शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

सोनईचा तिहेरी हत्याकांड : 6 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, क्रूरपणाची ओलांडली परिसीमा - अ‍ॅड. उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 16:16 IST

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरंदळे वस्तीवर २०१३ साली जानेवारीच्या एक तारखेला घडलेल्या तिहेरी हत्त्याकांड पुर्वनियोजित कट होता. सहाही दोषी आरोपींनी मानवतेला काळीमा फासणारे कृत्य तर केलेच

नाशिक - अहमदनगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरंदळे वस्तीवर २०१३ साली जानेवारीच्या एक तारखेला घडलेल्या तिहेरी हत्त्याकांड पुर्वनियोजित कट होता. सहाही दोषी आरोपींनी मानवतेला काळीमा फासणारे कृत्य तर केलेच; मात्र क्रूरपणाची सीमाही ओलांडत खूनानंतर मृतदेहाची अवहेलना आणि पोलिसांच्या तपासाला उलटी दिशा देण्याचा केला प्रयत्नाचा गंभीर गुन्हाही केला, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी क रत सहाही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी न्यायालयाकडे मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत येत्या शनिवारी (दि.२०) या खटल्यामधील दोषींना शिक्षा सुनावली जाणार असल्याचे जाहिर केले.

आरोपींनी पुर्वनियोजित कट केवळ आणि केवळ जातीयव्यवस्थेला महत्त्व देत शिजविला गेल्याचेही यावेळी निकम यांनी न्यायालयापुढे स्पष्ट केले. या दोषींच्या रुपाने भुतलावर राक्षस पहावयास मिळाले. अत्यंत थंड डोक्याने  या दोषींनी कृत्य केले आहे. यावेळी निकम यांनी न्यायालयापुढे विविध तेरा ते पंधरा विशेष कारणे या गुन्ह्यामागील स्पष्ट केली. या सहा आरोपींचा राग सचिनवर होता कारण त्याने एका सवर्णीय मुलीसोबत प्रेम करत तिच्याशी विवाह करण्याचा निश्चय त्याच्या नातेवाईकांकडे त्याने याबाबत बोलणेही केले होते. त्यामुळे खालील जातीचा मुलगा सवर्णीय जातीच्या मुलीसोबत विवाह करणार असल्याचा मनात राग धरून मुलीच्या कुटंबियांमधील दोषी आरोपींनी सचिनचा खून केला. खूनानंतर त्याचे हात, पायांचे तुकडे करुन ते एका कुपनलिकेत टाकून देत मृतदेहाची अवहेलना केल्याचे निकम यांनी यावेळी न्यायालयात सांगितले. आरोपींच्या वतीने त्यांच्या वकिलांनी एक आरोपीचे वय साठ तर अन्य आरोपी हे तरूण असल्यामुळे त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जावी, असा बचाव केला. त्यांच्या या बचावाच्या युक्तीवाद निकम यांनी खोडून काढत गुन्हेगार हे सज्ञान असून त्यांनी पुर्णत: नियोजित कट रचून अत्यंत थंड डोक्याने क्रूरपणे तिहेरी हत्त्याकांड घडवून आणत जातीयव्यवस्थेला खतपाणी घालण्याचा प्रकार केल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने समाजाला एक मोठा संदेश या खटल्याच्या निमित्ताने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावत द्यावा, जेणेकरून यापुढे असे क्रूर व निर्दणी मानवतेला काळीमा फासणारे गुन्हे करण्याचे धाडस समाजातून कोणी करण्यास धजावणार नाही, असे निकम यांनी न्यायालयास सांगितले.

इंदिरा गांधी यांच्या हत्त्येचा दाखला-

जिल्हा न्यायालयात सुनावणी दरम्यान, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्त्येचाही दाखला दिला. यावेळी ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने गांधी यांच्यावर गोळ्या झाडणा-या दोघांसह तीस-या संशयितालाही दोषी धरले. घटनास्थळी तीसरा संशयित उपस्थित नव्हता; मात्र गांधी यांच्या हत्त्येचा कट शिजविण्यात त्याचाही सहभाग असल्याचे सिध्द झाल्यामुळे तो देखील तेवढाच वाटेकरी असल्याचे सांगत त्यालाही शिक्षा सुनावली होती. यासोबतच त्यांनी बच्चनसिंग खटला, टी.मच्छिसिंग खटल्याचेही संदर्भ दिले.

नेमकी काय आहे घटना?या हत्याकांड प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा फाटा येथील घाडगे-पाटील महाविद्यालयाच्या त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात असलेल्या बी.एड महाविद्यालयातील एका मुलीचे सफाई कामगार म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कामास असलेल्या मेहतर समाजातील सचिन घारू या मुलावर प्रेम होते. या प्रेम प्रकरणातून १ जानेवारी २०१३ रोजी सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे सचिन घारू (२३), संदीप राज धनवार (२४) व राहुल कंडारे (२६) या तिघा तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. हे तिघेही नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामास होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे, असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. त्यानंतर धनवार व कंडारे यांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व हातपाय जनावरांचा चारा तोडण्याच्या अडकित्त्याने तोडून कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते.

या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरोधात खून, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, भारतीय हत्यार कायदा तसेच मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेवासा सत्र न्यायालयात खटला सुरू असताना साक्षी पुराव्याच्या वेळी साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो या शक्यतेमुळे तो नाशिक किंवा जळगाव न्यायालयात चालवावा, अशी विनंती याचिका मृताचे नातलग पंकज राजू तनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे मुद्दे, म्हणणे ग्राह्ण धरून त्यांची विनंती मान्य केली व हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते. १ जानेवारी २०१३ रोजी अहमदनगर जिल्ह्णाच्या सोनईमध्ये ही ऑनर किलिंगची घटना घडली होती़ आंतरजातीय प्रेम प्रकरणातून मुलीचे वडील, काका यांनी सचिन घारूसह त्याच्या दोन मित्रांना बोलावून घेत त्यांची निर्घृण हत्या केली़ या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी परिस्थितीजन्य जे पुरावे होते त्यांची साखळी आम्ही न्यायालयात उभी केली़ यामधील सातपैकी सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले तर सातवा आरोपी कटामध्ये सामील नसल्याचे पुराव्यावरून समोर आले व न्यायालयाने त्याची मुक्तता केली़ तसेच शिक्षेबाबतचा अंतिम युक्तिवाद हा १८ जानेवारीला ठेवण्यात आला आहे - - अ‍ॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

'कठोर शिक्षा द्या'वृद्धावस्थेतील एकुलता एक सहारा असलेल्या माझ्या सचिनचा अत्यंत निर्दयपणे खून केला़ या सर्वांना न्यायालयाने फाशीचीच शिक्षा द्यावी़ या उतारवयात मला माझ्या मुलीकडे दिवस काढावे लागत आहेत़ मुलगा असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती - कलाबाई घारू (मयत सचिन घारूची आई) 

'फाशीची शिक्षा द्या'माझ्या भावाचा निर्दयपणे खून करणा-यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भावाच्या आत्म्याला शांती मिळेल़ या घटनेनंतर घरी आलेल्या मंत्र्यांनी आर्थिक मदत तसेच नोकरीचे आश्वासन दिले, मात्र चार वर्षे होऊनही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही़- सागर कंडारे (मयत राहुल कंडारेचा भाऊ)   

 

टॅग्स :Crimeगुन्हाAhmednagarअहमदनगरMurderखून