुतळीने विशिष्ट पध्दतीने पळसाची सर्वची सर्व पाने अडकले जाउन एक उबदार व गुबगुबीत पाणघोंगडे तयार होउन अंगावर घेतले की थंडी व पावसापासून संरक्षण मिळत असे पण हल्ली सर्व गोष्टी वेगवान झाल्या मुळे कामट्यांच्या साठ्यावर एक प्लॅस्टीकचे कापड बांधले की झाले पाणघोंगडे तयार होते. हल्ली याच पाण घोंगड्याचा वापर शेतकरी करताना दिसतात.बांधावर बियाणे, खतांची मागणीकृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावरच बाजारभावाप्रमाणे खत आणि बियाणांचा पुरवठा केला आहे़ यंदा पाऊस समाधानकारक पडल्याने शेतकरी मंडळी समाधानी आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने मजूरांची वाणवा जाणवत आहे़ यामुळे शेतकरी कुटुंब दिवसभर शेतात शारीरिक अंतर राखत काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ पेरण्यांना अधिक वेग आला आहे़ गेल्या 6/7 दिवसां पासुन त्र्यंबकला दररोज किमान एकदा तरी कमी प्रमाणात पावसाची हजेरी लागत असते. दि.5 जूनपर्यंत केवळ 43 मिमि पावसाची नोंद झाली असली तरी सध्या पेरणी लायक पाउस पडला आहे. नव्हे अधुन मधुन पडत आहे. त्यामुळे पावसाची सुरु वात समाधान कारक आहे. सध्या मात्र पावसाळ्यातील मृग नक्षत्राचे आगमन झाले आहे. दि.5 जुन ते 12 जुन पावेतो कमी अधिक प्रमाणात जवळपास 30 मिमि.पाउस झाला. तर काल दि.13 रोजी 62 मिमि पावसाची नोंद होउन 135 व रविवारी जवळपास 30 मिमि पाऊस होउन आज रविवार दि.165 मिमि. पावसाच्या ओलाव्याने पेणीस आवश्यक पाउस झाला आहे.येत्या दि 22 जुन रोजी पावसाचे दुसरे नक्षत्र आर्द्रा नक्षत्रास सुरु वात होईल. दरम्यान यांत्रिक शेतीला जरी येथे महत्व असले तरी खणणी व आवणीला मनुष्यबळ असल्या शिवाय आवणी होणे शक्य नसते. पर्यायाने शेत मजुरांना दरडोई तीनशे रु पये पावेतो मजुरी मिळते.पुर्वी पाणघोंगड्या च्या सहाय्याने खणणी आवणी केली जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी