शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कधी खांद्यावर, कधी भांड्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा नदीप्रवास;दमणगंगा नदीवर पुलासाठी याचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 10:35 IST

दमणगंगा नदीवर पुलासाठी ग्रामस्थांची याचना

संदीप भालेराव/चेतन ठाकरेनाशिक : पेठ तालुक्यातील दमणगंगा नदीच्या काठावर वसलेला देवळाचापाडा हा अतिदुर्गम भागातील छोटासा पाडा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही मूलभूत नागरी सुविधांसाठी झगडत असल्याचे भयावह वास्तव आहे. देवळाचापाडा गावाला जोडणारा कहांडोळपाडा ते देवळाचापाडादरम्यान रस्ताच नसल्याने पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी कधी खांद्यावर, तर कधी मोठ्या भांड्यात बसवून नदीच्या छातीपर्यंत लागणाऱ्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करून शहर गाठावे लागत आहे.

पेठ शहरापासून साधारण १० ते १५ किमी अंतरावर असलेल्या देवळाचापाडा गावाला जोडणारा कहांडोळपाडा ते देवळाचापाडादरम्यान रस्ताच नाही. अनेकवेळा रात्रीच्या अंधारात, तर कधी मुसळधार पावसात रुग्णांना डोली करून दवाखान्यात आणताना रस्त्यातच जीव गमवावा लागल्याच्या, तर गरोदर स्त्रियांना जंगलातच प्रसूत होण्याच्या घटनाही घडत असतात. गत अनेक वर्षांपासून या गावाला पक्का रस्ता व्हावा, यासाठी येथील नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून शासन दरबारी तसेच लोकप्रतिनिधींना साकडे घालत असले तरी, दरवर्षी पावसाळ्यात ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी गत होते. दमणगंगा नदीवर पूल नसल्याने या भागातील ८ ते १० गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. नदीवर पूल व रस्ता या दोन मूलभूत गरजा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तरी पूर्ण होतील काय, अशी आर्त हाक नागरिक देत आहेत.

खासदार शिंदे यांचा फोन अन् यंत्रणेची धावपळ

पेठ तालुक्यातील दमणगंगा नदी पार करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची बाब समजल्यानंतर ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी तातडीने नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांच्याशी संपर्क साधला. नदीवरील परिस्थितीबाबत माहिती घेत त्यांनी या ठिकाणी पूल बांधणे शक्य होऊ शकते का, याबाबतची विचारणा केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पाठवून माहिती मागवून घेत असल्याचे शिंदे यांना कळविले. शुक्रवारी पेठ तहसीलदार यांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रवाहाच्या ठिकाणी पाठवून अहवाल मागितला.  

टॅग्स :riverनदीNashikनाशिक