शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सरासरी २१ हजार ७७६ हेक्टरवर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:00 IST

त्र्यंबकेश्वर : यंदा खरीप पिकांमध्ये भाताला जास्त महत्व कृषि विभागाने दिले आहे. यंदा जवळपास 10 हजार हेक्टर मध्ये विविध जातीच्या भाताची लागवड करण्यात येत आहे. त्या खालोखाल नागली खुरसणी उडीद पावसाळी भुईमूग शेंगा कडधान्य वगैरे खरीपाची पेरणी सुरु आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांची लगबग : भातासह नागली, खुरसणी, उडीद, भुईमूगास पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : यंदा खरीप पिकांमध्ये भाताला जास्त महत्व कृषि विभागाने दिले आहे. यंदा जवळपास 10 हजार हेक्टर मध्ये विविध जातीच्या भाताची लागवड करण्यात येत आहे. त्या खालोखाल नागली खुरसणी उडीद पावसाळी भुईमूग शेंगा कडधान्य वगैरे खरीपाची पेरणी सुरु आहे.त्र्यंबकेश्वरला नेहमी हाता तोंडाशी आलेला घास कधी अतिवृष्टीने, कधी वेळेवर पाउसच न पडल्याने तर कधी वादळी वा-याने भाताच्या तोरंब्या गळून पडतात. असे काही ना काही संकटे येत असतात. दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकुण खरीप क्षेत्र 24935 हेक्टर असुन त्यापैकी या वर्षी 21776 हेक्टर क्षेत्रावर यावर्षी ( सन 2020/21) खरीपाची लागवड करण्यात आली आहे. या वर्षी भात 9051 हेक्टर खरीप ज्वारी 68 हेक्टर नागली 3030 हेक्टर वरई 3527 हेक्टर, एकुण तृण धान्य 15676, तुर 1019 हेक्टर उडीद 1648 हेक्टर इतर कडधान्ये 996 एकुण कडधान्ये 3666 हेक्टर भुईमुग 1152 हेक्टर खुरसणी 906 हेक्टर सोयाबीन 66 हेक्टर एकुण तेलिबया 2366 हेक्टर तर ऊस 68 हेक्टर याप्रमाणे खरीप लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र कृषि विभागाने गृहीत धरले आहे. आता प्रत्यक्षात खरीपाची किती हेक्टर क्षेत्रात लागवड होणार आहे. ते 10/15 दिवसात कळेलच. पण या वर्षी भात तथा तांदुळ यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने भाताची लागवड करण्यात आली आहे. काही शेतक-यांची रोपे आवणी (लावणी) लायक झालायाने पुढील आठवड्यात आवणी होईल.विशेष म्हणजे सध्या नाशिक मुंबई सह महाराष्ट्रात कोरोना कोव्हीड -19 चा फैलाव मालेगावला लाजवणारा आहे. जिल्ह्यात भितीचे वातावरण असले तरी पाउस शेतीशेतीची कामे यामध्ये काही वेळ का होईना कोरोनाचा विसर पडत आहे.दिवसें दिवस कृषी क्षेत्रात बदल होत असुन हल्ली यांत्रिक पद्धतीने बळीराजाचा कल दिसुन येत आहे. जवळपास 75 टक्के शेतकरी ट्रॅक्टर कल्टीव्हेटर वगैरेला पसंती मिळत आहे. एवढेच नव्हे तर कृषी विभागच मोठा ट्रॅक्टर घेतल्यास सव्वा लाख रु पयांची सबिसडी तर लहान ट्रॅक्टर साठी एक लाख रु पये सबिसडी देउन यांत्रिक शेती करण्यासाठी अप्रत्यक्ष रित्या एक प्रकारे प्रोत्साहनच देत आहे. संपुर्ण तालुक्या तुन अवघे 25 टक्के लोक पारंपारि क पद्धतीने बैल जोडीच्या माध्यमा तून नांगर वखर या अवजाराच्या सहाय्याने शेती करीत आहेत. सध्या असलेले मृग नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असते. अशी येथील शेतकरी व जाणकार कृषी तज्ञांची श्रध्दा आहे. पाणघोंगडे ही अंगावर घेण्याची वस्तु बांबुच्या कामट्या पासुन साठा तयार करु न त्यावर काथ्याच्या सहायाने पळसाची पाने गुंफली जात सर्व पाने आच्छादले गेल्यावर पुनश्च सुतळीने विशिष्ट पध्दतीने पळसाची सर्वची सर्व पाने अडकले जाउन एक उबदार व गुबगुबीत पाणघोंगडे तयार होउन अंगावर घेतले की थंडी व पावसापासून संरक्षण मिळत असे पण हल्ली सर्व गोष्टी वेगवान झाल्या मुळे कामट्यांच्या साठ्यावर एक प्लॅस्टीकचे कापड बांधले की झाले पाणघोंगडे तयार होते. हल्ली याच पाण घोंगड्याचा वापर शेतकरी करताना दिसतात.बांधावर बियाणे, खतांची मागणीकृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावरच बाजारभावाप्रमाणे खत आणि बियाणांचा पुरवठा केला आहे़ यंदा पाऊस समाधानकारक पडल्याने शेतकरी मंडळी समाधानी आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने मजूरांची वाणवा जाणवत आहे़ यामुळे शेतकरी कुटुंब दिवसभर शेतात शारीरिक अंतर राखत काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ पेरण्यांना अधिक वेग आला आहे़ गेल्या 6/7 दिवसां पासुन त्र्यंबकला दररोज किमान एकदा तरी कमी प्रमाणात पावसाची हजेरी लागत असते. दि.5 जूनपर्यंत केवळ 43 मिमि पावसाची नोंद झाली असली तरी सध्या पेरणी लायक पाउस पडला आहे. नव्हे अधुन मधुन पडत आहे. त्यामुळे पावसाची सुरु वात समाधान कारक आहे. सध्या मात्र पावसाळ्यातील मृग नक्षत्राचे आगमन झाले आहे. दि.5 जुन ते 12 जुन पावेतो कमी अधिक प्रमाणात जवळपास 30 मिमि.पाउस झाला. तर काल दि.13 रोजी 62 मिमि पावसाची नोंद होउन 135 व रविवारी जवळपास 30 मिमि पाऊस होउन आज रविवार दि.165 मिमि. पावसाच्या ओलाव्याने पेणीस आवश्यक पाउस झाला आहे.येत्या दि 22 जुन रोजी पावसाचे दुसरे नक्षत्र आर्द्रा नक्षत्रास सुरु वात होईल. दरम्यान यांत्रिक शेतीला जरी येथे महत्व असले तरी खणणी व आवणीला मनुष्यबळ असल्या शिवाय आवणी होणे शक्य नसते. पर्यायाने शेत मजुरांना दरडोई तीनशे रु पये पावेतो मजुरी मिळते.पुर्वी पाणघोंगड्या च्या सहाय्याने खणणी आवणी केली जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी